एक्स्प्लोर

Mani Shankar Aiyar : नरसिंह राव हे काँग्रेसचे नव्हे तर 'भाजपचे पहिले पंतप्रधान'; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची टीका

Mani Shankar Aiyar On PV Narasimha Rao : देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहा राव हे भाजपचे पहिले पंतप्रधान होते, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी केली.

नवी दिल्ली काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर ( Mani Shankar Aiyar) यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव ( PV Narasimha Rao) हे काँग्रेसमधील भाजपचे पहिले पंतप्रधान होते अशी टीका अय्यर यांनी केली. राव यांचा जातीयवादी  विचारांकडे कल असल्याचेही त्यांनी म्हटले. 

परराष्ट्र विभागाचे अधिकारी असलेल्या अय्यर यांनी राजकारणात प्रवेश केला. अय्यर यांच्या 'मेमरीज ऑफ ए मॅव्हरिक... द फर्स्ट फिफ्टी इयर्स (1941-1991) ("Memoirs of a Maverick -- The First Fifty Years (1941-1991)") या आत्मचरित्रपर पुस्तकाचे अनावरण झाले. या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्यासोबत झालेल्या वार्तालापाच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी विविध मुद्यांवर थेट भाष्य केले. यावेळी प्रेक्षकांमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यादेखील उपस्थित होत्या. 

या वार्तालापात त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी असलेल्या संबंधांपासून ते डिसेंबर 1978 पासून ते जानेवारी 1982 या कालावधीत कराचीमध्ये महावाणिज्यदूत म्हणून काम करण्यापर्यंतच्या अनुभवाबाबतही अय्यर यांनी भाष्य केले. प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान बाबरी मशीद प्रकरण हाताळताना राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, अय्यर यांनी शिलान्यास करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे माझे मत असल्याचे त्यांनी म्हटले. 

अय्यर यांनी म्हटले की, आर. के. धवन यांना पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती देणे ही  राजीव गांधींनी केलेली सर्वात मोठी चूक होती असेही अय्यर यांनी म्हटले. धवन यांच्या काळात पंतप्रधान कार्यालयाचे राजकीयकरण झाले. त्याआधी पीएमओ कार्यालय हे कोणत्याही राजकारणाशिवाय निर्णय घेण्याचा सल्ला देत होते. 

पीव्ही नरसिंह राव हे किती जातीयवादी विचारांचे होते, यावरही अय्यर यांनी भाष्य केले. राम-रहीम यात्रेच्या वेळी नरसिंह राव यांच्यासोबत झालेला संवाद त्यांनी सांगितला. नरसिंह राव यांनी मला सांगितले की,  त्यांचा माझ्या यात्रेवर कोणताही आक्षेप नाही, परंतु त्यांनी माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येशी असहमत आहे. मी सांगितले की माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत काय चूक आहे असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हा देश हिंदूंचा आहे. मी माझ्या खुर्चीत बसलो असलो तरी भाजपचेही तेच म्हणणे असल्याचे अय्यर यांनी सांगितले. भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नव्हते, तर "पहिले भाजपचे पंतप्रधान" राव होते अशी टीकाही अय्यर यांनी केली. 

पी. व्ही. नरसिंह राव यांनी 1991 मध्ये काँग्रेस सरकारचे नेतृत्व केले. 1991 ते 1996 पर्यंत त्यांनी भारताचे नववे पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्याच कार्यकाळात बाबरी मशीद पाडण्यात आली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget