एक्स्प्लोर

Kolhapur Police : भुरट्या गुंडांची वाढती मर्दुमकी ते भर चौकात हुक्का ओढत माजगिरी; कोल्हापूर पोलिसांचा वचक संपला की काय?

पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुरट्यांची कुंडली समोर असताना पोलिस बघ्याची भूमिका का घेत आहेत? असाही प्रश्न निर्माण होतो. कोल्हापूरमध्ये पोलिसांचा वचक संपत चालला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Kolhapur Police : गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर शहर परिसरात मिशाही न फुटलेल्या भुरट्या गुडांची वाढत चाललेली मर्दुमकी, मोठ्या बापाच्या बिघडलेल्या दिवट्या पोरांचा खुलेआम 'दम मारो दम', दोन सराईत गुंडांची झालेली निर्घृण हत्या, हातकणंगले तालुक्यात दारुअड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी गेल्यानंतर गुडांनी पोलिसांवरच केलेला हल्ला पाहता कोल्हापूरमध्ये पोलिसांचा वचक संपत चालला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुरट्यांची कुंडली समोर असताना पोलिस बघ्याची भूमिका का घेत आहेत? असाही प्रश्न निर्माण होतो. इचलकरंजीमधील सराईत गुंड अजित नाईकची जामीनावर सुटका झाल्यानंतर काढलेली वरात त्याचेच द्योतक आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित नाईक हा खून आणि खंडणीच्या गुन्ह्यात जेलची हवा खात होता. मात्र, जामिनावर सुटताच त्याची मैदान मारून आल्यासारखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गाड्या आणि त्यांचे गल्लीतून मिरवणारे चमचेही दिसून आले. अजित नाईक येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. व्हायरल व्हिडिओ महामार्गावरील आहे. 

सोशल मीडियातूनही व्हिडिओ आणि रिल्स करून एकमेकांना खुन्नस देणे आणि त्यातून वाद वाढत जाण्याचेही प्रकार घडत आहेत. राजकीय नेत्यांवर असभ्य भाषेत शेरेबाजी करणाऱ्यांना शोधून काढून कारवाई केली जात असतानाच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या भुरट्यांच्या नाड्या आवळण्यात पोलिसांना नेमकी कोणती अडचण होत आहे? असाही प्रश्न निर्माण होतो. 

दीड महिन्यांत दोन गुंडांचा खून आणि झोपडपट्टीतील वाढती दादागिरी

कोल्हापूर शहरात भुरट्या गुंडांचे टोळीयुद्ध भडकल्याचे गेल्या दोन महिन्यांच्या घडामोडीतून स्पष्ट दिसून येत आहे. शहरातील झोपडपट्टी परिसर हा एकप्रकारे अशांत टापू झाल्याची परिस्थिती आहे. 24 सप्टेंबर रोजी जामिनावर सुटलेल्या चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) या सराईत गुंडाचा निर्घृण खून केल्याची घटना यादवनगरमध्ये घडली. चिन्यावर मारामारी, खुनीहल्ला, खंडणी वसुलीचे 10 ते 12 गुन्हे दाखल होते. त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. 

या घटनेचा विसर पडत नाही तोपर्यंतच 13 नोव्हेंबर आणखी एका सराईत गुंडाचा मुडदा पाडण्यात आला. कोल्हापूर पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार कुमार गायकवाड (वय 22, रा. मोरेवाडी, कोल्हापूर) यांचा तलवारीने वार करून खून झाला. ही घटना सुद्धा कोल्हापूर शहरात वाढत चाललेल्या टोळीयुद्धातूनच झाली. 

लक्षतीर्थ वसाहतमध्ये चाकू हल्ला 

याच महिन्यात एक आठवड्यापूर्वी लक्षतीर्थ वसाहतीमध्ये चाकूने हल्ला करण्याची घटना घडली. या वादात ऋषीकेश रवींद्र नलवडे हा जखमी झाला. ही घटना सुद्धा पूर्ववैमनस्यातून घडली. 

भर चौकात हुक्का ओढून दिवट्या पोरांचा माज

सराईत गुंडांच्या खूनांची मालिका सुरुच असतानाच आता बापाच्या पैशाने बिघडलेल्या दिवट्या पोरांचा उन्मादही चिंतेचा विषय आहे. एबीपी माझाने गांधीनगरातील दिवट्या पोराचा 'दम मारो दम' केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचचले होते. कधी हुक्का, तर कधी बेदरकार गाडी चालवणे, तर कधी मध्यरात्री फटाके फोडणे असा त्याचा रुबाब सुरु होता. त्याचा दम मारो दम हा कार्यक्रम कुणाच्या जोरावर सुरु आहे? अशीच चर्चा रंगली होती. एबीपी माझाने दणका दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी गांधीनगरमधील विशाल पहुजासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिस तोपर्यंत काय कारवाई करत होते, हा प्रश्न उपस्थित होतो. 

सोशल मीडियातून आव्हान 

सोशल मीडियातून व्हिडिओ, रिल्स करून एकमेकांना धमकी देण्याचे तसेच आपण गल्लीत श्रेष्ठ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न या सडक छाप गुंडांकडून आणि बिघडलेल्या दिवट्या पोरांकडून केला जात आहे. वचक निर्माण करण्यासाठी सुद्धा असे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियात देण्यात येणारी धमकी आता रस्त्यावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे या टोळीयुद्धाचा भडका होण्याअगोदर नाड्या आवळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Sonam Wangchuk: गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ
गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget