एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कधी नदीत उडी, कधी रुग्णालयातून उडी, तर कधी स्वत:चाच गळा चिरुन; कोल्हापुरात आत्महत्यांची भयावह मालिका सुरुच

कधी विष प्राशन, कधी पंचगंगा नदीत उडी, कधी रुग्णालयाच्या इमारतीतून उडी अशा भयानक मार्गाने जीवन संपवण्याच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं असतानाच अत्यंत भयानक घटना इचलकरंजीत घडली.

Kolhapur Crime : कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात (Kolhapur News) अत्यंत भयाण पद्धतीने चिमूटभर आयुष्याच्या शेवट करण्याच्या घटना (Kolhapur Crime) सलग घडत आहेत. कधी विष प्राशन, कधी पंचगंगा नदीत उडी, कधी रुग्णालयाच्या इमारतीतून उडी अशा भयानक मार्गाने जीवन संपवण्याच्या घटनांनी (Series of Suicides continues in Kolhapur district) कोल्हापूर हादरलं असतानाच अत्यंत भयानक घटना इचलकरंजीत घडली. अवघं 31 वय असलेल्या व्यावसायिकाने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येसाठी निवडलेला मार्ग पाहून अंगावर शहारे आले आहेत. 

तोंडात बोळा घालून स्वत:च्या हाताने गळा चिरुन आत्महत्या

इचलकरंजीत स्वतःच्या हाताने चाकूने गळा चिरुन बेकरी व्यवसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. राकेश उर्फ सूरज सुभाष कुडचे (रा. कुडचे मळा, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट नसले, तरी नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. राकेशने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन किसान चौक परिसरात बेकरी साहित्य विक्रीचे दुकान सुरु केले होते. रविवारी नेहमीप्रमाणे बेकरी उघडल्यानंतर त्याने दुपारी शटर बंद करुन घेतले होते. सायंकाळपर्यंत शटर न उघडल्याने ग्राहकांनी चौकशी केली.

मात्र, बेकरीच्या गाळ्यातील बल्बचा प्रकाश दिसत असल्याने पाहिले असता गंभीर अवस्थेत राकेश दिसून आला. त्यामुळे शटर उचकटून नातेवाईक आणि नागरिकांनी दुकानाचे शटर उचकटून प्रवेश केला. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. गाळ्यातील प्रसंग पाहून पहिल्यांदा खून झाला असावा, अशी शंका आली. मात्र, दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर मात्र राकेशने अत्यंत भयानक पद्धतीने स्वत:ला संपवल्याचे समोर आले. धारदार चाकू तसेच कात्रीने मानेवर आणि गळ्यावर त्याने वार करुन घेतले. बाहेर आवाज येऊ नये, यासाठी राकेशने तोंडात बोळा घेत आत्महत्या केली.  

कोल्हापुरात आत्महत्यांची मालिका 

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात सलग आत्महत्यांची मालिकाच (series of suicides continues in Kolhapur district) सुरु आहे. करवीर तालुक्यातील वाकरेत दीड महिन्यात चार तरुणांनी आत्महत्या केल्याने सन्नाटा पसरला. मागील आठवड्यात आजाराला कंटाळून एकाने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. आजाराला कंटाळून रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी घेऊन जयसिंग नामदेव कणसे (वय 48 वर्षे, सध्या रा. शिरोली पुलाची, मूळ रा. सातारा) यांनी आत्महत्या केली. गडहिंग्लज तालुक्यात शिक्षकानेही आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली. 

मागील आठवड्यात कोल्हापूर शहराच्या उपनगरात एकाच दिवसात तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. यामध्ये एका विशीतील तरुणाचा समावेश होता. पाचगाव, आर. के. नगर परिसरातील दीपक करमचंद रयत (वय 50 वर्षे, गणेश नगर, रुमाले माळ) यांनी राहत्या घरी गळफास घेतला. तेजस प्रशांत यादव (वय 19 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी) या तरुणाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. हातकणंगले तालुक्यातील नागावात नुरमहमंद साहेबजी मुल्लाणी (वय 42 वर्षे, रा. धनगर गल्ली) यांनीही राहत्या घरी आत्महत्या केली.

दुर्दैवाच्या फेरा म्हणजे गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सलग आत्महत्यांच्या घटना उघडकीस येत आहेत. तरुणींकडूनही आत्महत्या होत असल्याने समाजमन सुन्न होत चालले आहे. आयुष्यही न पाहिलेल्या 20 ते 25 वयोगटातील तरुण तरुणींच्या आत्महत्या चिंतातूर करणाऱ्या होत चालल्या आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget