एक्स्प्लोर

Yamuna : सावधान! दिल्लीत यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन 

दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ (Yamuna water level) झाली आहे. यमुना नदीने धोक्याची पाणी पातळी गाठली आहे.

Yamuna water level : उत्तर भारतात (North India) सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळं काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ (Yamuna water level) झाली आहे. यमुना नदीने धोक्याची पाणी पातळी गाठली आहे. दिल्लीतील जुन्या रेल्वे पुलावर 205.39 मीटरपर्यंत यमुना नदीची पाणी पातळी पोहोचली आहे.

दरम्यान, केंद्रीय जल आयोगानं (CWC) दिलेल्या माहितीनुसार यमुना नदीची पाणी पातळी ही  205.33 मीटर ते 205.39 मीटरपर्यंत आहे. त्यामध्ये वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगानं दिली आहे. यमुना नदीची धोक्याची पाणी पातळी ही  204.5 मीटर आहे. दरम्यान, एक महिन्यापूर्वी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय राजधानीतील अनेक भागात पूर आला होता. 13 जुलै रोजी, दिल्लीतील यमुनेने 208.66 मीटर इतकी पूर पातळी नोंदवली होती. त्यामुळं दिल्लीत अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं होते. दरम्यान, सध्या उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे. 

हिमाचलसह उत्तराखंडला मुसळधार पावसाचा मोठा फटका

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये भूस्खलन, पूर, ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 65 जणांनी आपला जीव गमावला आहे. मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे येथील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच या दोन्ही राज्यात शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं हिमाचलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे कोणतेही कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. साध्या पद्धतीनं सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. 

हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज ( 16 ऑगस्ट) आणि उद्या (17 ऑगस्ट) रोजी राजस्थानच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला आजही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

India weather : मुसळधार पावसाचा उत्तराखंडसह हिमाचलला मोठा फटका, आत्तापर्यंत 65 जणांचा मृत्यू, आज पावसाचा रेड अलर्ट 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke CJP : एकीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम
एकीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Sonam Wangchuk Ended Hunger Strike: मोठी बातमी: 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
मोठी बातमी: 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Sonam Wangchuk Protest Marathi News मोठी बातमी: सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget