एक्स्प्लोर

करुणानिधींच्या अंत्यसंस्काराचा वाद हायकोर्टात, मरिना बीचचं महत्त्व काय?

द्रविड मुनेत्र कडगम (डीएमके) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचं मंगळवार 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कडगम (डीएमके) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचं मंगळवार 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र मरीना बीचच्या जागेवरुन तामिळनाडू सरकार आणि द्रमुक समर्थकांमध्ये वाद सुरु असून, तो कोर्टात पोहोचला आहे. करुणानिधी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलं आहे. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह देशभरातील दिग्गज नेते चेन्नईत पोहोचत आहेत. अंत्यसंस्काराचा वाद हायकोर्टात कशामुळे? दिग्गज नेते एम करुणानिधी, ज्यांनी दक्षिणेचं महत्त्व जगाला पटवून दिलं, त्यांच्या मृत्यूनंतरही कोर्टाच्या दारात जावं लागलं. समाधीसाठी समर्थकांना हवी असलेली जागा न मिळणं यामागचं कारण आहे. चेन्नईतील मरिना बीचवर जागा देण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. त्यामुळे डीएमकेने मद्रास हायकोर्टात धाव घेतली. करुणानिधींच्या समाधीसाठी तामिळनाडू सरकारने दुसरी जागा सुचवली आहे. पण डीएमके मरिना बीचवर ठाम आहे. सी. राजगोपालचारी आणि के कामराज यांची समाधी असलेली जागा राज्य सरकारने सुचवली आहे. मात्र ही जागा करुणानिधींच्या समर्थकांना मान्य नाही. दक्षिणेत मरिना बीचचं महत्त्व काय? चेन्नईतील मरिना बीच हा एक समुद्र किनारा नसून या जागेचं दक्षिणेच्या राजकारणात खास महत्त्व आहे. ही जागा दिग्गज द्रविड राजकारण्यांच्या समाधीसाठी ओळखली जाते. मरिना बीच अशी जागा आहे, जी द्रविडी राजकारणाचा इतिहास सांगते. इथे तीन दिग्गज नेत्यांची समाधी आहे. द्रविड मुन्नेत्र कडगम (डीएमके) चे संस्थापक सीएम अन्नादुरै यांची समाधी मरिना बीचवर आहे. अन्नादुरै यांच्यानंतर दक्षिणेतील दिग्गज नेते एमजीआर यांनाही मरिना बीचवरच जागा देण्यात आली, तर काही महिन्यांपूर्वीच निधन झालेल्या तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचीही समाधी मरिना बीचवर आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणाला 61 वर्ष देणाऱ्या करुणानिधींच्या समाधीसाठीही मरिना बीचवरच जागा द्यावी, अशी मागणी आहे. दरम्यान, विशेष म्हणजे द्रविड आंदोलनाचे जनक पेरियार यांची समाधी मरिना बीचवर नाही. पेरियार यांची समाधी चेन्नईतील दुसऱ्या ठिकाणी आहे, ज्याला पेरियार थिडाल म्हणून ओळखलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: आंदोलनामुळे मोदी पॅनिक झाले, त्यांना नमतं घ्यावं लागलं; 'बिगिनिंग इज द एंड'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
आंदोलनामुळे मोदी पॅनिक झाले, त्यांना नमतं घ्यावं लागलं; 'बिगिनिंग इज द एंड'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan Resigns : विरोधी पक्षांना जमलं नाही ते 'जेन झी'ने करून दाखवलं; मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्या मंत्र्याचा राजीनामा
विरोधी पक्षांना जमलं नाही ते 'जेन झी'ने करून दाखवलं; मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्या मंत्र्याचा राजीनामा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा अखेर राजीनामा; सरकारची जेन-झी समोर माघार, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताना काय म्हटलं?
केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा अखेर राजीनामा; सरकारची जेन-झी समोर माघार, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताना काय म्हटलं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Embed widget