एक्स्प्लोर

पाच राज्यात सर्वाधिक मताधिक्य कुणाला?

मुंबई : मोदी लाटेवर सवार होत भाजपने देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशची सत्ता काबीज केली. तर उत्तराखंड काँग्रेसकडून हिरावून घेतलं. शिवाय काँग्रेसनेही मुसंडी घेत मणिपूर, गोवा आणि पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. काँग्रेसने तीन राज्यात मुसंडी मारली असली तरी मताधिक्य मात्र 2012 च्या निवडणुकांच्या तुलनेत कमी झाल्याचं चित्र आहे. कारण मणिपूर आणि गोवा या राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेल्या काँग्रेसपेक्षा भाजपचं मताधिक्य जास्त आहे. उत्तर प्रदेश : भाजपला 2012 च्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये 25 टक्के अधिक मताधिक्य मिळालं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या जनतेने सर्वात जास्त मतं भाजपच्या पारड्यात टाकली होती. तेच चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं. भाजपला 2012 मध्ये 47 जागा आणि 15 टक्के मतं मिळाली होती. यावेळी 39.7 टक्के मतं आणि 312 जागा मिळाल्या. काँग्रेसला 2012 मध्ये 11.5 टक्के मतं आणि 28 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 6.2 टक्के मतं आणि केवळ 7 जागा मिळाल्या आहेत. 2012 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या बसपाने 25.9 टक्के मतं आणि 80 जागा मिळवल्या होत्या. तर यावेळी 22.2 टक्के मतं आणि केवळ 19 जागांवर समाधान मानावं लागलं. 2012 साली समाजवादी पार्टी 29.1 टक्के मताधिक्क्यासह सत्तेत आली होती. त्यावेळी सपाने 224 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. तर यावेळी केवळ 47 जागा मिळाल्या तर 21.8 टक्के मतं मिळाली. up पंजाब : सत्ताधारी अकाली दल-भाजप युती, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात त्रिशंकू लढत होईल, अशी शक्यता असताना काँग्रेसने सर्वांना धोबीपछाड देत पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली. मात्र 2012 च्या तुलनेत मताधिक्य कमी झालं आहे. 2012 साली काँग्रेसला 40 टक्के मतं आणि 46 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 38.5 टक्के मतं आणि 77 जागा मिळाल्या. अकाली दलला 2012 साली 35 टक्के मताधिक्य आणि 56 जागा मिळाल्या होत्या. यावेळी 25.2 टक्के मतं आणि केवळ 15 जागा मिळाल्या. अकाली दलसोबत युती असलेल्या भाजपचंही मताधिक्य पंजाबमध्ये कमी झालं. 2012 साली 7 टक्के मताधिक्य आणि 12 जागा होत्या. तर यावेळी 5.4 टक्के मताधिक्य आणि केवळ 3 जागांवर विजय मिळवता आला. punjab उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेल्या भाजपला 2012 साली केवळ 33 टक्के मताधिक्य होतं. तर यावेळी 46.5 टक्के मतं मिळाली आहेत. उत्तराखंडमध्ये भाजपला 33 टक्के मताधिक्य आणि 31 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 46.5 टक्के मतं आणि 51 जागा मिळवल्या आहेत. सत्ताधारी काँग्रेसाल 2012 साली 34 टक्के मताधिक्य आणि 32 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी फक्त 0.5 टक्के मतं मिळाली आणि 21 जागा मिळवता आल्या. uttarakhand गोवा : गोव्यात सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला. इथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला आहे. पण भाजपचं मताधिक्य काँग्रेसपेक्षा अधिक आहे. भाजपला गोव्यात 2012 साली 34.7 टक्के मतं आणि 21 जागांवर विजय मिळाला होता. तर यावेळी 32.5 टक्के मतं आणि 13 जागांवर विजय मिळाला. गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला 2012 साली 30 टक्के मतं आणि 9 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी 28.4 टक्के मताधिक्य आणि 17 जागा मिळाल्या आहेत. goa मणिपूर : मणिपूरमध्ये मताधिक्याच्या बाबतीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला भाजपने मात देत 36.3 टक्के मतं खेचून आणली. मणिपूरमध्ये भाजपला 2012 मध्ये केवळ 2 टक्के मतं मिळाली होती, तर खातंही उघडता आलं नव्हतं. तर यावेळी 36.3 टक्के मताधिक्य आणि 21 जागांवर विजय मिळवला आहे. 2012 साली 42.4 टक्के मताधिक्य मिळवत सत्तेत विराजमान झालेल्या काँग्रेसच्या पारड्यात यावेळी मणिपूरच्या जनतेने केवळ 35.1 टक्के मतं टाकली आहेत. 2012 साली काँग्रेसने 42 जागांवर विजय मिळवला होता, तर यावेळी 28 जागा मिळवल्या. manipur संबंधित बातम्या :

पाच राज्यातील 2012 च्या निवडणुकांचं चित्र

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल

देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल

Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल

GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल

Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल

Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget