एक्स्प्लोर

Prakash Abitkar : जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान द्या, प्रकाश आबिटकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Prakash Abitkar : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत जाचक अटी रद्द करून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली.

Prakash Abitkar : महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देताना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा करताना ज्या अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत त्यावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. 

याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. उद्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे बंडखोर शिंदे गटातील आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत जाचक अटी रद्द करून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली.

प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिलं आहे. त्यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे की, राज्यात प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देणेबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. दरम्यान, राज्यातील प्रामणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे. 

त्यांनी काय म्हटले निवेदनात?

राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याकरीता राज्य शासनाने महात्मा जोतीबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. सदर अनुदान देण्यासाठी शासनामार्फत लावण्यात आलेले निकष जाचक आहेत. 

यामध्ये सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या कालावधीतील बँक अथवा संस्थेकडून घेतलेले कर्ज पात्र असणार आहे. या निकषामध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँक व जिल्हा बँक यांचे आर्थिक वर्ष वेगवेगळे असल्याने त्याचा लाभ राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार नाही. 

सन 2018-19 या वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने नुकसान भरपाई दिली होती, त्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे असून सदरच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget