एक्स्प्लोर

Rahul Gandhi Interviewed Satyapal Malik : पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरणाऱ्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांची थेट राहुल गांधींनी घेतली मुलाखत!

या मुलाखतीनंतर तुमच्यावरही आक्रमण करतील, असा उपरोधिक टोला सत्यपाल मलिक यांनी लगावला. राहुल गांधी यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ला (Pulwama Attack) शेतकरी आंदोलन (Farmer Protest) शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांचा मृत्यू आदी मुद्यांवरून मोदी सरकावर सातत्याने 'सर्जिकल स्ट्राईक' केलेल्या जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Rahul Gandhi Interviewed Satyapal Malik) यांची आज काँगेस नेते राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर तुमच्यावरही आक्रमण करतील, असा उपरोधिक टोला सत्यपाल मलिक यांनी लगावला. राहुल गांधी यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली आहे.  

पंतप्रधान येत होते आणि मला चावीने खोलीत कोंडले होते

राहुल गांधी मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, जेव्हा मला कळले की आमचे शहीद (शहीदांचे पार्थिव) विमानतळावर येत आहेत, तेव्हा मी थेट विमानतळावर गेलो. आमचे सुरक्षा रक्षक म्हणाले जाऊ नका, पण मी जातो म्हणालो. विमानतळावर गेल्यावर मला खोलीत कोंडून ठेवले गेले, मला सांगण्यात आले की तुम्ही खोली सोडू शकत नाही. दुसरीकडे शहीद जवानांच्या शवपेट्या आल्या होत्या, पंतप्रधान येत होते आणि मला चावीने खोलीत कोंडले होते. मी सुरक्षा रक्षकांना विचारले की हे कसं काय करु शकतात? मी लढलो आणि तिथून बाहेर पडलो. मला असे वाटले की तिथे एक शो तयार झाला आहे, असा खुलासा राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांच्याशी झालेल्या चर्चेत केला. 

मला माझा वर्गमित्र अजित डोभाल यांचा फोन आला

राहुल गांधी म्हणाले की, त्यादिवशी मला विमानतळावर मोठी घटना घडत असल्याचा भास झाला. जसे पंतप्रधान देशाला दाखवत आहेत. सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, 'ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी ते (पीएम) कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. मी 3-4 वेळा प्रयत्न केला, पण ते मिळाले नाहीत. पाच सहा वाजता त्यांचा फोन आला, सत्यपाल भाई, काय झालं? मी म्हणालो की, आमच्यामुळे अनेक लोक वारले. ते म्हणाले की, नाही-नाही, गप्प बसा, आत्ता काही बोलू नका. एका तासानंतर मला माझा वर्गमित्र अजित डोभाल यांचा फोन आला. तोपर्यंत मी हे दोन वाहिन्यांना सांगितले होते. ते म्हणाला नाही, नाही, यावर काही बोलू नका. पुलवामाच्या प्रश्नावर मलिक म्हणाले की, मी असे म्हणत नाही की त्यांनी हे केले आहे परंतु त्यांनी पुलवामाकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा राजकीय वापर केला. ही त्यांची त्यावेळची भाषणे आहेत जेव्हा ते म्हणतात की, तुम्ही मतदानाला जाल तेव्हा पुलवामाच्या हौतात्म्याची आठवण करा.

पोलीस पूर्ण प्रामाणिकपणे सरकारच्या पाठीशी राहिले

राहुल यांच्याशी संवाद साधताना मलिक म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर राजकारण हे कर्तव्य होते. लोक तसे करायचे आणि मग तो एक व्यवसाय बनला. आता हा व्यवसाय झाला आहे. काश्मीरच्या समस्येवर उपाय काय, या राहुल यांच्या प्रश्नावर जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल म्हणाले की, आधी राज्याचा दर्जा परत केला पाहिजे आणि नंतर निवडणुका घ्याव्यात. कलम 370 मुळे त्यांना राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश बनवण्याइतका त्रास झालेला नाही. मला वाटते की UT ची स्थापना झाली कारण पोलीस बंड करतील अशी भीती त्यांना वाटत होती. पोलीस पूर्ण प्रामाणिकपणे सरकारच्या पाठीशी राहिले. ईदचे निमित्त होते पण पोलिसांनी सुटीही मागितली नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget