एक्स्प्लोर

Wayanad Landslide : वायनाडमध्ये निसर्गाचं रौद्ररुप; आतापर्यंत 308लोकांनी गमावला जीव, आस्मानी संकटानं अनेक संसार रस्त्यावर

Wayanad Landslide: अत्यंत मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे वायनाडच्या डोंगराळ भागात भूस्खलन झालेलं. या दुर्घटनेत किमान 308 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Wayanad Landslides Updates: नवी दिल्ली : केरळमधील (Keral) वायनाडमध्ये (Wayanad)  झालेल्या मुसळधार पावसानं भूस्खलन होऊन अनेक कुटुंब उध्वस्थ झालीत. 29 जुलै रोजी रात्री उशिरा केरळमधील वायनाड येथे जमीन खचली, अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांना वाचवण्याच बचाव पथकाला यश आलं आहे. अद्याप 29 मुलं बेपत्ता आहेत. वायनाड घटनेचे पडसाद संसदेतही उमटले आणि त्यानंतर या प्रकरणावरुन राजकारणही सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. 

अत्यंत मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे वायनाडच्या डोंगराळ भागात भूस्खलन झालेलं. या दुर्घटनेत किमान 308 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत. अजून 240 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. लष्कराच्या वतीनं काही काळासाठी बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं. थोड्या विश्रांतीनंतर गुरुवारी सकाळी शोध आणि बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं. संततधार पावसामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. 

लष्कराच्या वतीनं समन्वयासाठी कोझिकोड येथे ब्रिगेडियर अर्जुन सेगन यांच्यासह कर्नाटक आणि केरळ उपक्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विनोद मॅथ्यू यांच्या नेतृत्वाखाली कमांड आणि कंट्रोल सेंटरची स्थापना केली आहे.

राहुल गांधी, प्रियांका गांधी वायनाडला पोहोचले

दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वायनाडला पोहोचल्या आहेत. यादरम्यान त्यांनी वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागांत उभारलेल्या विविध मदत शिबिरांनाही भेट दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मेपड्डी, वायनाड येथे या दुर्घटनेतील पीडितांची भेट घेतली. दोन्ही नेते सकाळी 9.30 वाजता कन्नूर विमानतळावर उतरले आणि त्यानंतर रस्त्यानं वायनाडला पोहोचले.

बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू 

वायनाडमधील भूस्खलनानंतर भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल, एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस-प्रशासन वेगानं बचावकार्य करत आहेत. बचाव कर्मचारी उद्ध्वस्त घरं आणि इमारतींमधील लोकांचा शोध घेत आहेत, मात्र आजूबाजूला ढिगारा साचल्यानं त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लष्करानं विक्रमी वेळेत उभारला ब्रीज 

केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण आपत्तीनंतर भारतीय लष्कराने मदत आणि बचाव कार्याची कमान हाती घेतली आहे. गुरुवारी, सैनिकांनी विक्रमी वेळेत भूस्खलनाच्या ठिकाणाजवळील नदीवरील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण केले. वायनाडमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लष्कराचे जवान 'भारत माता की जय'चा नारा देताना दिसत आहेत. भारतीय लष्कराकडून वायनाडमधील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पुलाची ताकद तपासण्यासाठी लष्कराने प्रथम आपली वाहने नदीच्या पलीकडे नेली. काम पूर्ण झाल्यानंतर बांधकामात सहभागी असलेल्या लष्कराच्या जवानांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. पुलाच्या बांधकामामुळे आता जड वाहनांना दरड कोसळण्याच्या ठिकाणी नेता येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगेLaxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडेDhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget