एक्स्प्लोर

Arvind Sawant : मोदी ढोल कशाला बडवतात? भारताच्या बाजूने एकही देश उरला नाही; अरविंद सावंत मोदींच्या धोरणावर तुटून पडले

Arvind Sawant Parliament Speech : भारत युद्ध जिंकण्याच्या स्थितीत असताना, पाकिस्तानचे दोन तुकडे पडणे शक्य असताना मोदींनी माघार का घेतली? असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी विचारला.

नवी दिल्ली : संसदेत ऑपरेशन सिंदूरवरुन सुरू असलेल्या चर्चेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचं लक्ष्य केलं. पाकव्याप्त काश्मीर घेण्याची संधी असतानाही मोदींनी बिनशर्त युद्धबंदी का जाहीर केली असा सवाल त्यांनी विचारला. मोदींनी इंदिरा गांधींप्रमाणे पाकिस्तानचे तुकडे केले असते तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो असंही ते म्हणाले. मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे भारतासोबत शेजारी देशही उभा राहिला नाही अशा शब्दात अरविंद सावंत यांनी टीका केली.

संसदेचं पावसाळी अधिवशेन सुरू असून त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. लोकसभेत बोलताना अरविंद सावंत यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. आम्ही भारतीय लष्कराचा उदोउदो करु, पण मोदींचा करणार नाही असं सावंत म्हणाले.

Arvind Sawant Lok Sabha Speech : अरविंद सावंत यांचे संसदेतील भाषण खालीलप्रमाणे,

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधानांनी टेलिप्रॉम्टरचा वापर करून बिहारमध्ये इंग्रजीमध्ये भाषण केलं. हे जगाला दाखवण्यासाठी होतं का? तिकडे दहशतवादी मोकाट सुटले असताना यांनी इकडे ढोल बडवायला सुरूवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही पहलगामला गेले नाहीत, मणिपूरला गेले नाहीत. त्यांच्या संवेदना कुठे आहेत?

मोदींच्या धोरणांमुळे भारतासोबत एकही राष्ट्र नाही

मोदींच्या सोबत जगातील एकही राष्ट्र उभं राहिलं नाही हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं दुर्दैव आहे. जो इराण आपल्याला उधारीवर आणि रुपयांच्या बदल्यात तेल देतो त्या देशाशीही संबंध बिघडले. सार्क देशातील एकही शेजारी देश आपल्यासोबत नाही. कॅनडानेही आपल्याला विरोध केला. त्याचवेळी पाकिस्तानसोबत चीन, अमेरिका, तुर्कस्थान आणि इतर देश उभे राहिले. हे कशामुळे झाले?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने युद्धाच्या वेळीच पाकिस्तानला अब्जावधी रुपयांची मदत केली. भारताने यासाठी विरोध केला होता. तरीही पाकिस्तानला पैसे दिले गेले. त्यावरुन भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि यूएनमध्ये काय स्थिती आहे हे दिसून आलं. हे सगळं मोदींमुळे झालं.

पूर्ण राष्ट्र सोबत, तरीही माघार का घेतला?

पाकिस्तानविरोधात पूर्ण राष्ट्र आपल्यासोबत उभे होतं. आम्ही कधीही विरोध केला नाही. त्यानंतर मोदींनी अनेक शिष्टमंडळ इतर राष्ट्रांमध्ये पाठवले. पण त्याचा नेमका काय फायदा झाला? एकाही देशाने उघड उघड भारताला पाठिंबा दिला नाही याचं दुःख वाटतंय.

पाकिस्तान झुकला हे जगाला सांगा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सातत्याने सांगतात की त्यांनी युद्ध रोखले. पण आमच्या पंतप्रधानांनी कधीही सांगितलं नाही की पाकिस्तानने आपल्यासमोर हातपाय जोडले आणि युद्ध थांबवण्याची विनंती केली. पाकिस्तान आपल्यासमोर झुकला हे तुम्ही जगाला सांगायला पाहिजे होतं. पण आपले पंतप्रधान यावर काहीही बोलत नाहीत. पूर्ण राष्ट्र सोबत असताना मोदींनी पाकिस्तानसोबत बिनशर्त युद्धबंदी का जाहीर केली?

पाकव्याप्त काश्मीर जिंकण्याची संधी गमावली

पाकव्याप्त काश्मीर जिंकण्यासाठी आपल्याकडे संधी होती. ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला त्याचप्रमाणे धडा शिकवण्याची संधी आपल्याकडे होती. तुम्ही जर तसं केलं असतं तरी आम्ही मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. पण तुम्ही ती संधी घालवली.

'घुसके मारेंगे' ही भाषा भाजपकडून सातत्याने वापरली जाते. पण ओसामा बिन लादेनला जसं मारलं ते खरं 'घुसके मारेंगे' होतं. ज्या पाकिस्तानने भारताविरोधात दहशतवादी हल्ले केले त्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे बंद करा.

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
Embed widget