एक्स्प्लोर

नोटबंदी, जीएसटीमुळे आर्थिक विकास दर घसरला : रघुराम राजन

राजन यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. भारताच्या अनके महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पंतप्रधान कार्यालयाकडून हस्तक्षेप केला जातो, ही बाबदेखील एक समस्याच आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. नोटाबंदी आणि ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीतील त्रुटींचा मोठा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. जीएसटी आणि नोटाबंदी लागू होण्यापूर्वी चार वर्षापर्यंत भारताच्या विकासदरांमध्ये वेगाने वाढ होत होती, असंही रघुराम राजन म्हणाले.

नोटाबंदी आणि जीएसटी या लागोपाठ दोन झटक्यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. त्यामळे जागतिक अर्थव्यवस्था झपाट्यानं वाढत असतानाच भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचा दावा राजन यांनी केला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

राजन यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या कामाबाबतही प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. भारताच्या अनके महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पंतप्रधान कार्यालयाकडून हस्तक्षेप केला जातो, ही बाबदेखील एक समस्याच आहे. सध्याचा विकासदर सात टक्के आहे, मात्र देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने हा विकासदर पुरेसा नसल्याचं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं.

भारताचे भविष्य यावर बोलतांना रघूराजन म्हणाले की नोटबंदी आणि जीएसटी या दोन झटक्यानंतर देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. एकीकडे 2017 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ होत असताना, दुसराकडे भारतीय अर्थव्यवस्था घसरली असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत दुप्पट पटीने वाढत आहे. मात्र अर्थव्यवस्था वाढत असताना रोजगाराच्या संधी मात्र वाढत नसताना दिसत आहे. सध्या विकास दर कमी होत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. लवकरात लवकर रोजगार निर्मीती करणे गरजेचे आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था बळकट होणार असल्याचं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget