एक्स्प्लोर

Winter session I हिवाळी अधिवेशनाच्या 5 व्या दिवशीही राहुल गांधी गैरहजर

संसदेचं हिवाळी अधिवेश सुरु होऊन 5 दिवस झालेत. मात्र, या 5 दिवसात एकही दिवस काँग्रेसचे नेते राहुल गांधी हजर राहिले नाहीत. यावरुन आता त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. सध्या संसदेत महत्वाची विधयके मांडली जात असताना राहुल गांधींची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

नवी दिल्ली - संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या 5 दिवसाच्या कार्यकाळात एकही दिवस राहुल गांधी सभागृहात हजर राहिले नाही. सध्या लोकसभेत महत्वाचे विषय चर्चीले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील अनुपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लोकसभेत सध्या दिल्लीतील वाढलेलं प्रदूषण, एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझशीप), जम्मू काश्मीरची परिस्थिती, गांधी कुटुंबाची काढलेली एसपीजी सुरक्षा यावरुन संसदेच्या खालच्या सभागृहात चर्चा होत आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी उपस्थित का नाहीत? असे प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेदेखील 5 दिवसात फक्त एकच दिवस सभागृहात उपस्थित राहिले आहेत. यावरुन भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांनी टीका केली आहे. तरुण खासदारांनी सभागृहात गैरहजर राहणे निराशाजनक असल्याचे ते म्हणाले. आम्ही वयस्क असतानाही सभागृहात हजर राहतो. या खासदारांचा असा दृष्टीकोण योग्य नसल्याचे पाल म्हणाले. लोकांचे प्रश्न सभागृहात मांडावे म्हणून ते आपल्याला संसदेत पाठवतात. मात्र, तरीही राहुल गांधी एकही दिवस सभागृहात हजर नसल्याची टीका भाजप नेत्याने केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. लोकसभेत मांडली जाणारी महत्वाची विधयके - राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(एनआरसी)- एनआरसीवरुन सध्या सत्ताधारी भाजपला कोंडीत सापडली आहे. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत उत्तर दिले. धर्माच्या आधारे एनआरसीमध्ये भेदभाव होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. एनआरसीच्या आधारे नागरिकत्व सुनिश्चित केले जाईल आणि ते संपूर्ण देशात लागू करण्यात येईल, असं शहा यांनी सांगितलं. दिल्लीचे वाढते प्रदूषण - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसऱ्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या प्रदूषणावर चर्चा करण्यात आली. यामध्ये भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार काकोली घोष यांनी तोंडाला मास्क घालून सभागृहात दाखल झाल्या होत्या. मंत्री आणि खासदारांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन देखील काकोली घोष यांनी केले. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती - काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवरुन काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती संपूर्णपणे सामान्य असल्याचा दावा केला आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यास 4 महिने पूर्ण होत आहे. गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा हटवल्याने संसदेत गोंधळ, सरकारने सूडबुद्धीने सुरक्षा हटवल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget