एक्स्प्लोर

Narendra Modi Speech: मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, दोषींना सोडणार नाही, मणिपूरवासियांच्या मागे देश ठामपणे उभा; नरेंद्र मोदींचा विश्वास

No Confidence Motion Debate : मणिपूरवासियांच्या मागे देशातील जनता ठाम उभी आहे असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

PM Narendra Modi Speech On Manipur Violence : मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरच्या मागे देश ठाम उभा आहे असंही ते म्हणाले. मणिपूरची आजची स्थिती ही काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही मोदींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूरवरील निवेदनाआधीच विरोधकांनी सभात्याग केला होता. 

मणिपूरच्या मुद्द्यावरून (No Confidence Motion) विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी मणिपूरची घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं. त्याचसोबत संसदेत भारतमातेबद्दल जे काही वक्तव्य करण्यात आलं तेही दुर्दैवी असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 

मणिपूरमध्ये महिलांसोबत जे काही झालं ते चुकीचं झालं असून दोषींना कडक शिक्षा देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते म्हणाले की, मणिपूरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर माहिती दिली, मणिपूरवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. आता मी मणिपूरवासियांना सांगतोय की, देश तुमच्या मागे आहे. लवकरच त्या ठिकाणी शांतता नांदेल. 

मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेस आणि विरोधकांवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, सत्तेत नसेल तर विरोधकांची काय अवस्था होते ते दिसतंय. काही जण भारतमातेच्या मृत्यूचं वक्तव्य करतात. हे ज्यांच्या मनात आहे तेच त्यांच्या कृतीत येत. हे तेच लोक आहे ज्यांनी भारताचे तुकडे केले. वंदे मातरम गीताचेही त्यांनी तुकडे केले. अकाल तख्तवर हल्ला करणारे आज आम्हाला प्रश्न विचारतात. विरोधकांना मणिपूरच्या मुद्द्यावरून राजकारण करायचं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ईशान्य भारतातील जनतेचा काँग्रेसने विश्वासघात केला. काँग्रेसने 1966 साली मिझोरमवर हल्ला केला होता. ईशान्य भारताचा नेहरू विकास करत नाहीत असा आरोप राममनोहर लोहिया यांनी केला. 

मणिपूरच्या शाळांमध्ये एकेकाळी राष्ट्रविरोधी शिक्षण दिलं जायचं त्यावेळी त्याठिकाणी काँग्रेसचे सरकार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ईशान्य भारतातील समस्यांची जननी काँग्रेस असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

ईशान्य भारत हा आमच्या काळजाचा तुकडा असून त्याचा विकास हेच आमचं ध्येय असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran Israel America War Impact in India: युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
Goverment On LPG Cylinder Shortage : ना रिफिलिंग, नाही नवीन कनेक्शन; गॅस पुरवठ्यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय, नियमांमध्ये नवा बदल
ना रिफिलिंग, नाही नवीन कनेक्शन; गॅस पुरवठ्यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय, नियमांमध्ये नवा बदल
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Beed Crime: बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
Embed widget