विमान कंपन्यांनी तिकीटदर वाढवले, श्रीनगरहून येण्यासाठी तिप्पट भाडेवाढ; नेटीझन्सचा संताप, सरकारने घेतली दखल
डीजीसीएने 23 एप्रिल रोजी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. पहलगाम येथील दुर्घटनेनंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटकांकडून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Terrorist attack) काश्मीर खोऱ्यातून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असून विमान तिकीट आणि रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, देशावरील दहशवादी हल्ल्याच्या संकटात काही विमान कंपन्यांनी स्वत:ची संधी शोधत विमान तिकीटाचे दर तीन पटीने वाढवले आहेत. सोशल मीडियावर काही युजर्संकडून सध्याच्या विमान (Ariline) तिकीटाचे दर शेअर करण्यात आले आहेत. श्रीनगरहून मुंबई आणि दुसरीकडे प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीटदर वाढविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर, नागरी उड्डाण विभागाने देशभरातील एअरलाईन्सला निर्देश दिले आहेत. विमानकंपन्यांनी तिकीट रद्दचे चार्ज आणि rescheduling चार्ज न लावण्याचे आदेश DGCA ने दिले आहेत. तसेच, विमान कंपन्यांनी तिकीट दर न वाढविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
डीजीसीएने 23 एप्रिल रोजी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. पहलगाम येथील दुर्घटनेनंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटकांकडून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे, श्रीनगरहून देशभरात विमानांचे उड्डाण वाढविण्या यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, हजारो पर्यटक आणि भाविक अमरनाथ यात्रेसाठी काश्मिरला आले आहेत. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर ते आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे, स्वस्त तिकीट दर आणि विमानांची संख्या वाढविण्याचे आदेश डीजीसीएने विमान कंपन्यांना दिले आहेत.
Aftermath of Pahalgam terror attack, DGCA issues advisory to airlines over surge in pricing and waiving cancellation charges: DGCA pic.twitter.com/GHzerH1NSw
— ANI (@ANI) April 23, 2025
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरहून मुंबई जाण्यासाठी असणाऱ्या तिकीटांचे दर वाढविण्यात आल्याचे काही युजर्संने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यानुसार, तब्बल तीन पट जास्त दराने हा प्रवास करावा लागत असून श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट 56 हजार रुपयांपर्यत वाढवल्याचे एका ट्विटर युजर्संने स्क्रीन शॉट शेअर करुन म्हटले. त्यामुळे, नेटीझन्सने विमानकंपन्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला असून संकटात संधी शोधण्याचं काम दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचेही नेटीझन्सने म्हटले आहे.
Just look at how Private Airlines are charging 3 times more fare from the panick stricken tourists of Sri Nagar. pic.twitter.com/uFyc3TTgr5
— Manish RJ (@mrjethwani_) April 23, 2025
श्रीनगरहून अतिरिक्त 4 विमानांचे उड्डाण
दरम्यान, सरकारच्या आदेशानंतर एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीने श्रीनगरहून उड्डाण करणाऱ्या 4 विमानांची संख्या वाढवली आहे. त्यातील दोन विमाने ही दिल्लीसाठी असून 2 मुंबईसाठी वाढविण्यात आली आहेत. आपली सुट्टी मध्येच सोडून जे घरी परतू इच्छित आहेत, त्यांसाठी ही अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात आलीय.



















