एक्स्प्लोर

Pakistan : पाकिस्तानने गुडघे टेकले, पण भारताने चर्चेचा प्रस्ताव फेटाळला

Pakistan : भारताशी आम्ही शांततेनं राहू इच्छितो, एकत्र बसून मार्ग काढूया असं आवहान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे. परंतु, भारताकडून पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारण्यात आलाय.

Pakistan : पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. भारताशी आम्ही शांततेनं राहू इच्छितो, एकत्र बसून मार्ग काढूया असे आवहान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. परंतु, पाकिस्तानच्या आव्हानाला भारताने फारसा प्रतिसाद दिला नाही. एका टीव्ही मुलाखतीत बोलताना शेहबाज शरीफ यांनी शांतता प्रस्ताव मांडलाय.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चर्चा आणि शांतता प्रयत्नांबाबत दिलेल्या टीव्ही मुलाखतीत काही गोष्टींबाबत भाष्य केलंय. परंतु, त्यांच्याच सरकारमधून याबाबत विरोधाभास आहेत. शिवाय सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया देखील कमी झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरून वाटत नाही. त्यामुळे अशा स्थितीत भारत सध्या शाहबाज यांच्या आव्हानाकडे ‘दुर्लक्ष’ करण्याच्या मनस्थितीत आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत विरोधाभासांसोबतच निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सरकारसोबत कोणतीही नवी आणि कायमस्वरूपी संवाद प्रक्रिया सुरू करणे शक्य होणार नाही. 

पाकिस्तानात निवडणुकांची निश्चित टाइमलाइन पुढील काही महिन्यांसाठी आहे. तसेच मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत मर्यादित काळातील आघाडी सरकारशी चर्चा पुढे नेणे शक्य नाही. याशिवाय जुलै 2023 पर्यंत पाकिस्तानमध्ये सामान्य पद्धतीने नवे सरकार निवडून आले तर काही महिन्यांतच भारतात सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजू लागेल. मे 2024 पर्यंत भारतात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. 

या सर्व मुद्द्यांसोबतच भारताच्या अध्यक्षतेखालील SCO म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण भारताकडून पाकिस्तानला अद्याप पाठवले गेलेले नाही. यावर्षी भारताला SCO शिखर परिषदेचे आयोजन करायचे आहे, ज्यामध्ये पाकिस्तानला देखील सदस्य देश म्हणून आमंत्रित केले जाईल. भारताकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या बैठकीत पाकिस्तानच्या बाजूने शेहबाज शरीफ सहभागी होणार की नाही याचा निर्णय पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच होणार आहे.  

काय म्हणाले शहबाज शरिफ?

भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन युद्धे झाली आहेत.  प्रत्येक युद्धानंतर पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तान खाली खाली गेला आहे. पाकिस्तानला आता धडा मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत. आपल्याला एक दुसऱ्यांसोबत राहावे लागणार आहे. आता हे दोन्ही देशांवर निर्भर करते. आपण शांततेने राहू आणि प्रगती करूया. भारताशी झालेल्य युद्धानंतर पाकिस्तानला गरिबी आणि बेरोजगारीचा सामना करावा लागला. त्यामुळे आपण एकत्र बसूया आणि मार्ग काढूया, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी म्हटले आहे.  

महत्वाच्या बातम्या 

Pakistan: पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य, भारताशी झालेल्या तीन युद्धानंतर आम्हाला मिळाला धडा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget