एक्स्प्लोर

निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यंतच्या 5 टप्प्यातील टक्केवारी जाहीर; टीकाकारांनाही दिलं उत्तर

आयोगाने 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी, तर 26 एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 4 दिवसांनी 30 एप्रिल रोजी मतदानाची अंतिम टक्केवारी प्रसिद्ध केली होती.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमधील मतदानाच्या आकडेवारीवरुन सध्या चांगलाच गदारोळ सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानाची (Voting) टक्केवारी व आकडेवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयुक्तांकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच, आज लोकसभा (Loksabha Eelction) निवडणुकांच्या 6 व्या टप्प्यात 58 जागांवर मतदान घेण्यात येत आहे. 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आत्तापर्यंतच्या मतदानाची टक्केवारी अखेर जाहीर केली आहे. गेल्या 5 टप्प्यात देशात झालेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले, याची इतंभू माहितीच आयोगाने दिली आहे. तसेच, मतदान टक्केवारीवरुन काही चुकीचे गैरसमज पसरवले जात असल्याचंही आयोगाने म्हटले आहे.

आयोगाने 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी, तर 26 एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 4 दिवसांनी 30 एप्रिल रोजी मतदानाची अंतिम टक्केवारी प्रसिद्ध केली होती. त्यात प्रारंभीची टक्केवारी व अंतिम टक्केवारीमध्ये 5.75 टक्क्यांची तफावत आढळून आली. त्यामुळे, आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात होते. तर, असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स व कॉमन कॉज यांनी संयुक्तपणे, तसेच मोहुआ मोईत्रा यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.  त्यावर, न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर, आता निवडणूक आयोगानेच पहिल्या 5 टप्प्यातील मतदानाची संपूर्ण आकडेवारी जारी केली आहे. 

निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत झालेल्या सर्वच मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी जारी केली. तसेच, निवडणूक प्रक्रियेला खराब करण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक चुकीचा समज पसरवला जात आहे. आयोगाच्या अॅपवर सकाळी 9.30 वाजल्यापासून मतदानाची टक्केवारी अपडेट होत असते, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच, आयोगाकडून प्रेस रिलीज जारी करण्यात आली असून मतदान टक्केवारीत कुठलाही बदल झाला नसल्याचेही सांगितले. 

निवडणूक आयोगाकडून जारी केलेली टक्केवारी

पहिला टप्पा - 66.14 टक्के
दुसरी टप्पा - 66.71 टक्के
तिसरा टप्पा - 65.68 टक्के
चौथा टप्पा - 69.16 टक्के
पाचवा टप्पा - 62.20  टक्के

न्यायालयाने काय म्हटलं?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून, शनिवारी सहाव्या टप्प्याचे मतदान आहे. अशा स्थितीत मतदानकेंद्रनिहाय मतदानाची प्रमाणित आकडेवारी 48 तासांच्या आत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाला देता येणार नाहीत, कारण आयोगाला डेटा अपलोड करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ जमवणे अवघड ठरेल, असे न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या अवकाशकालीन खंपीठाने याचिकेवरील सुनावणीवेळी नमूद केले.

जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

जनतेचा दबाव लोकशाहीमध्ये काय करू शकतो, हे आज दिसून आले. ज्या टप्प्या - टप्प्यात मतदान झाले. त्या मतांची एकत्रित आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. जनतेमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रोष वाढत चालला होता. जनतेचा आपल्यावरील विश्वास उडू लागलाय, हे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने आज दुपारी अचानक हे पाऊल उचलले. जनता एकत्र आली तर काय होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. पण काही मतदार संघा मध्ये ElectionAgent ला 17 सी फॉर्म देण्यात आले नाहीत ते प्रत्येक उमेदवाराला देण्यात यावीत, असे ट्विट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 

 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Embed widget