एक्स्प्लोर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 250 कोटी रुपये पाण्यात

नवी दिल्ली: नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयावर चर्चा करण्याऐवजी सभागृहात फक्त गोंधळ घालण्यातच खासदारांनी धन्यता मानल्याने संसदेचं हिवाळी अधिवेशनच पाण्यात गेलं आहे. अधिवेशनाच्या कामकाजासाठी एका मिनिटाचा खर्च अडीच लाख रुपये इतका आहे. मात्र कोट्यवधी रुपये खर्चूनही फक्त गोंधळच पाहायला मिळाला. 16 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर असं एक महिन्याचं हिवाळी अधिवेशन नोटबंदीच्या मुद्द्यावरुन पूर्णपणे वाया गेलं. वास्तविक, नोटाबंदीचा निर्णय हा लोकांची जीवनशैली बदलून टाकणारा निर्णय होता. त्यामुळे त्यावर संसदेत काही चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र पूर्ण महिनाभर केवळ आणि केवळ गोंधळच ऐकायला मिळाला. या एक महिन्याच्या अधिवेशनात एकूण 22 दिवस कामकाजाचे होतं. यात 19 विधेयकं मंजूर होणं अपेक्षित होतं. मात्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील वादांमुळे केवळ दोनच विधेयकं मंजूर झाली. त्यातलं एक आयकर दुरुस्ती विधेयक तर गोंधळात कुठल्याही चर्चेविना उरकलं. तर दुसरं दिव्यांगांना त्यांचं हक्क मिळवून देणारं विधेयक. एका मिनिटाला अडीच लाख या हिशोबानं जवळपास 250 कोटी रुपये खर्च या अधिवेशनावर झाला. 1 एप्रिल 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी करण्यासाठी या अधिवेशनात जीएसटीच्या करासंदर्भातली चार महत्वाची विधेयकं येणार होती. मात्र विरोधकांच्या गोंधळी पवित्र्यामुळे ती पुढे ढकलावी लागली. अनेक खासदारांना त्यांच्या मतदारसंघातले प्रश्नही मांडता आले नाहीत. कारण गोंधळ घालताना प्रश्नकाळाचंही पावित्र्य जपलं गेलं नाही. त्यामुळेच पंतप्रधानांच्या सभा, राहुल गांधींच्या पत्रकार परिषदा हा सिलसिला चालूच होता. संसद ही गोंधळ घालण्याची जागा नव्हे, त्यासाठी रस्ते मोकळे आहेत इतक्या तिखट शब्दांत राष्ट्रपतींनी कान उपटूनही परिणाम नाही झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे देखील या प्रकारानं उद्विग्न झाले. लोकसभेत कुठल्या नियमानुसार चर्चा करायची यावर महिनाभर गोंधळ घातला, तर राज्यसभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीवरुन. विरोधक हट्टी आहेत तर सरकारही काही कमी नव्हतं. इतका क्रांतीकारी निर्णय होता, तर मग त्याबद्दल दोन शब्द संसदेत बोलायचं औदार्य मोदींनी का नाही दाखवलं हा देखील प्रश्न इतिहासात कायम विचारला जाईल. एकूणच संसदीय कार्यप्रणालीवरचा विश्वास कमी होऊन जनतेचीही अवस्था उद्विग्न मुखर्जी, अडवाणी यांच्याप्रमाणेच झालेली असणार आहे. आणि त्यांच्याप्रमाणेच जनतेलाही मूकपणे पाहण्याशिवाय पर्याय नाही.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget