एक्स्प्लोर

UP Assembly Elections 2022: योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी नेमका का दिला राजीनामा?

योगी सरकारमधले विद्यमान मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

UP Assembly Elections 2022 : निवडणूक आयोगान 5 राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक जाहीर झालेल्या राज्यामध्ये एक महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. योगी सरकारमधले विद्यमान मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. मात्र, स्वामी प्रसाद मौर्य यांनी नेमका राजीनामा का दिला. त्यामागची कारणे काय आहेत हे समजून घेतले पाहिजे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याबरोबरचे त्यांचे फोटो भाजपची चिंता वाढवणारे होते. भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्याबरोबर जे सदस्य निवडणूक आले होते, त्या सर्वांना पुन्हा तिकीट द्यावे अशी मौर्य यांची मागणी होती. तसेच अन्य दोन सहकाऱ्यांना देखील या निवडणुकीसाठी तिकीट द्यावे, अशी मौर्य यांची मागणी होती. या त्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाजपने नकार दिला आहे. कारण सर्वेनुसार 2017 मधील अनेक सदस्य या निवडणुकीत हारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट द्यायचे की नाही यावर पक्ष विचार करत आहे. 

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या एका समर्थकावर कोर्टात काही खटलेही सुरू आहेत. ते खटले मौर्य यांना संपवायचे होते. मात्र, आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ते खटले मौर्य संपवू शकले नाहीत. निवडणुकीनंतर ते पूर्ण केले जाील असे आश्वास त्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवडाभरापासून स्वामी प्रसाद मौर्य आणि भाजप नेत्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरू होती. मौर्य त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे भाजप आणि त्यांच्यात काही एकमत झाले नाही, अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने आता डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांचे मन वळवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे सोपवली आहे. केशव प्रसाद मौर्य इतर असंतुष्ट असलेल्या राजीनामा दिलेल्या आमदारांचे मन वळवण्याचा देखील प्रयत्न करणार आहेत. याचबरोबर उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सलही या कामात गुंतले आहेत. आज मंत्री दारा सिंह चौहान यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे. त्यामुळे राजीनामा दिलेल्या आमदारांचे मन वळवण्यात भाजपच्या नेत्यांना यश येते का ते बघावे लागेल. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget