एक्स्प्लोर

Electricity : 248 शाळांची वीज बिलं थकली, महावितरणनं कनेक्शनच तोडले, जळगावमधील घटना 

Jalgaon News Update : जळगाव जिल्ह्यात तब्बल 248 शाळांमधील वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे.

Jalgaon Latest marathi News Update : जळगाव जिल्ह्यात तब्बल 248 शाळांमधील वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. वीज बिल थकल्यामुळे महावितरण विभागाने 248 शाळातील वीज कनेक्शन तोडलं आहे. वीज बिल थकवल्याप्रकरणी महावितरण विभागाकडून 248 शाळांचे वीज मीटर काढण्यात आले. वीज नसल्यामुळे शाळांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

वीज बिल थकविल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील 248  शाळांचे वीज मीटर महावितरण विभागाने काढून नेल्याने या शाळांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या दोनशे पन्नास शाळा मधील वीजबिलाची थकबाकी गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असल्याने महावितरण विभागाकडून काही महिन्या पासून कारवाईचा बडगा हा उगारला गेला आहे. या मध्ये ज्या शाळांची अनेक महिन्यापासून थकबाकी होती, ती वसूल होत नसल्याने महावितरणाकडून अशा शाळांचे वीज मीटर काढून घेतले जात आहेत. या घटनेमुळे शाळा प्रशासनाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड होऊ लागल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांचे वीज मीटर काढून घेण्याची कारवाई थांबविण्यात यावी, अशा प्रकारच्या सूचना महावितरण विभागाला देण्यात आल्या आहेत. तर शाळांनी सुध्दा थकीत वीज बिले भरण्यासंदर्भात तातडीने पावले उचलावी, या साठी जिल्हापरिषद प्रशासनाला ही सूचना  करण्यात आल्या आहेत. 
 
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक खर्चांसाठी शासनाकडून सानुग्रह अनुदान दिले जात असे. ते आता कमी करण्यात आले असून त्या एवजी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत निधी दिला जातो. मात्र हा निधी अतिशय कमी मिळत असल्याचं सांगितलं जातं आहे.  याच निधीमधून शालेय खर्चासह वीजबिल सुद्धा भरावे लागत असल्याने, त्यात महावितरण बिलाचा वाढत्या विज बिलामुळेही वीज बिले भरणे शाळा प्रशासनाला जड जात आहेत. त्यामुळे अनेक शाळांनी यातून मार्ग निघत नसल्याने वीज बिले भरणे बंद केल्याचं पाहायला मिळत आहे. 

त्याचाच परिणाम म्हणून महावितरण विभागाकडून या शाळांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी वीज मीटर काढून नेण्याची कारवाई करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने एकतर या शाळांना यासाठी अनुदान द्यावे किंवा वीजबिल माफ तरी करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे. 

आणखी वाचा:
School News: अनधिकृत शाळा बंद करा, पालकांची फसवणूक झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार; शिक्षण विभागाचा आदेश

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात, जळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात, जळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या पीएची गिरीश महाजनांच्या घरी जाऊन हात जोडून विनंती, मान डोलवत म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या पीएची गिरीश महाजनांच्या घरी जाऊन हात जोडून विनंती, मान डोलवत म्हणाले...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget