एक्स्प्लोर

VIDEO : पहलगामची जबाबदारी पंडित नेहरु घेणार का? सुरक्षेत चूक, अमित शाहांनी राजीनामा द्यावा; दोनच मिनिटांच्या भाषणात संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut On Pahalgam Terrorist Attack : सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी घातली होती. ते जर पहिले पंतप्रधान असते तर आज भाजपवाले दिसलेच नसते असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

नवी दिल्ली : राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जबरदस्त वार केला. पहलगाम हल्ला हा सुरक्षेच्या चुकीमुळे झाला, त्याची जबाबदारी काय पंडित नेहरु घेणार का? या प्रकरणी अमित शाहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तसेच सरदार पटेल जर भारताचे पहिले पंतप्रधान असते तर त्यांनी आरएसएसवर बंदी घातली असती आणि आज भाजपवाले दिसलेच नसते असा टोला त्यांनी लगावला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांना दोन मिनिटांच्या भाषणाची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

खासदार संजय राऊत म्हणाले की, "पहलगामच्या वेळी सुरक्षेत चूक झाली हे जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनीही मान्य केलं आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. त्याची जबाबदारी कोण घेणार? त्या हल्ल्याची जबाबदारी पंडित नेहरू घेणार का? पहलगाम हल्ल्यामध्ये 26 जण मृत्यूमुखी पडले. त्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. त्यांनी राजीनामा द्यावा."

सगळ्या चुका नेहरूच्या नावावर टाकता

संजय राऊत म्हणाले की, हे सरकार भूतकाळात रमणारे आहे, त्यामुळे प्रत्येक चूक ही नेहरुंच्या माथी मारली जाते. पंडित नेहरू त्यांना झोपू देत नाहीत आणि त्यांना जगूही देत नाहीत.

सरदार पटेल असते तर भाजपवाले दिसले नसते

पंडित नेहरुंमुळेच आज भाजपवाले समोर सत्तेत बसले आहेत. भाजपवाल्यांनी नेहरुंचे आभआर मानले पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले की, "पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले, सरदार पटेल हे पहिले पंतप्रधान बनले नाहीत ही चूकच झाली. सरदार पटेल यांनी पहिल्यांदा आरएसएसवर बंदी घातली होती. जर सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर आज भाजपवाले दिसलेच नसते. त्यांच्यावर बंदी घातली असते."

त्या आधी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांचं संसदेतील भाषण म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झाल्यास 'रुदाली' होती. मोदींनी एकदाही ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही. ट्रम्प यांचे नाव घ्यायला मोदी घाबरतात असं राऊत म्हणाले.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget