एक्स्प्लोर

UP Assembly Elections 2022: योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी नेमका का दिला राजीनामा?

योगी सरकारमधले विद्यमान मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

UP Assembly Elections 2022 : निवडणूक आयोगान 5 राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक जाहीर झालेल्या राज्यामध्ये एक महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. योगी सरकारमधले विद्यमान मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. मात्र, स्वामी प्रसाद मौर्य यांनी नेमका राजीनामा का दिला. त्यामागची कारणे काय आहेत हे समजून घेतले पाहिजे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याबरोबरचे त्यांचे फोटो भाजपची चिंता वाढवणारे होते. भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्याबरोबर जे सदस्य निवडणूक आले होते, त्या सर्वांना पुन्हा तिकीट द्यावे अशी मौर्य यांची मागणी होती. तसेच अन्य दोन सहकाऱ्यांना देखील या निवडणुकीसाठी तिकीट द्यावे, अशी मौर्य यांची मागणी होती. या त्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाजपने नकार दिला आहे. कारण सर्वेनुसार 2017 मधील अनेक सदस्य या निवडणुकीत हारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट द्यायचे की नाही यावर पक्ष विचार करत आहे. 

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या एका समर्थकावर कोर्टात काही खटलेही सुरू आहेत. ते खटले मौर्य यांना संपवायचे होते. मात्र, आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ते खटले मौर्य संपवू शकले नाहीत. निवडणुकीनंतर ते पूर्ण केले जाील असे आश्वास त्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवडाभरापासून स्वामी प्रसाद मौर्य आणि भाजप नेत्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरू होती. मौर्य त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे भाजप आणि त्यांच्यात काही एकमत झाले नाही, अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने आता डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांचे मन वळवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे सोपवली आहे. केशव प्रसाद मौर्य इतर असंतुष्ट असलेल्या राजीनामा दिलेल्या आमदारांचे मन वळवण्याचा देखील प्रयत्न करणार आहेत. याचबरोबर उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सलही या कामात गुंतले आहेत. आज मंत्री दारा सिंह चौहान यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे. त्यामुळे राजीनामा दिलेल्या आमदारांचे मन वळवण्यात भाजपच्या नेत्यांना यश येते का ते बघावे लागेल. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget