एक्स्प्लोर

Crop loan: मराठवाड्यात केवळ 22 टक्के पीककर्जाचे वाटप; शेतकऱ्यांवर सोन तारण ठेवण्याची वेळ

Marathwada Farmers: मराठवाड्यात 10 हजार 804 कोटीचे उदिष्ट असताना फक्त 2 हजार 418 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

Marathwada Farmers Crop loan: जुन महिना सुरु झाला असून, अनेक ठिकाणी पाऊस चांगला झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना आर्थिकसाह्य मिळावे म्हणून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीककर्ज वाटपास सुरवात झाली आहे. मात्र मराठवाड्यातील पीककर्ज वाटप संत गतीने सुरु असल्याचे चित्र आहे. कारण 13 जूनपर्यंत विभागात फक्त 22. 38 टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती कर्जवाटप...

मराठवाड्यात 10 हजार 804 कोटीचे उदिष्ट आहे. मात्र 13 जूनपर्यंतची आकडेवारी पाहिली असता 2 हजार 418 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात 387.19 कोटी रुपये (28.58), लातूर जिल्ह्यात 254.87 कोटी रुपये ( 15.28 टक्के), उस्मानाबाद 363.96 कोटी (26.60 टक्के), बीड 359.03 कोटी (20.40 टक्के), नांदेड 435.25 कोटी ( 28.66 टक्के), जालना 259.70 कोटी (21.29 टक्के), परभणी 214.78 कोटी (19.43 टक्के), हिंगोली 143.71 (22.38 टक्के) एवढं कर्जवाटप करण्यात आले आहे.

सोन तारण ठेवण्याची वेळ...

गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे पीककर्जासाठी बळीराजाला बँकांच्या दारात जाऊन उभं राहिण्याची वेळ आली आहे. मात्र असे असताना कर्ज मिळत नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या लाडसावंगी येथील गणेश पवार नावाच्या शेतकऱ्याने पीककर्जासाठी बँकेत अर्ज केला असता अजून कर्जवाटप सुरु झाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे बायकोचे अंगावरील सोन बँकेत ठेवून कर्ज घेण्याची वेळ पवार यांच्यावर आली आहे. 

शेतकऱ्यांची अडवणूक....

खरीपाची पेरणीसाठी आर्थिकदृष्ट्या मदत मिळावी म्हणून शेतकरी पीककर्ज काढतात. शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यासाठी बँकांना प्रशासनाकडून विशेष सूचना दिल्या जातात. मात्र असे असताना अनेक बँका कर्जवाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक करतात. अनेक खेट्या मारून सुद्धा कर्ज दिले जात नाही. तर काही ठिकाणी चिरीमिरी केल्याशिवाय कर्ज मिळत नाही. आता पुन्हा अशीच काही परिस्थिती पुन्हा पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget