एक्स्प्लोर

अयोध्या ते रामेश्वरम... राम मंदिरासाठी ‘रामराज्य रथयात्रा’ रवाना

रामदास मिशनचे महामंत्री शक्ती शांतनंद यांनी सांगितले की, “आता सगळीकडे सरकार केवळ रामभक्तांचेच बनतील. पाहा दिल्लीत मोदी, तर यूपीत योगी आहेत. आता वेळ बदलत आहे.”

लखनौ (उत्तर प्रदेश) : राम मंदिर बनवण्याची शपथ घेऊन, अयोध्येतून रामराज्य रथयात्रा रवाना झाली आहे. 40 दिवसांनंतर रामराज्य रथयात्रा रामेश्वरममध्ये पोहोचेल आणि तिथेच या यात्रेचा समारोप होईल. रामदास मिशनची ही रथयात्रा असल्याचे म्हटले जात असले, तरी या यात्रेमागे भाजप, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद एकवटली आहे. या यात्रेच्या रुपाने कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमधील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माहौलही तापवण्याची तयारी सुद्धा केली जात असल्याची चर्चा आहे. अयोध्येच्या कारसेवकपुरममध्ये साधू-संत, भाजप आणि विहिंपचे नेते जमा झाले होते. तिथे भाषण झालं, पूजा झाली, अयोध्येत राम मंदिर बनवण्याची शपथ घेण्यात आली, ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर रामराज्य रथयात्रा अयोध्येतून रामेश्वरमसाठी रवाना झाली. महाशिवरात्रीला सुरु झालेल्या या रथयात्रेचा रामनवमीला समारोप होईल. रामदास मिशनचे महामंत्री शक्ती शांतनंद म्हणाले की, “आता सगळीकडे सरकार केवळ रामभक्तांचेच बनतील. पाहा दिल्लीत (केंद्रात) मोदी, तर यूपीत योगी आहेत. आता वेळ बदलत आहे.” रामदास मिशन आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं जुनं नातं आहे. त्यामुळे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी योगींना बोलावण्यात आले होते. मात्र त्रिपुरातील निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या योगींना इथे उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे रथयात्रा सुरु करण्यासाठी फैजाबादहून भाजप खासदार लल्लू सिंह आणि अयोध्येहून भाजपचे महापौर पिंटू उपाध्याय आले होते. विहिंपचे महामंत्री चंपत रायही हजर होते. यात्रेसाठी जे रथ तयार करण्यात आले आहे, ते राम मंदिराच्या प्रतिकृतीसारखे आहे. यात्रेच्या मार्गात मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही दोन राज्यही आहेत. याच वर्षी एप्रिल-मे महिन्यात कर्नाटकमध्ये, तर वर्षअखेरपर्यंत मध्य प्रदेशात निवडणुका होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये सरकार आणण्याचे, तर मध्य प्रदेशात सत्ता कायम राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. त्यासाठी रामराज्य रथयात्रा मदतीला धावेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रथयात्रेचा प्रवास कसा असेल? 15 फेब्रुवारी - वाराणसी 16 फेब्रुवारी - अलाहाबाद 16 फेब्रुवारी - चित्रकूट 19 फेब्रुवारी - भोपाळ 20 फेब्रुवारी - उज्जैन 21 फेब्रुवारी - इंदौर 25 फेब्रुवारी - औरंगाबाद 8 मार्च - बंगळुरु 10 मार्च - म्हैसूर 13 मार्च - कोझीकोड 21 मार्च - रामेश्वरम 22 मार्च - कन्याकुमारी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वादळी वाऱ्यासह पावसामुळं भिंत कोसळून मोठा अपघात, बंगळुरुमध्ये सात जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
वादळी वाऱ्यासह पावसामुळं भिंत कोसळून मोठा अपघात, बंगळुरुमध्ये सात जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'

व्हिडीओ

Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम
Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
Embed widget