एक्स्प्लोर

ओला-उबरने प्रवास करणं होऊ शकतं स्वस्त; सरकार लागू करणार नियमावली

प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी केंद्र परिवहन मंत्रालय ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना आमंलात आणण्याच्या तयारीत आहे. ही योजना राबवण्यासाठी लवकरच नियमावली लागू केली जाणार आहे.

मुंबई : अनेकदा ओला-उबर यांसारख्या कॅब एग्रीगेटर्स कंपन्या ग्राहकांकडून अवाच्या सव्वा भाडं वसूल करत असल्याचं आपण ऐकत असतो. यासाठीच आता केंद्र सरकार पाऊल उचलणार आहे. त्यामुळे ओला उबरने प्रवास करणाऱ्या ग्राहकांचा प्रवास स्वस्तात होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी केंद्र परिवहन मंत्रालय ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना आमंलात आणण्याच्या तयारीत आहे. ही योजना राबवण्यासाठी लवकरच नियमावली लागू केली जाणार आहे. या नियमावलीतंर्गत कंपन्या एकूण प्रवासी भाड्याच्या फक्त 10 टक्केच कमिशन प्राप्त करू शकणार आहेत. सध्या या कंपन्या एकूण प्रवासी भाड्यावर 20 टक्के कमिशन वसूल करत आहेत. कॅब एग्रीगेटर्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रथमच योजना आमलात आणली जात आहे. जर सरकारचा हा नियम लागू करण्यात आला, तर कॅब एग्रीगेटर्स कंपन्यांच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे. त्यामुळे ओला-उबरने प्रवास करणं स्वस्त होणार आहे. एवढच नाहीतर, या कंपन्यांच्या मनमानी कारभारावरही वचक बसणार आहे. भाडेवाढिच्या मुद्यावर केंद्र सरकारकडून एकूण भाड्यावर दुप्पट नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात येणाची शक्यता आहे. तसेच प्रत्येक राज्यांकडून तळभाडे निश्चित करण्यात येणार आहे. कंपन्यांकडून प्रत्येक तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार आहे. तसेच ओला-उबरच्या चालक दिवसभरात जो व्यवसाय करतील त्या एकूण व्यवसायाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त भाडे आकारले जाणार नाही, याचीही दक्षता नव्या नियमावलीत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. ओला आणि उबर कॅब कॅन्सल किंवा एखाद्या ट्रिपसाठी ड्रायवर नकार देणं यांसारख्या तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठीही कडक नियमावलीची तरतूदही करण्यात येणार आहे. या प्रस्तावातंर्गत कॅब ड्रायव्हरने राइड कॅन्सल केल्यास त्यावर एकूण प्रावासी भाड्याच्या 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. हाच नियम ग्राहकांनाही लागू करण्यात येणार आहे. जर एखादा ग्राहक कॅब बुक केल्यानंतर चुकीच्या कारणांमुळे कॅन्सल करत असेल तर ग्राहक किंवा चालकावरही 10 ते 50 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. कॅब एग्रीगेटर्स नियमांच्या मसुद्यानुसार, ग्राहकांना 5 लाख रूपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच यामध्ये कॅब चालकाची योग्य आणि नियमित बायोमॅट्रिक पडताळणी यांसारख्या तरतूदिंचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पहिल्यांदाच सरकार कॅब एग्रीगेटर्सच्या कमिशनवर शुल्क आकारणे किंवा वाढीव किंमत यांसारख्या महत्वाच्या विषयांसंदर्भात नियमावली लागू करणार आहे. कॅब एग्रीगेटर्स नियमावली लागू करण्याआधी सरकार यासंदर्भात लोकांच्या सुचना मागवणार आहे. त्यासाठी पुढिल आठवड्यात मसुदा जारी केला जाणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली. तसेच या कंपन्यांबाबत तयार केलेल्या नियमांची मोटर वाहन कायदा 2019 अंतर्गत नोंदणी केली जाणार असून, हा कायदा 1 सप्टेंबर रोजी अस्तित्वात आला आहे. या नियमांची वर्षाच्या अखेरीस अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. या नियमांमध्ये प्रवासी भाड्यावर नियंत्रण ठेवण्यासोबत चालक आणि प्रवाशांची सुरक्षा, चालक आणि कंपन्यांवरील दंड, तसेच कंपन्यांसाठी परवान्यांच्या निकषाचा समावेशही करण्यात येणार आहे. संबंधित बातम्या :  सहा महिन्यांपासून बंद असलेले ट्विटर अकाउंट्स डिलीट होणार OnePlus कंपनीला भारतात 5 वर्ष पूर्ण; 7 हजारापर्यंत मिळू शकते सवलत
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget