एक्स्प्लोर

मनोज जरांगेंनी आज बोलावली निर्णायक बैठक; पुढील आंदोलनाची दिशा ठरणार; सरकारच्या अडचणी वाढणार

Manoj Jarange : आज 12 वाजता आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) मनोज जरांगे यांनी निर्णायक बैठक बोलावली असून, या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 

जालना (आंतरवाली सराटी) : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावून, मराठा समाजाला 10 टक्के शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दुसरीकडे आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याच्या भूमिकेवर मनोज जरांगे (Manoj Jarange) ठाम आहे. त्यामुळे सरकारने आमची फसवणूक केली असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. दरम्यान, आज 12 वाजता आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) मनोज जरांगे यांनी निर्णायक बैठक बोलावली असून, या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 12 वा दिवस आहे. दरम्यान, मंगळवारी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्वतंत्र आरक्षणाची आमची मागणीच नव्हती अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. जर सगेसोयऱ्याचा अध्यादेश मान्य करायचाच नव्हता, तर तो काढलाच कशाला असा प्रश्न देखील मनोज जरांगे यांनी विचारला आहे. 

आज निर्णायक बैठक... 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावा या मागणीसाठी म्हणून जरांगे गेल्या 12 दिवसांपासून, आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आहे. मात्र, सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारची भूमिका मान्य नसल्याचं म्हणत मनोज जरांगे हे ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याच्या भूमिकेवर ठाम आहे. ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी म्हणून जरांगे यांनी आज निर्णायक बैठक बोलावली आहे. आंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या या बैठकीत राज्यभरातील मराठा आंदोलकांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

उपचार बंद केले....

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली असताना, सरकारने मात्र स्वतंत्र आरक्षण दिल्याने मनोज जरांगे चांगलेच संतापले आहे. सरकारने आमची फसवणूक केली असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी मंगळवारपासून उपचार घेणं देखील बंद केले आहे. पत्रकार परिषद सुरू असतानाच मनोज जरांगे यांनी हाताला लावलेली सलाईन काढून फेकली. तसेच यापुढे शासकीय कोणतेही उपचार घेणार नसल्याचं देखील जरांगे म्हणाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :

'शिवरायांच्या नावाने खोटं बोलू नका', जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget