एक्स्प्लोर

Pariksha Pe Charcha 2022 : 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात मोदींना विद्यार्थ्यांना दिले महत्त्वाचे सल्ले, जाणून घ्या काही महत्त्वाचे मुद्दे

Pariksha Pe Charcha 2022 : आज दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान 1 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Pariksha Pe Charcha 2022 : यश-अपयशाची भीती न बाळगता परीक्षेला सामोरं जा, असा कानमंत्री पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 15 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी तालकटोरा स्टेडियममध्ये 1000 विद्यार्थी उपस्थित आहेत. पीएम मोदी म्हणाले की, ' हा कार्यक्रम मला खूप प्रिय आहे, परंतु कोरोनाच्या काळात तुम्हाला त्यापैकी बहुतेकांना भेटता आलं नाही. हा माझ्यासाठी आनंददायी कार्यक्रम आहे. खूप दिवसांनी तुम्हा सर्वांना भेटलो. मला वाटत नाही की, तुम्ही परीक्षेला घाबराल. तुमच्या पालकांना परीक्षेची भीती वाटेल. अनेक पालकांना मुलांपेक्षा जास्त टेन्शन आहे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात मोदींनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाबाबत... 

परीक्षा ही आयुष्यातील साधी गोष्ट : पंतप्रधान मोदी 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "परीक्षा जीवनातील अत्यंत साधी गोष्ट आहे, हे मनाला निष्ठुन सांगा. आपल्या विकास यात्रेचे हे लहान टप्पे आहेत. या टप्प्यातून आम्हीही गेलो आहोत. यापूर्वीही आम्ही अनेकदा परीक्षा दिली आहे. जेव्हा हा विश्वास निर्माण होतो. पुढच्या काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी हा अनुभव ताकद म्हणून कामी येतो." 

ऑनलाइन अभ्यास करण्याचे आव्हान!

खिल्ली उडवत पंतप्रधानांनी विचारलं, तुम्ही ऑनलाइन अभ्यास करताना अभ्यास करता की, रील पाहता? हे ऑनलाइन-ऑफलाइनबद्दल नाही, तर एकाग्रतेबद्दल आहे. PM म्हणाले की, दिवसभरात स्वतःसाठी थोडा वेळ काढा, जेव्हा तुम्ही ऑनलाइन/ऑफलाइन ऐवजी 'इनरलाइन' असाल.

विद्यार्थ्यानं स्मरणशक्तीवरही प्रश्न विचारला

ध्यानाचं महत्त्व स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की, "हे मोठं शास्त्र नाही आणि त्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. ध्यान करणं खूप सोपं आहे, फक्त वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. जो वर्तमानात जगतो त्याच्या भविष्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचा थेट स्मृतीशी संबंध आहे. पंतप्रधान म्हणाले की, "मन स्थिर ठेवा, आपोआप एकाग्रसता वाढेल"

परीक्षेत आपण विसरतो, ते कसे लक्षात ठेवायचे?

पीएम मोदींनी उत्तर दिलं की, 'प्रत्येक मुलाच्या मनात हे येतं की मी हे विसरलो आहे, परंतु जर तुम्ही पाहिलं तर परीक्षेपूर्वी अशा गोष्टी येतील ज्या त्यांनी आठवडाभरात कधीच पाहिल्या नव्हत्या. इथे आलात तर पण विचार करत असाल की मम्मी घरी टीव्ही बघत असेल आणि मी कोणत्या कोपऱ्यात बसलोय हे बघितलं असेल. त्यामुळे तुमचं लक्ष तिकडे असेल तर तुम्ही इथे नाही. देवाची सर्वात मोठी देणगी म्हणजे 'वर्तमान'. तो क्षण आपण जगत नाही याचे कारणही स्मृतीच आहे. स्मरणशक्तीचा संबंध केवळ परीक्षेशी नाही. तुम्ही हे अगदी सहज करू शकता. तुमचे मन स्थिर ठेवा.

प्रेरणेसाठी इंजेक्शन नाही : पंतप्रधान 

पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांना म्हणाले की, "प्रेरणेसाठी कोणंतही इंजेक्शन नाही." आयुष्यासाठीचा कानमंत्र सांगताना पंतप्रधान म्हणाले की, "स्वतःला ओळखा. लक्ष द्या कशामुळे गोष्टी निराश होतात? तुम्ही कशापासून प्रेरित आहात? सहानुभूती घेणं टाळा. यामुळे अशक्तपणा येईल. तुमच्या सभोवतालच्या गोष्टींचं निरीक्षण करा आणि शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 2 वर्षांच्या मुलाकडूनही प्रेरणा घेऊ शकता. ज्या दिव्यांगांनी आपल्या कमकुवतपणाला ताकद बनवलं आहे, त्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता. स्वत: चं स्वतः ची चाचणी घ्या आणि चांगल्या गोष्टींची पुनरावृत्ती करत रहा. यामुळे निराशा जाणवणार नाही. 

नव्या शिक्षण धोरणावर काय म्हणाले पंतप्रधान? 

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "2014 पासून आम्ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कामात व्यस्त होतो. या कामासाठी भारताच्या कानाकोपऱ्यात या विषयावर विचारमंथन (brainstorming) झालं. देशातील चांगले अभ्यासक, विज्ञान-तंत्रज्ञानाशी निगडित लोकांच्या नेतृत्वावर चर्चा झाली. त्यावरून तयार केलेल्या मसुदा नंतर लोकांपर्यंत पोहोचवला, त्यावर 15-20 लाख इनपुट्स आले. एवढ्या मोठ्या प्रयत्नानंतर नवं शैक्षणिक धोरण आलं आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, "सरकार काहीही करत असलं तरी कुठून तरी निषेधाचा आवाज उठतो. पण माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला भारतातील प्रत्येक विभागात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हे कार्य करणारे सर्व लोक अभिनंदनास पात्र आहेत. यामध्ये लाखो लोकांचा सहभाग आहे. ते देशातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांनी घडवले असून देशाच्या भविष्यासाठी घडवलं आहे."

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "पूर्वी खेळांचा समावेश मुख्य विषयांमध्ये केला जात नव्हता. पण आता त्याचा समावेश मुख्य विषयांमध्ये केला जातो. त्यामुळे खेळाला नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. NEP अभ्यासाच्या मध्यभागी देखील विषय बदलण्याची संधी देते, जी पूर्वी उपलब्ध नव्हती."

सध्याची समस्या म्हणजे, आपण कर्तव्यांचं पालन करत नाही : पंतप्रधान 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आज समस्या आहे की, आपण कर्तव्यांचं पालन नाही करत. त्यामुळे अधिकारांसाठी त्यांना भांडावं लागतं. आपल्या देशात कोणालाही आपल्या अधिकारांसाठी भांडावं लागणार नाही, हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यावरील उपाय म्हणजे, आपल्या कर्तव्यांचं पालन करणं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pariksha Pe Charcha 2022 : परीक्षा जीवनातील एक साधी गोष्ट, परीक्षेविषयी मनातील भीती दूर करा : पंतप्रधान

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Railway Fare: मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
Girija Oak On Father Girish Oak, Mother Padmashree Phatak Divorce: 'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत गिरीजाचा खुलासा, गिरीश ओक यांच्याबाबत म्हणाली...
'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत पहिल्यांदाच गिरीजाचा खुलासा
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Dhurandhar Box Office Collection Day 17: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Fare: मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
Girija Oak On Father Girish Oak, Mother Padmashree Phatak Divorce: 'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत गिरीजाचा खुलासा, गिरीश ओक यांच्याबाबत म्हणाली...
'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत पहिल्यांदाच गिरीजाचा खुलासा
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Dhurandhar Box Office Collection Day 17: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
Samantha Ruth Prabhu Mobbed By Fans: निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं, नेमकं काय घडलं?
निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं अन्... VIDEO
Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, नेमकं काय घडलं?
मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, काय घडलं?
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Embed widget