![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Parliament Session : संसदेतील काँग्रेसच्या चार खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली
Parliament Session : सलग दोनवेळा लोकसभेचे कामकाज तहकूब केल्यानंतर विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
![Parliament Session : संसदेतील काँग्रेसच्या चार खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली The suspension action against four Congress MPs in Parliament withdrawn Parliament Session : संसदेतील काँग्रेसच्या चार खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/26/e3dde2bf85dfa83f3ea91504909f4af81658853844_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parliament Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ सुरूच आहे. आज सोमवारी सलग दोनवेळा लोकसभेचे कामकाज तहकूब केल्यानंतर विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभेतील गोंधळ संपला असून वाढत्या महागाईबाबत सभागृहात चर्चा सुरू होणार आहे.
तत्पूर्वी, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची ईडीने केलेली अटक, केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारने केलेला गैरवापर आणि लोकसभा सदस्यांपैकी चार खासदारांना चालू अधिवेशनातून निलंबित केल्याने काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला.
लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब
लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहात सोमवारी कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता पुन्हा सुरू झाले.यानंतर निलंबित खासदारांना पुन्हा सेवेत घेण्यावरून गदारोळ झाला आणि लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.त्याचवेळी ईडीच्या कारवाईबाबत राज्यसभेत गदारोळ आणि घोषणाबाजी झाली.यानंतर राज्यसभेचे कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
थरूर म्हणाले, ईडीच्या गैरवापरामुळे चिंता वाढली आहे
काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, ईडीच्या गैरवापराबद्दल आम्हाला चिंता आहे.सरकारी संस्थांचे काम राजकीय फायद्यासाठी वापरता कामा नये,तर त्यांचे विशेष कार्य असते.आपण अशा देशात आहोत जिथे लोकशाहीचे स्वतःचे महत्त्व आहे ते जपले पाहिजे. विरोधी नेत्यांचा आवाज दाबला जाऊ नये.
अनुराग ठाकूर म्हणाले, काँग्रेस गंभीर नाही
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, काँग्रेस आणि काही पक्ष केवळ दंगली करण्यापुरते मर्यादित झाले आहेत.राहुल गांधी सदनात येत नाहीत माहीत नाही,पण काँग्रेसचे लोक गंभीर नाहीत. महागाईवर आज चर्चा सुरू झाली असली, तरी विरोधक आजही त्यावर चर्चा करायला तयार नाहीत.यावरून विरोधकांचा चेहरा उघड होतो की हे लोक फक्त गोंधळ घालतात आणि चर्चा करण्यावर त्यांचा विश्वास नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)