एक्स्प्लोर

मोदी लाट कायम, आता निवडणुका झाल्या तर NDA ला बहुमत : ABP-IMRB सर्व्हे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षांत देशात बदल झाले आहेत का? नागरिकांचे अच्छे दिन आले का? देशाच्या विकासाचा वेग वाढला की अपेक्षांचं ओझं वाढलं? मोदी सरकारच्या काळात देशाचा चेहरा किती बदलला? किती लोकांचं आयुष्य बदललं? अखेर काय आहे देशाचा मूड?     मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त एबीपी आणि IMRB INTERNATIONAL या सर्व्हे एजन्सने देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात अच्छे दिन आले का?, पंतप्रधान म्हणून मोदींचं काम कसं आहे? देशातील सर्वात लोकप्रिय नेता कोण? आणि महत्त्वाचा प्रश्न आता लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाला मत देणार?, असे प्रश्न मतदारांना विचारले.     जर आताच निवडणुका झाल्या तर फार बदल होणार नाही. मोदी लाट अद्यापही कायम आहे. पंजाब वगळता दुसऱ्या ठिकाणी भाजपला कोणतंही नुकसान होणार नसल्याचं दिसतं. आसाम आणि उडिसामध्ये यश मिळेल. यूपीमध्ये सध्याची स्थितीच कायम राहण्याची शक्यता आहे. तर बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने गमावलेली जागा पुन्हा मिळवण्याचा अंदाज आहे. दक्षिणमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये भाजपची मतं आणि जागा वाढताना दिसत आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपच्ये मताचे टक्के वाढण्याची चिन्ह आहेत, मात्र जागा कमी होतील.     दुसरीकडे यूपीएच्या जागांमध्ये फारसा फरक दिसत नाही. पण त्यांच्या व्होटशेअरमध्ये वाढ होईल.     काय आहे देशाचा मूड ?   1. सर्वात लोकप्रिय नेता कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी - 47 % राहुल गांधी  -  06% सोनिया गांधी  -  09% नितीश कुमार  -  04% अरविंद केजरीवाल  - 06%     2. दोन वर्षात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचं काम कसं आहे? खूप चांगलं - 9% चांगलं  - 40% साधारण - 32% वाईट  - 15% अतिशय वाईट - 3%   3. मोदी सरकारच्या दोन वर्षात अच्छे दिन आले? होय - 38% नाही - 44% माहित नाही -  18%     4. नितीश 2019 मध्ये पंतप्रधान बनू शकतात? होय -16% नाही - 49% माहित नाही - 35%     5. प्रत्येक भारतीयाला 'भारत माता की जय'चा जयघोष करायला हवा? होय - 79% नाही - 11% माहित नाही - 10%     6. मोदी सरकारच्या कार्यकाळात असहिष्णुता वाढल्याचा आरोप योग्य आहे? होय - 29% नाही - 39% माहित नाही - 32%     7. जेएनयू आणि इतर विद्यापीठातील वाद मिटवण्यात मोदी सरकारला यश आलं? होय - 44% नाही - 42% माहित नाही - 14%     8. काँग्रेसच्या नेत्यांनी ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात लाच घेतली? होय -  67% नाही - 17% माहित नाही  - 16%     9. काळा पैसा परत आणण्याबाबत मोदी सरकारची कामगिरी कशी आहे? अपेक्षेपेक्षा चांगली - 7% अपेक्षेप्रमाणे -  18% अपेक्षेपेक्षा कमी  -  42% माहित नाही - 32%     10. महागाई रोखण्यासाठी सरकारचं काम कसं आहे? अपेक्षेपेक्षा चांगलं -  14% अपेक्षेप्रमाणे - 21% अपेक्षेपेक्षा कमी   – 35% माहित नाही – 30%     11. स्वातंत्र्यानंतर सर्वात चांगले पंतप्रधान कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी - 24% अटल बिहारी वाजपेयी - 20% इंदिरा गांधी  -  20% जवाहरलाल नेहरु -   6%     12. आता निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?   एनडीएला किती जागा? उत्तर भारत - 126 जागा दक्षिण भारत  - 50 जागा पूर्व  भारत - 62 जागा पश्चिम  भारत - 104 जागा एकूण - 342 जागा (+3)   यूपीएला किती जागा? उत्तर भारत - 09 जागा दक्षिण भारत - 21 जागा पूर्व भारत - 24 जागा पश्चिम भारत - 12 जागा एकूण - 66 जागा (+4)   लेफ्टला किती जागा? उत्तर भारत  - 0 जागा दक्षिण भारत  - 8 जागा पूर्व  भारत - 6 जागा पश्चिम भारत - 0 जागा एकूण - 14 जागा (+4)   इतर उत्तर भारत - 96 जागा दक्षिण  भारत - 55 जागा पूर्व भारत - 50 जागा पश्चिम भारत - 0 जागा एकूण - 121 जागा (-11)   कसा झाला सर्व्हे? हा सर्वे 7 मे ते 16 मे दरम्यान झाला. एकूण 14 हजार 658 मतदारांना त्यांचं मत विचारलं. 18 राज्यांमध्ये 101 लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी बातचीत करण्यात आली. हा सर्व्हे युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजेच ESOMAR च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
Who is Kalita Maji : दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!
दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली!

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Embed widget