एक्स्प्लोर

PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधानांचा संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल, कोरोनापासून महागाईपर्यंत काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला.

PM Modi Lok Sabha Speech: कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळातच देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केल्याचा गंभीर आरोप लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणादरम्यान केला आहे. दरम्यान देशाच्या अधोगतीपासून, महागाई आणि कोरोना या साऱ्याला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका करत मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी मोदी यांनी जवळपास दोन तास भाषण केलं. या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

  1. भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी भारतात भाजप सरकार आल्यापासून आधी काँग्रेस सरकारच्या तुलनेत किती विकास झाला आहे. याबद्दल सविस्तर सांगतिलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा फेरीवाल्यांना देशात कर्ज मिळत आहे, असं नमूद करत मोदी यांनी भाजपने अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे सावरलं हे सांगितलं.
  2. तसंच शस्त्रास्त्र खरेदीमध्ये मोठमोठी राष्ट्रं भल्याभल्यांना देशांना खरेदी करत होती, मेक इन इंडियामधून हे आम्ही थांबवलं. असं म्हणत मोदी यांनी भाजप सरकारने केलेल्या विकासाचा उल्लेख केला.
  3. त्यानंतर 2014 च्या आधी देशात केवळ 500 स्टार्ट अप्स होते. तर सध्याच्या घडीला ही संख्या 50 हजारांवर पोहोचली आहे. हे सांगताना काँग्रेसच्या सरकारनंतर भारताने कशाप्रकारे विकास केला हे त्यांनी यातून सांगण्याचा प्रयत्न केला.
  4. काँग्रेसवर आणखी टीका करताना, काँग्रेस सरकारच्या काळात महागाई दर दुहेरी अंकांमध्ये पोहोचला होता. तेव्हा महागाई आवाक्याबाहेर आहे, असं काँग्रेस सरकार म्हणत होतं. पण आता भाजप सरकारमध्ये  कोरोनाचं संकट असतानाही महागाई 5.3 टक्के राहिली आहे, असंही मोदी म्हणाले.
  5. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी लोकसभेत बोलताना युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात आम्ही 27 कोटी लोकांना दारिद्रय रेषेतून बाहेर काढलं, तर मोदी सरकारने 23 कोटी लोकांना पुन्हा दारिद्रय रेषेत ढकललं, अशी टीका केली होती. याला उत्तर देताना मोदी म्हणाले, 'काही लोकं बोलून जातात.' असं म्हणत सभागृहात राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर पंतप्रधान मोदींनी टोला दिला.
  6. पुढे बोलताना काँग्रेस सरकारने 40 वर्षांत गरीबी तर हटवली नाही, पण गरिबांनी काँग्रेसला हटवलं, अशी टीका करत मोदी यांनी काँग्रेस सरकारवर आणखी हल्लाबोल केला. 
  7. शेतकऱ्यांबाबत बोलताना मोदी म्हणाले, 'महालांमध्ये राहणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या कशा कळणार? छोट्या शेतकऱ्यांना मजबूत करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
  8. या भाषणात मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान नेहरु यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, 'ज्या काळात जागतिकीकरण नव्हतं, त्या काळात नेहरु म्हणाले की, कोरियातील लढाई आपल्या देशावर परिणाम त्यामुळे आपल्या देशातील वस्तूंच्या किंमती वाढतात
    आणि त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात. असं म्हणत देशाच्या पंतप्रधानांनी महागाईची जबाबदारी झटकली होती.' 

  9. या सर्वानंतर काँग्रेसचे निवडणुकीत इतके नुकसान होऊनही, त्यांचा अहंकार कमी होत नाही, अशी जहरी टीका पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.

  10. तर विरोधक 'मोदीवर टीका केल्याशिवाय जगू शकत नाहीत.' असंही मोदी यावेळी म्हणाले.

हे ही वाचा-

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget