एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचं 7 मिनिटांचं भाषण VS केजरीवालांचं 17 मिनिटांचं भाषण, सोशल मीडियावर कोण भारी?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal speech) यांच्या भाषणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal speech) यांच्या भाषणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आमदारांसाठी  300 घरं मुंबईत (300 houses for MLA) देणार असल्याची घोषणा, गुरुवारी विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत केलेल्या 17 मिनिटांचं भाषण वाहवा मिळवत आहे.  (Maharashtra CM Uddhav Thackeray speech vs Delhi CM Arvind Kejriwal speech, houses for MLAs, The Kashmir Files, BJP)

उद्धव ठाकरे यांचं भाषण 

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी 24 मार्चला पहिल्यांदा भाषण केलं. या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गृहप्रकल्प विशेषत: पुनर्विकास प्रकल्पांबाबत भाष्य केलं. मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आहे, पण शिवसेनेने तसा कधी विचार केला नाही. मुंबईतील कष्टकऱ्यांना घरे बांधून देण्यासंबंधी राज्य सरकारने गांभिर्याने विचार केला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या घरांचा प्रश्न आहे तसा लोकप्रतिनिधींच्या घराचाही प्रश्न असल्याचं नमूद केलं. लोकप्रतिनिधींसाठी कायमस्वरुपी घर असणं आवश्यक असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यासाठीच महाविकास आघाडी सरकार सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत 300 घरं देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी सभागृहात केली. उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर टीका होत आहे. कोट्यधीश आमदारांना घरं कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. 

अरविंद केजरीवाल यांचं भाषण

दरम्यान, तिकडे दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भाषण केलं. केजरीवालांनी आपल्या 17 मिनिटांच्या भाषणात केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केलाच, पण नव्याने पंजाबमध्ये स्थापन केलेल्या आप सरकारने, आमदारांबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. 

केजरीवाल काय म्हणाले? 

केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील सर्व कार्यालयात भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले जातील. पंजाबमध्येही असाच निर्णय झाला आहे.  
भाजपला बाबासाहेब आंबेडकर नको, त्यांना निवडणूक नको आहे. भाजपने लूटलं आहे. दिल्लीतील निवडणुकांची घोषणा झाली, पण पंतप्रधान कार्यालयाने निवडणूक आयोगाला त्या निवडणुका रद्द करायला लावल्या.  बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात निवडणूक प्रक्रियेला विशेष महत्त्व दिलं, पण भाजपला निवडणुकाच नको आहेत. त्यांच्याकडून बाबासाहेबांचा तिरस्कार होतो.

सत्ता येईल, सत्ता जाईल पण देश मोठा आहे, देशाचा विचार करा. आज आप पार्टी आहे, उद्या नसेल, आज मोदी असतील, उद्या नसतील, आज केजरीवाल आहे उद्या नसतील, पण देशाला झुकवू नका, देशासोबत खेळ नको, संविधानासोबत छेडछाड नको, असं केजरीवाल म्हणाले. 

उद्या गुजरातच्या निवडणुका येतील, तिथे पराभव दिसल्यावर भाजप निवडणूक आयोगाला चिठ्ठी लिहून निवडणुका पुढे ढकलेल. 

सर्वात मोठी पार्टी घाबरली

भाजप ही जगातील सर्वात मोठी पार्टी म्हणतं, मग आमचा जगातील सर्वात छोटा पक्ष असून भाजप घाबरतंय. हिम्मत असेल तर निवडणूक लढवून दाखवा, 56 इंच छाती असेल तर निवडणूक लढवा, अन्यथा तुम्ही घाबरणारे आहात म्हणावं लागेल, असं केजरीवाल म्हणाले. 

कश्मिर फाईल्सवरुन हल्लाबोल 

काश्मिर फाईल टॅक्स फ्री करा अशी मागणी भाजप आमदार करत आहेत. आज देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे नेते, कार्यकर्ते सर्वत्र पिक्चरचं पोस्टर लावत फिरत आहेत. यासाठी तुम्ही राजकारणात आला आहात का? घरी जाऊन मुलं विचारतील बाबा काय काम करता? तेव्हा मी पोस्टर लावतो हे सांगाल का? कश्मिर फाईल्स सिनेमा टॅक्स फ्री करण्यापेक्षा यूट्यूबवर अपलोड करा, सर्वांना मोफत बघायला मिळेल, असा हल्लाबोल अरविंद केजरीवाल यांनी केला. 

पंजाबमध्ये आपचे धडाकेबाज निर्णय 

दरम्यान, पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या आप सरकारने धडाकेबाज निर्णय घेतले आहेत.  भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन अजून दहा दिवसही झाले नाहीत, तोच एकापाठोपाठ एक निर्णयांचा सपाटा चालू आहे. कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय मान यांनी घेतला. तब्बल २५ हजार सरकारी नोकऱयांची भरती पंजाबमधलं आम आदमी पक्षाचं सरकार करणार आहे. 

भ्रष्टाचार, लाचखोरीची प्रकरणं रोखण्यासाठी व्हिडिओ रेकार्ड करुन पाठवा अशी योजना, भगवंत मान यांनी जाहीर केली.  त्यासाठी एक व्हाट्सअप नंबरही त्यांनी जनतेला दिला आहे.

यापाठोपाठ आणखी एक महत्वाचा निर्णय पंजाब सरकार पुढच्या काही दिवसांत करणार आहे. तो म्हणजे आमदारांच्या पेन्शनबाबत वन एमएलए,वन पेन्शन लागू करण्याचा.   पंजाब सरकार तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी आमदारांपासून सुरुवात करतंय. पंजाबमध्ये एकीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद आहे.२००४ सालीच हा निर्णय झाला..पण त्यानंतर आमदारांच्या पेन्शनला मात्र कुणी हात लावला नव्हता..आता पेन्शन पूर्ण बंद होत नसली तरी किमान तिजोरीवरचा थोडा भार हलका करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

दरम्यान, जे पंजाबला जमू शकतं ते महाराष्ट्राला का नाही हाच सवाल अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.

 VIDEO:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण 

 

VIDEO : अरविंद केजरीवाल यांचं भाषण

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Embed widget