एक्स्प्लोर

Shaktipeeth Expressway : मोठी बातमी! शक्तिपीठच्या भूसंपादनेतून कोल्हापूरला वगळलं, लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेणार

Kolhapur Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्ग हा वर्धा ते रत्नागिरी असा असून राज्यातील 12 जिल्हांतून जात आहे. या महामार्गाच्या भूसंपादनेला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबई: कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आलं आहे. तसा आदेश राज्य सरकारने पारित केला आहे. शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील एकूण 12 जिल्ह्यातील 29 तालुके आणि 370 गावांतून जाणार आहे. हा प्रकल्प हाती घेण्यास, आखणीस आणि भूसंपादनासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन संपादनासाठी अधिग्रहणासाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापुरातील गावं वगळण्यात आली आहेत. त्यासंदर्भात पुन्हा चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय

पहिल्या टप्प्यात वर्ध्यातील पवनार ते सांगली अशा भूसंपादनेला मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणी रद्द करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत मुख्मयंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री चर्चा करणार आहे.

Kolhapur Protest Against Shaktipeeth : शक्तिपीठला कोल्हापुरातून विरोध

शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासूनच कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी याला विरोध केल्याचं दिसतंय. माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या प्रश्नी आवाज उठवला. त्यानंतर सांगली, सोलापूर, धाराशिव आणि इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही या महामार्गाला विरोध केला. 

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीतून होऊ नये, त्यासाठी आमच्या शेतजमिनी देणार नाही अशा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याचं दिसतंय. कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता राज्य सरकारने आता या ठिकाणची भूसंपादन प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. 

Shaktipeeth Expressway : कसा असेल शक्तिपीठ महामार्ग?

विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार?

कोल्हापूर - अंबाबाई, तुळजापूर - तुळजाभवानी. नांदेड - माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.

ही बातमी वाचा:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
धक्कादायक! 40 फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात, कोल्हापूरच्या शिरोलीत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
धक्कादायक! 40 फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात, कोल्हापूरच्या शिरोलीत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Maharashtra Rain Updates: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan: केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धाा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
Cockroach Janta Party Jantar Mantar: कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
Uddhav Thackeray :कॉकरोच ना कमी लेखू नका, हा जंतरमंतरवरील आंदोलनाचा इशारा, नीटच्या पीडित तरुण- तरुणींचा आक्रोश सरकारला ऐकावाच लागेल : उद्धव ठाकरे
हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेत रणरणत्या उन्हात रस्त्यावर; कॉकरोच ना कमी लेखू नका : उद्धव ठाकरे
Cockroach Janata Party: 'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
LIC : एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, 3 जूनला 51750 शेअरची खरेदी
एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, किती कोटी मोजले?
India A Squad VS Sri Lanka : ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
Embed widget