एक्स्प्लोर

Mani Shankar Aiyar : नरसिंह राव हे काँग्रेसचे नव्हे तर 'भाजपचे पहिले पंतप्रधान'; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची टीका

Mani Shankar Aiyar On PV Narasimha Rao : देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहा राव हे भाजपचे पहिले पंतप्रधान होते, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी केली.

नवी दिल्ली काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर ( Mani Shankar Aiyar) यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव ( PV Narasimha Rao) हे काँग्रेसमधील भाजपचे पहिले पंतप्रधान होते अशी टीका अय्यर यांनी केली. राव यांचा जातीयवादी  विचारांकडे कल असल्याचेही त्यांनी म्हटले. 

परराष्ट्र विभागाचे अधिकारी असलेल्या अय्यर यांनी राजकारणात प्रवेश केला. अय्यर यांच्या 'मेमरीज ऑफ ए मॅव्हरिक... द फर्स्ट फिफ्टी इयर्स (1941-1991) ("Memoirs of a Maverick -- The First Fifty Years (1941-1991)") या आत्मचरित्रपर पुस्तकाचे अनावरण झाले. या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्यासोबत झालेल्या वार्तालापाच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी विविध मुद्यांवर थेट भाष्य केले. यावेळी प्रेक्षकांमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यादेखील उपस्थित होत्या. 

या वार्तालापात त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी असलेल्या संबंधांपासून ते डिसेंबर 1978 पासून ते जानेवारी 1982 या कालावधीत कराचीमध्ये महावाणिज्यदूत म्हणून काम करण्यापर्यंतच्या अनुभवाबाबतही अय्यर यांनी भाष्य केले. प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान बाबरी मशीद प्रकरण हाताळताना राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, अय्यर यांनी शिलान्यास करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे माझे मत असल्याचे त्यांनी म्हटले. 

अय्यर यांनी म्हटले की, आर. के. धवन यांना पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती देणे ही  राजीव गांधींनी केलेली सर्वात मोठी चूक होती असेही अय्यर यांनी म्हटले. धवन यांच्या काळात पंतप्रधान कार्यालयाचे राजकीयकरण झाले. त्याआधी पीएमओ कार्यालय हे कोणत्याही राजकारणाशिवाय निर्णय घेण्याचा सल्ला देत होते. 

पीव्ही नरसिंह राव हे किती जातीयवादी विचारांचे होते, यावरही अय्यर यांनी भाष्य केले. राम-रहीम यात्रेच्या वेळी नरसिंह राव यांच्यासोबत झालेला संवाद त्यांनी सांगितला. नरसिंह राव यांनी मला सांगितले की,  त्यांचा माझ्या यात्रेवर कोणताही आक्षेप नाही, परंतु त्यांनी माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येशी असहमत आहे. मी सांगितले की माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत काय चूक आहे असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हा देश हिंदूंचा आहे. मी माझ्या खुर्चीत बसलो असलो तरी भाजपचेही तेच म्हणणे असल्याचे अय्यर यांनी सांगितले. भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नव्हते, तर "पहिले भाजपचे पंतप्रधान" राव होते अशी टीकाही अय्यर यांनी केली. 

पी. व्ही. नरसिंह राव यांनी 1991 मध्ये काँग्रेस सरकारचे नेतृत्व केले. 1991 ते 1996 पर्यंत त्यांनी भारताचे नववे पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्याच कार्यकाळात बाबरी मशीद पाडण्यात आली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Delimitation Bill : सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget