एक्स्प्लोर

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन

गेली अनेक दशकं कुलदीप नय्यर हे पत्रकारितेत सक्रीय होते, तसेच त्यांनी अनेक पुस्तकं लिहून देशाच्या विचारविश्वातही बहुमूल्य योगदान दिलं.

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये काल रात्री कुलदीप नय्यर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक दशकं कुलदीप नय्यर हे पत्रकारितेत सक्रीय होते. तसेच त्यांनी अनेक पुस्तकं लिहून देशाच्या विचारविश्वातही बहुमूल्य योगदान दिलं. स्वातंत्र्यपूर्व काळात 14 ऑगस्ट 1923 रोजी पंजाब प्रांतातील सियालकोट येथे कुलदीप नय्यर यांचा जन्म झाला. आता सियालकोट पाकिस्तानचा भाग आहे. लाहोरमधील फोरमन खिश्चन कॉलेजमधून बीए (ऑनर्स) पदवी मिळवून, पुढे लाहोरमधीलच लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी संपादित केली. नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीतून नय्यर यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. उर्दू प्रेस रिपोर्टर म्हणून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे ‘द स्टेट्समन’चे संपादक झाले. डेक्कन हेरॉल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यू, द स्टेट्समन, द एक्स्प्रेस ट्रिब्युन पाकिस्तान, द डॉन यांसारख्या 80 हून अधिक वृत्तपत्रात 14 भाषांमधून कुलदीप नय्यर यांनी स्तंभलेखन केले आहे. तब्बल 25 वर्षे ते ‘द टाईम्स’ या लंडनमधील वृत्तपत्राचे प्रतिनिधीही ते राहिले. पत्रकारितेसह ते सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही सक्रिय राहिले. आणीबाणीच्या शेवटच्या काळात कुलदीप नय्यर यांना अटकही झाली होती. 1996 साली संयुक्त राष्ट्र संघात ते भारतीय शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. 1990 मध्ये ग्रेट ब्रिटनमधील उच्चायुक्तलयात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 1997 साली राज्यसभा खासदारपदीही त्यांची निवड झाली. 'बिटविन द लाईन्स', ‘डिस्टेन्ट नेव्हर : ए टेल ऑफ द सब कॉन्टिनेन्ट', ‘इंडिया आफ्टर नेहरु', ‘इंडिया पाकिस्तन रिलेशनशिप’, ‘इंडिया हाऊस', ‘स्कूप', ‘द डे लुक्स ओल्ड' इत्यादी पुस्तके कुलदीप नय्यर यांनी लिहिली. भारत-पाकिस्तानात शांततेसाठी प्रयत्न कुलदीप नय्यर यांजा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला. तेव्हा भारत-पाकिस्तान वेगळे नव्हते. त्यामुळे त्यांना फाळणीचं दु:ख होतंच. दोन्ही देशांबद्दल आत्मियता नय्यर यांना होती. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, म्हणून त्यांची जीव तुटत असे. 2000 सालापासून दरवर्षी कुलदीप नय्यर हे भारत (15 ऑगस्ट) आणि पाकिस्तानच्या (14 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनी वाघा-अटारी सीमेवर मेणबत्त्या पेटवून शांतता प्रस्थापित करण्याचा संदेश देत. भारतातील पाकिस्तानी कैद्यांना आणि पाकिस्तानातील भारतीय कैद्यांना सोडवण्यासाठीही त्यांनी अनेक प्रयत्न केले.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget