एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

ईशान्य भारतीयांना चीनी तर दक्षिण भारतीयांना आफ्रिकन म्हणाले; काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या सॅम पित्रोदांची याआधीची 5 वादग्रस्त वक्तव्यं

Sam Pitroda 5 Controversial Statements : ईशान्य भारतीयांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदांनी या आधीही अशा प्रकारची वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणल्याचा इतिहास आहे.

मुंबई: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेसची अडचण झालीय. काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेवर केलेलं भाष्य काँग्रेसची कोंडी करणारं ठरलंय. त्यांच्या वक्तव्यावरून खुद्द पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवलाय. तर काँग्रेसवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे. त्यानंतर आता सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसिज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

ईशान्य भारतीयांना चीनी म्हणाले

सॅम पित्रोदा बोलले आणि वाद पेटले, या समीकरणाला त्यांनी आताही तडा जाऊ दिला नाही. वारसा हक्काच्या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद शमण्याच्या आधीच पित्रोदांनी आणखी एक वक्तव्य करून आपल्याच पक्षाची म्हणजे काँग्रेसची अडचण केलीय. सॅम पित्रोदांनी एका मुलाखतीत भारताच्या विविधतेतल्या एकतेवर बोलायचं होतं. पण ते बोलताना त्यांनी ईशान्येकडच्या लोकांना चिनी, पश्चिमेकडच्या लोकांना अरेबियन, उत्तरेकडच्या लोकांना पाश्चात्यांसारखे गोरे आणि दक्षिणेकडच्या लोकांना आफ्रिकन ठरवून टाकलं. 

भाजपला आयतं कोलीत

सॅम पित्रोदा यांच्या या वक्तव्याने ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पित्रोदांनी भाजपच्या हातात आयतं कोलीत दिलं. त्यावर निशाणा साधण्याची संधी पंतप्रधान मोदींनी सोडली नसती तरच नवल. काँग्रेसनं मात्र पित्रोदांच्या या वक्तव्यापासून फारकत घेतलीय. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय की, भारताच्या विविधतेचं वर्णन करण्यासाठी पित्रोदांनी दिलेलं उदाहरण दुर्दैवी आणि अस्वीकारार्ह आहे. या विधानांशी काँग्रेसचा काहीच संबंध नाही.

याआधीही पित्रोदांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं करून काँग्रेसची कोंडी केली आहे. त्यांची वादग्रस्त वक्तव्य कोणती आहेत ते पाहुयात, 

1. वारसा कर - अमेरिकेत एखाद्याच्या मृत्यूनंतर 55 टक्के संपत्ती सरकारजमा होते, भारतात असा कोणताही कर नाही.

2. राम मंदिराचा मुद्दा - बेरोजगारी,  महागाई, शिक्षण, आरोग्य यासाखे प्रश्न मंदिरामुळे सुटणार नाहीत.

3. सन 1984 शीख दंगल - 'हुआ ते हुआ' असं म्हणत वादाला जन्म.

4. बालाकोट एअर स्ट्राईक - पुलवामा हल्ल्यानंतरच्या बालाकोट एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह.

5. नेहरू विरुद्ध आंबेडकर - घटनेच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा नेहरूंचा जास्त सहभाग होता. 

इतिहासापासून काँग्रेस नेते धडा घेत नाहीत

काँग्रेसचे आणखी एक नेते मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींना चायवाला म्हणण्यासारख्या केलेल्या विधानांचा भाजपला गेल्या निवडणुकीत फायदा झाला होता. त्यापासून कोणताही धडा न घेता सॅम पित्रोदासारखे काँग्रेसचे नेते बेधडक वक्तव्य करत राहतात आणि मग काँग्रेसवर सारवासारव करण्याची वेळ येते.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत
Congress On Bihar Vote Chori : काँग्रेस बिहारमधील व्होटर्स डेटा चेक करणार - सूत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Home :  स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींवर लक्ष ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता
नवं किंवा जुनं घर, दुकान खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
Embed widget