एक्स्प्लोर

Pariksha Pe Charcha 2022 : 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात मोदींना विद्यार्थ्यांना दिले महत्त्वाचे सल्ले, जाणून घ्या काही महत्त्वाचे मुद्दे

Pariksha Pe Charcha 2022 : आज दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान 1 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Pariksha Pe Charcha 2022 : यश-अपयशाची भीती न बाळगता परीक्षेला सामोरं जा, असा कानमंत्री पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 15 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी तालकटोरा स्टेडियममध्ये 1000 विद्यार्थी उपस्थित आहेत. पीएम मोदी म्हणाले की, ' हा कार्यक्रम मला खूप प्रिय आहे, परंतु कोरोनाच्या काळात तुम्हाला त्यापैकी बहुतेकांना भेटता आलं नाही. हा माझ्यासाठी आनंददायी कार्यक्रम आहे. खूप दिवसांनी तुम्हा सर्वांना भेटलो. मला वाटत नाही की, तुम्ही परीक्षेला घाबराल. तुमच्या पालकांना परीक्षेची भीती वाटेल. अनेक पालकांना मुलांपेक्षा जास्त टेन्शन आहे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात मोदींनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाबाबत... 

परीक्षा ही आयुष्यातील साधी गोष्ट : पंतप्रधान मोदी 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "परीक्षा जीवनातील अत्यंत साधी गोष्ट आहे, हे मनाला निष्ठुन सांगा. आपल्या विकास यात्रेचे हे लहान टप्पे आहेत. या टप्प्यातून आम्हीही गेलो आहोत. यापूर्वीही आम्ही अनेकदा परीक्षा दिली आहे. जेव्हा हा विश्वास निर्माण होतो. पुढच्या काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी हा अनुभव ताकद म्हणून कामी येतो." 

ऑनलाइन अभ्यास करण्याचे आव्हान!

खिल्ली उडवत पंतप्रधानांनी विचारलं, तुम्ही ऑनलाइन अभ्यास करताना अभ्यास करता की, रील पाहता? हे ऑनलाइन-ऑफलाइनबद्दल नाही, तर एकाग्रतेबद्दल आहे. PM म्हणाले की, दिवसभरात स्वतःसाठी थोडा वेळ काढा, जेव्हा तुम्ही ऑनलाइन/ऑफलाइन ऐवजी 'इनरलाइन' असाल.

विद्यार्थ्यानं स्मरणशक्तीवरही प्रश्न विचारला

ध्यानाचं महत्त्व स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की, "हे मोठं शास्त्र नाही आणि त्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. ध्यान करणं खूप सोपं आहे, फक्त वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. जो वर्तमानात जगतो त्याच्या भविष्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचा थेट स्मृतीशी संबंध आहे. पंतप्रधान म्हणाले की, "मन स्थिर ठेवा, आपोआप एकाग्रसता वाढेल"

परीक्षेत आपण विसरतो, ते कसे लक्षात ठेवायचे?

पीएम मोदींनी उत्तर दिलं की, 'प्रत्येक मुलाच्या मनात हे येतं की मी हे विसरलो आहे, परंतु जर तुम्ही पाहिलं तर परीक्षेपूर्वी अशा गोष्टी येतील ज्या त्यांनी आठवडाभरात कधीच पाहिल्या नव्हत्या. इथे आलात तर पण विचार करत असाल की मम्मी घरी टीव्ही बघत असेल आणि मी कोणत्या कोपऱ्यात बसलोय हे बघितलं असेल. त्यामुळे तुमचं लक्ष तिकडे असेल तर तुम्ही इथे नाही. देवाची सर्वात मोठी देणगी म्हणजे 'वर्तमान'. तो क्षण आपण जगत नाही याचे कारणही स्मृतीच आहे. स्मरणशक्तीचा संबंध केवळ परीक्षेशी नाही. तुम्ही हे अगदी सहज करू शकता. तुमचे मन स्थिर ठेवा.

प्रेरणेसाठी इंजेक्शन नाही : पंतप्रधान 

पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांना म्हणाले की, "प्रेरणेसाठी कोणंतही इंजेक्शन नाही." आयुष्यासाठीचा कानमंत्र सांगताना पंतप्रधान म्हणाले की, "स्वतःला ओळखा. लक्ष द्या कशामुळे गोष्टी निराश होतात? तुम्ही कशापासून प्रेरित आहात? सहानुभूती घेणं टाळा. यामुळे अशक्तपणा येईल. तुमच्या सभोवतालच्या गोष्टींचं निरीक्षण करा आणि शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 2 वर्षांच्या मुलाकडूनही प्रेरणा घेऊ शकता. ज्या दिव्यांगांनी आपल्या कमकुवतपणाला ताकद बनवलं आहे, त्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता. स्वत: चं स्वतः ची चाचणी घ्या आणि चांगल्या गोष्टींची पुनरावृत्ती करत रहा. यामुळे निराशा जाणवणार नाही. 

नव्या शिक्षण धोरणावर काय म्हणाले पंतप्रधान? 

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "2014 पासून आम्ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कामात व्यस्त होतो. या कामासाठी भारताच्या कानाकोपऱ्यात या विषयावर विचारमंथन (brainstorming) झालं. देशातील चांगले अभ्यासक, विज्ञान-तंत्रज्ञानाशी निगडित लोकांच्या नेतृत्वावर चर्चा झाली. त्यावरून तयार केलेल्या मसुदा नंतर लोकांपर्यंत पोहोचवला, त्यावर 15-20 लाख इनपुट्स आले. एवढ्या मोठ्या प्रयत्नानंतर नवं शैक्षणिक धोरण आलं आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, "सरकार काहीही करत असलं तरी कुठून तरी निषेधाचा आवाज उठतो. पण माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला भारतातील प्रत्येक विभागात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हे कार्य करणारे सर्व लोक अभिनंदनास पात्र आहेत. यामध्ये लाखो लोकांचा सहभाग आहे. ते देशातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांनी घडवले असून देशाच्या भविष्यासाठी घडवलं आहे."

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "पूर्वी खेळांचा समावेश मुख्य विषयांमध्ये केला जात नव्हता. पण आता त्याचा समावेश मुख्य विषयांमध्ये केला जातो. त्यामुळे खेळाला नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. NEP अभ्यासाच्या मध्यभागी देखील विषय बदलण्याची संधी देते, जी पूर्वी उपलब्ध नव्हती."

सध्याची समस्या म्हणजे, आपण कर्तव्यांचं पालन करत नाही : पंतप्रधान 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आज समस्या आहे की, आपण कर्तव्यांचं पालन नाही करत. त्यामुळे अधिकारांसाठी त्यांना भांडावं लागतं. आपल्या देशात कोणालाही आपल्या अधिकारांसाठी भांडावं लागणार नाही, हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यावरील उपाय म्हणजे, आपल्या कर्तव्यांचं पालन करणं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pariksha Pe Charcha 2022 : परीक्षा जीवनातील एक साधी गोष्ट, परीक्षेविषयी मनातील भीती दूर करा : पंतप्रधान

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Embed widget