एक्स्प्लोर

Corona In India:देशातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग अधिक, महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश

सध्या देशात कोरोना संक्रमणाचा दर हा 15.88  टक्के आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या सात दिवसांवमध्ये देशातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग मोठा आहे.

Corona In India: देशात अद्यापही कोरोनाचे संकट आहेच. दररोज देशात दोन लाखांच्या पुढे कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. शुक्रवारी देशात 2,51,209 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 627 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला होता. सध्या देशात कोरोना संक्रमणाचा दर हा 15.88  टक्के आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या सात दिवसांवमध्ये देशातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग मोठा आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये सात जिल्हे हे दक्षिण भारतातील आहेत. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातही रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्ण वाढीचा वेग आहे. केरळमधील सहा जिल्ह्यांमध्ये रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्याचबरोबर गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यातील प्रत्येकी दोन जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. तर कर्नाटक आणि राजस्थानमधील प्रत्येकी एका जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

21 ते 27 जानेवारी यादरम्यान 15 जिल्ह्यातील रुग्णसंख्या

बंगळुरू शहर - 1,43,960

पुणे  -75,592

एर्नाकुलम - 55,693

तपुरम  - 46,570

अहमदाबाद -  44,666

चेन्नई - 30,218

नागपूर -  28,326

कोझीकोड - 27,229

थिरिसूर -  25,822

कोयंबटूर - 25,751

कोल्लम - 23,191

वडोदरा - 22,021

कोट्टायम -  20,730

गुरुग्राम - 19,727

जयपूर - 19,289

या 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मागच्या 24 तासामध्ये देशात 3,47,443 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या कोरोना संक्रमणाचा दर हा 15.88 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, देशात अशी 11 राज्ये आहेत जिथे सक्रिय रुग्ण संख्या जास्त आहे. ज्यांची संख्या 50 हजारांपेक्षा जास्त आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा ही राज्ये आहेत. कर्नाटकात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्याचबरोबर देशातील 551 जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget