एक्स्प्लोर

Winter session I हिवाळी अधिवेशनाच्या 5 व्या दिवशीही राहुल गांधी गैरहजर

संसदेचं हिवाळी अधिवेश सुरु होऊन 5 दिवस झालेत. मात्र, या 5 दिवसात एकही दिवस काँग्रेसचे नेते राहुल गांधी हजर राहिले नाहीत. यावरुन आता त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. सध्या संसदेत महत्वाची विधयके मांडली जात असताना राहुल गांधींची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

नवी दिल्ली - संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या 5 दिवसाच्या कार्यकाळात एकही दिवस राहुल गांधी सभागृहात हजर राहिले नाही. सध्या लोकसभेत महत्वाचे विषय चर्चीले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील अनुपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लोकसभेत सध्या दिल्लीतील वाढलेलं प्रदूषण, एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझशीप), जम्मू काश्मीरची परिस्थिती, गांधी कुटुंबाची काढलेली एसपीजी सुरक्षा यावरुन संसदेच्या खालच्या सभागृहात चर्चा होत आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी उपस्थित का नाहीत? असे प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेदेखील 5 दिवसात फक्त एकच दिवस सभागृहात उपस्थित राहिले आहेत. यावरुन भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांनी टीका केली आहे. तरुण खासदारांनी सभागृहात गैरहजर राहणे निराशाजनक असल्याचे ते म्हणाले. आम्ही वयस्क असतानाही सभागृहात हजर राहतो. या खासदारांचा असा दृष्टीकोण योग्य नसल्याचे पाल म्हणाले. लोकांचे प्रश्न सभागृहात मांडावे म्हणून ते आपल्याला संसदेत पाठवतात. मात्र, तरीही राहुल गांधी एकही दिवस सभागृहात हजर नसल्याची टीका भाजप नेत्याने केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. लोकसभेत मांडली जाणारी महत्वाची विधयके - राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(एनआरसी)- एनआरसीवरुन सध्या सत्ताधारी भाजपला कोंडीत सापडली आहे. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत उत्तर दिले. धर्माच्या आधारे एनआरसीमध्ये भेदभाव होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. एनआरसीच्या आधारे नागरिकत्व सुनिश्चित केले जाईल आणि ते संपूर्ण देशात लागू करण्यात येईल, असं शहा यांनी सांगितलं. दिल्लीचे वाढते प्रदूषण - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसऱ्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या प्रदूषणावर चर्चा करण्यात आली. यामध्ये भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार काकोली घोष यांनी तोंडाला मास्क घालून सभागृहात दाखल झाल्या होत्या. मंत्री आणि खासदारांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन देखील काकोली घोष यांनी केले. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती - काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवरुन काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती संपूर्णपणे सामान्य असल्याचा दावा केला आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यास 4 महिने पूर्ण होत आहे. गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा हटवल्याने संसदेत गोंधळ, सरकारने सूडबुद्धीने सुरक्षा हटवल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Hunger Strike : जे.पी.नड्डांची मध्यस्थी, शाहांचं प्लॉनिंग अन् सोनम वांगचुक यांची संमती; उपोषण सोडण्यामागची 'इनसाइड स्टोरी' समोर
जे.पी.नड्डांची मध्यस्थी, शाहांचं प्लॉनिंग अन् सोनम वांगचुक यांची संमती; उपोषण सोडण्यामागची 'इनसाइड स्टोरी' समोर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Fast Track Court for NEET: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
Embed widget