Swami Pragyanananda Saraswati : 'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Swami Pragyanananda Saraswati : भारतीय मुस्लिमात भारत भूमी पेक्षा पाकिस्तानच्या भूमीला पाक पवित्र मानतात. त्यामुळे काही मोजके मुसलमान चांगले असल्यामुळे संपूर्ण मुसलमानां स्वीकारावे हे मान्य नसल्याचे स्वामी प्रज्ञानानंद स्वरस्वती म्हणाले.

मुंबई : स्वामी प्रज्ञानानंद स्वरस्वती (Swami Pragyanananda Saraswati) यांनी दिवंगत काँग्रेस नेते राजशेखर रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले. राजशेखर रेड्डी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत एका ख्रिश्चन मिशनरीला तिरुपती बालाजी ट्रस्टवर नेमले होते. त्या व्यक्तीने तिरुपतीवरून अयोध्येत पाठवलेल्या प्रसादात गो मास मिसळवण्याचे काम केले होते, ज्यामुळे हिंदूंचा धर्मभ्रष्ट झाला. त्यामुळे हिंदू मंदिरात फक्त हिंदू हेच ट्रस्टी असावे अशी मागणी स्वामी प्रज्ञानानंद स्वरस्वती यांनी केली.(Swami Pragyanananda Saraswati)
Swami Pragyanananda Saraswati : अझरुद्दीने भारताचे खालले, मात्र तो नेहमी क्रिकेट खेळाला पाकिस्तानसाठी...
तर घुसखोरांना देशातून बाहेर काढण्यासाठी एसआयआरची गरज आहे. मात्र अझरुद्दीन सारखे लोक याचा विरोध करतात, खरतरं अझरुद्दीने भारताचे खालले, मात्र तो नेहमी क्रिकेट खेळाला पाकिस्तानसाठी असा गंभीर आरोप स्वामी प्रज्ञानानंद स्वरस्वती यांनी केला.भारतीय मुस्लिमात भारत भूमी पेक्षा पाकिस्तानच्या भूमीला पाक पवित्र मानतात. त्यामुळे काही मोजके मुसलमान चांगले असल्यामुळे संपूर्ण मुसलमानां स्वीकारावे हे मान्य नसल्याचे स्वामी प्रज्ञानानंद स्वरस्वती म्हणाले. भारतीय मुसलमान अराजक होऊ नये, समाजाचे संतुलन बनून राहावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम राष्ट्रीय मंच तयार केला. संघ एक संघटना आहे म्हणून ते मुसलमानांचा स्वीकार करतात, मात्र सनातनी धर्म कधीही मुसलमानांचा स्वीकार करू शकत नाही असेही स्वामी प्रज्ञानानंद स्वरस्वती म्हणाले आहेत.(Swami Pragyanananda Saraswati)
Swami Pragyanananda Saraswati : गाय ही राज्यमाता नसून विश्वमाता आहे
तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना यांना काही दृष्ट लोकांनी घेरून गाईला राज्य मातेचा दर्जा दिला, हे चुकीचे असून यामुळे गाईचा स्तर खाली आणण्याचा प्रयत्न झाला. गाय ही राज्यमाता नसून विश्वमाता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी स्वामी प्रज्ञानानंद स्वरस्वती यांनी केली
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी






















