एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : बदलत्या हवामानामुळे शेती तोट्यात, शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करावेत; जिल्हा कृषी महोत्सवात दीपक केसरकरांचे आवाहन

कृषि महोत्सवात सुमारे 200 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून यामध्ये विविध महिला बचत गट, कृषि विषयक अवजारे स्टॉल, विविध शासकीय स्टॉल तसेच पशु प्रदर्शन आदींचा समावेश आहे.

Kolhapur News : सध्या बदलत्या हवामानामुळे शेती तोट्याची ठरत आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा संकटात आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करावेत, तसेच कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बु. या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा कृषि महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. 30 मार्चपर्यंत चालणाऱ्या या कृषि महोत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि महोत्सवात सुमारे 200 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून यामध्ये विविध महिला बचत गट, कृषि विषयक अवजारे स्टॉल, विविध शासकीय स्टॉल तसेच पशु प्रदर्शन आदींचा समावेश आहे.

दुबार व आंतर पिके घेण्याला प्राधान्य द्यावे

केसरकर पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी केवळ भात, ऊस शेतीवर अवलंबून न राहता इतर पिके घेण्याबाबत नियोजन करावे.  शेतकऱ्यांनी कृषि पूरक जोडधंदा करावा. त्याचबरोबर दुबार व आंतर पिके घेण्याला प्राधान्य द्यावे. मॉडेल रुपाने राधानगरी कृषि पर्यटन म्हणून विकसित व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. राधानगरी धरण परिसरात 50 वूडन कॉटेजची उभारणी करण्यात यावी. त्याचबरोबर डबल डेकर बोट घेवून धरण परिसरातील पर्यटनाला चालना द्यावी. याकरता जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करावा. 

खासदार मंडलिक म्हणाले की, शेती करताना शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा जरुर विचार करावा. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेचाही विचार करावा. शास्त्रोक्त शेती करण्याला प्राधान्य द्यावे. पारंपारिक पिके न घेता नवनवीन पिक उत्पादने घेण्याला प्राधान्य द्यावे. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेतीचे सुयोग्य व्यवस्थापन आत्मसात करावे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी. शेती पूरक व्यवसायाकडे लक्ष द्यावे. शासनाच्या कृषि विषयक योजनांचा लाभ घ्यावा. सेंद्रीय शेतीसाठी शासनाने शेतकऱ्यांकरीता भरीव निधीची तरतुद केली असून त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 30 मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा केवळ शेतकऱ्यांनीच नाही तर सामान्य जनतेनेही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्यावतीने एकूण 15 लाभार्थ्यांना अनुदान योजना म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा तर बीज भांडवल 1 लाभार्थ्याला 52 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar Rains: 8 दिवसांपूर्वी 8 मृत्यू, तरीही चांदसेली घाट 'जैसे थे', दरड कोसळून वाहतूक ठप्प
Pandharpur : Vitthal मंदिराचे 24 तास दर्शन सुरु, समिती अध्यक्षांची माहिती
Farmer Distress: 'तोंडातला घास निसर्गाने हिरावला', Gondia तील अवकाळी पावसाने नुकसान
Tourist Rush :Diwali सुट्टीच्या शेवटच्या वीकेंडला Raigad वर पर्यटकांची गर्दी,वाहन पार्किंगच्या रांगा
Nalasopara Drug : नालासोपाऱ्यात 14 कोटींची MD Drugs फॅक्टरी उद्ध्वस्त, Mumbai Police ची मोठी कारवाई!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक सनसनाटी आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?
धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंनी ओढले टीकेचे आसूड
आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंचे टीकेचे आसूड
Jain Boarding House Land: पुण्यातील जैन बोर्डिंग जागा वादात आता आणखी एक ट्विस्ट! कर्ज दिलेल्या त्या दोन पतसंस्थांकडून गहाणखत थेट रद्दबातल
पुण्यातील जैन बोर्डिंग जागा वादात आता आणखी एक ट्विस्ट! कर्ज दिलेल्या त्या दोन पतसंस्थांकडून गहाणखत थेट रद्दबातल
Embed widget