एक्स्प्लोर

...म्हणून कैलास मानसरोवर यात्रा करावीशी वाटते : राहुल गांधी

‘मी जेव्हा विमानाने कर्नाटकला चाललो होतो त्यावेळी माझं विमान अचानक 8000 फूट खाली आलं. तेव्हा वाटलं की, आमची गाडी जणू काही थांबलीच... ज्यावेळी मी सुखरुप असल्याची मला जाणीव झाली त्यावेळी मला असं वाटलं की, मी कैलास मानसरोवरची यात्रा करावी.’

नवी दिल्ली : ‘मी जेव्हा विमानाने कर्नाटकला चाललो होतो त्यावेळी माझं विमान अचानक 8000 फूट खाली आलं. तेव्हा वाटलं की, आमची गाडी जणू काही थांबलीच... ज्यावेळी मी सुखरुप असल्याची मला जाणीव झाली त्यावेळी मला असं वाटलं की, मी कैलास मानसरोवरची यात्रा करावी.’ असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर कार्यकर्त्यांच्या काळजालाच हात घातला. राहुल गांधी यांनी आपली मंदिर डिप्लोमसी सुरुच ठेवली आहे. कारण की, यंदा होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचं राहुल गांधींनी जाहीर केलं आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर जनआक्रोश रॅलीमध्ये राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कर्नाटक निवडणुकीनंतर मानसरोवर यात्रेसाठी 15 दिवसांची सुट्टी मागितली आहे. ‘विमानातील बिघाडानंतर कैलास मानसरोवर यात्रा करायचं मनात आलं’   राहुल गांधी यांच्या मते, कैलास मानसरोवरच्या यात्रेचा विचार कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आला. रामलीला मैदानावरील जनआक्रोश रॅलीवेळी भाषण संपवल्यानंतर राहुल गांधी पुन्हा माईकजवळ आले आणि त्यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. ‘मला कळत नाही की, मी  ही गोष्ट तुम्हाला सांगू की नको. ‘मी जेव्हा विमानाने कर्नाटकला चाललो होतो त्यावेळी माझं विमान अचानक 8000 फूट खाली आलं. तेव्हा वाटलं की, आमची गाडी जणू काही थांबलीच... ज्यावेळी मी सुखरुप असल्याची मला जाणीव झाली त्यावेळी मला असं वाटलं की, मी कैलास मानसरोवरची यात्रा करावी.’ असं म्हणत राहुल गांधींनी कार्यकर्त्यांकडे 15 दिवसांची सुट्टी मागितली. कैलास मानसरोवरच्या यात्रेंसाठी राहुल गांधींनी अर्ज केला? परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान, दोन वेगवेळ्या रस्त्यांनी (लिपुलेख दर्रा उत्तराखंड आणि नाथु-ला दर्रा सिक्कीम) यात्रेचं आयोजन करते. पण परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार यंदा यात्रेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल होती. अशावेळी राहुल गांधींनी हे स्पष्ट केलं नाही की, त्यांनी यात्रेसाठी अर्ज केला की नाही. गुजरात निवडणुकीपासून मंदिर डिप्लोमसीला सुरुवात गुजरात निवडणुकीदरम्यान, राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिरसह अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं. त्यावेळी विरोधकांकडून त्यांच्यावर अनेक आरोपही झाले होते. राहुल गांधी हिंदू आहेत की, नाही याचा खुलासा करावा अशी मागणीही विरोधकांनी केली होती. तेव्हा काँग्रेसने राहुल गांधींचा बचाव करत त्यांना शिवभक्त आणि हिंदू म्हणून जाहीर केलं होतं. 12 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वत: राहुल गांधी अनेक मंदिर आणि मठांना भेटी देत आहेत. राहुल गांधी नाही तर भाजप आणि मोदींना इमेज बदलण्याची गरज : काँग्रेस कैलास मानसरोवर हा राजकारणाचा भाग नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेस प्रवक्ते अखिलेश सिंह यांनी याबाबत बोलताना असं सांगितलं की, ‘राहुल गांधीं यांना इमेज बदलण्याची गरज नाही. इमेज बदलण्याची खरी गरज भाजप आणि नरेंद्र मोदींना आहे. राहुल गांधी हे सर्व धर्मांवर विश्वास ठेवणारे आहेत.’ दरम्यान, राहुल गांधी कैलास मानसरोवर यात्रेला गेल्यास त्यावर राजकारण होण्याची दाट शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget