- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- भारत India Pakistan War Live Updates: जैश-ए- मोहम्मदचा डाव उधळला, 7 दहशतवाद्यांना कंठस्नान
India Pakistan War Live Updates: जैश-ए- मोहम्मदचा डाव उधळला, 7 दहशतवाद्यांना कंठस्नान
Operation Sindoor LIVE Updates: पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतानं थेट इस्लामाबादवर हवाई हल्ला केल्याची माहिती आहे.
India Pakistan War: भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीत. आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले. 14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं. भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआऊट केलं. 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं.
India–Pakistan War LIVE: पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर रात्रभर जोरदार गोळीबार केला. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या अक्षरशः भाजून निघाल्या. दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानचा रात्रभर तोफांचा भडीमार सुरू होता. तो अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलं. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलाय.
India–Pakistan War: भारतानं पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेलं. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली. पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
जम्मूमध्ये पुन्हा ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. शहरात पुन्हा सायरन वाजल्याची माहिती समोर आली आहे.
बीएसएफनं जैश ए मोहम्मदचा डाव उधळून लावला आहे. जैश-ए- मोहम्मदचे 12 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होते त्यापैकी 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलएनं बुलचिस्तानच्या एक तृतियांश भागावर ताबा मिळवल्याची माहिती आहे. पाकिस्तानी सैन्यावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी वरचढ ठरल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. बलुचिस्तानमधील पाक सैनिक तिथून पळाल्याची माहिती आहे.
जम्मू आणि चंदीगडमध्ये वीज पुरवठा सुरळित करण्यात आला आहे. या शहरांमधील ब्लॅक आऊट हटवण्यात आलं आहे.
सांबा सेक्टरमधील दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळण्यात आला आहे. बीएसएफ आणि दहशतवाद्यांमध्ये सांबा खोऱ्यात चकमक झाली. यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव हाणून पाडण्यात आला आहे.
भारताच्या विदेश मंत्रालयाची आणि सैन्य दलाची पत्रकार परिषद सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
सौदी अरेबियाचे विदेश मंत्री इस्लामाबादला जाणार असून पाकिस्तानशी चर्चा करुन त्यांना ताळ्यावर आणणार का हे पाहावं लागेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं असून इस्लामाबाद ते कराचीपर्यंत स्ट्राईक केले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. अजून तणाव वाढवू नका, असं अमेरिकेनं पाकिस्तानला सांगितलंय.
पाकिस्तानी सेनाप्रमुख असीम मुनीरला हटवलं जाण्याची शक्यता : सूत्र
पाकिस्तानकडून शमशाद मिर्जाला सेनाप्रमुख केलं जाण्याची शक्यता :सूत्र
नवी दिल्लीत इंडिया गेटचा परिसर रिकामा केला जात आहे.
सायरन वाजत आहेत
गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आलीय
पोलिसांकडून मेगाफोनवरुन नागरिकांना सूचना
दिल्लीत इंडिया गेट खाली करण्यास सुरुवात झाली आहे. खबरादीराचा उपाय म्हणून इंडिया गेटं रिकामं करण्यास सुरुवात झाली आहे.
भारताकडून पाकिस्तानची 8 हजार एक्स अकाऊंट बंद करण्यात आली आहे. भारतानं अफवा रोखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.
भारतानं राजस्थानमध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडण्यात आलं. यानंतर पाकिस्तानच्या एफ-16 या लढाऊ विमानाच्या पायलटला ताब्यात घेण्यात आलं आहे.
भारतानं थेट इस्लामाबादवर हवाई हल्ला केल्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. भारतानं कारवाईची तीव्रता वाढवल्यानं संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅक आऊट करण्यात आला आहे. लाहोर, सियालकोट, कराची, इस्लामाबदमध्ये हवाई हल्ले करण्यात आले आहेत.
भारतानं पलटवार सुरु केला आहे. लाहोरमध्ये भारताकडून ड्रोन हल्ला करण्यात सुरु झालाय असं कळतंय.
अखनूरमध्ये ब्लॅक आऊट
जम्मू मध्ये ब्लॉक आऊट
पाकिस्तानला जशास तसं उत्तर देणार
पाकिस्तानकडून चुकीची माहिती पसरवण्यात आली.
पहलगाम दहशतवादी हल्ला तणाव वाढण्याचं पहिलं कारण आहे.
भारतीय सैन्यानं त्याचं उत्तर दिलं आहे.
पाकिस्तान अजून दहशतवादी संघटनांना साथ देतोय.
गेल्या 6 दशकात भारतावर पाकिस्ताननं अनेकदा युद्ध लादलं
पाकिस्ताननं 16 भारतीयांची हत्या केली
पाकिस्ताननं काल गुरुद्वारावर हल्ला केला
जम्मू, पठाणकोटमध्ये हल्ल्याचा नापाक प्रयत्न
26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन
भारतानं केवळ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले
आपण दिलेल्या पुराव्यांचा वापर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या बचावासाठी केला गेला
काल केवळ दहशवादी अड्ड्यांवर भारतानं एअर स्ट्राईक केला
पाकिस्तानचा दहशतवादाबाबतचा अनुभव चांगला नाही.
टीआरएफ ही लष्करासोबत जोडलेल संघटना
दहशतवाद्यांच्या अत्यंयात्रेत पाक लष्करी अधिकारी याचा अर्थ काय?
दहशतवादी हल्ल्यांपासून हात झटकण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न
जागतिक दहशतवादाचं केंद्र म्हणून पाकिस्तान विरोधात अनेक पुरावे
आम्ही एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या लष्करी ठाण्यांना निशाणा केलं नव्हतं.
संयुक्त राष्ट्रांनी टीआरएफचा उल्लेख करताच, पाकिस्ताननं आक्षेप घेतला होता.
भारतानं आज सकाळी पाकिस्तानला उत्तर दिलं
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी विदेश मंत्र्यांनी दहशतवादी गटांशी काय संबंध होते हे सांगितलेलं
पाकिस्तानकडून एलओसीवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येतंय
पाकिस्ताननं मिसाईल आणि ड्रोनचा वापर करुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विविध ठिकाणांवरुन याचे अवशेष गोळा करण्यात आले.
आज सकाळी भारतानं पाकिस्तानच्या एअर डिफेन्स रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. भारताची प्रतिक्रिया समान क्षेत्रात समान तीव्रतेनं देण्यात आली. विश्वसनीयरित्या माहिती मिळाली की लाहोर मधील एअर डिफेन्सला निष्क्रिय करण्यात आलं.
7 मे च्या रात्री पाकिस्ताननं भारताच्या उत्तर पश्चिमेतील पाकिस्ताननं अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणांवर लष्करी हल्ल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांना इंटिग्रेडेड काऊंटर यूएएस ग्रिड आणि वायूरक्षक प्रणालीद्वारे निष्क्रिय करण्यात आले. याचे अवशेष सापडले ज्यानं यात पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलं.
7 मे 2025 ला झालेल्या पत्रकार परिषेदत भारतानं आपली प्रतिक्रिया केंद्रीत, संतुलित आणि वादाला उत्तेजन देणारी नव्हती, असं सांगितलं. भारतानं पाकिस्तानच्या लष्करी ठाण्यावर हल्ला केला नाही हे सांगण्यात आलं होतं. भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जाईल असं सांगितलं होतं.
ऑपरेशन सिंदूरवर सचिव विक्रम मिस्री, व्योमिका सिंग, कर्नल सोफिया कुरेशींची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे.
भारतातल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय...एक दोन नव्हे तर भारताच्या लष्कराच्या 15 ठिकाणांवर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिलीय...मात्र म्हणतात ना... बाप बाप होता है... भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले आहेत...भारताच्या एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टममुळे पाकिस्तान तोंडावर पडला...
जम्मू-काश्मीरमध्ये निमलष्करी दलांची संख्या वाढवण्यात आली...सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबीच्या अतिरिक्त कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या संस्थांसह सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य देण्यात आलंय. पाकिस्तानकडून सीमेवर होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर भारताने कारवाई केली आहे.
पाकिस्तानचं लाहोर एअरपोर्ट उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्यात आलंय. कराची एअरपोर्ट आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारकडून घेण्यात आलाय. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची पाकिस्तानमध्ये दहशत पाहायला मिळत आहे.
एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय, नेमकी काम कशी करते? भारतानं पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त केली असेल तर आपल्या इलेक्ट्रॉकि वॉर फेअर सूटचा हा खूप मोठा विजय आहे. एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून, रडारच्या माध्यमातून भारतातून येणारी पाकच्या दिशेनं जाणारी विमानं, मिसाईल पकडण्याची क्षमता प्राप्त होते. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट, पाकिस्तान सोडण्याच्या सूचना. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
ऑपरेशन सिंदूरनंतर (Opration Sindhoor) पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त (Pakistan Air Defence Radars And Systems Destroyed) केल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
भारताचं सुदर्शन चक्र, S-400 क्षेपणास्त्र
S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते.
ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे.
भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे.
ही मिसाईल अत्याधुनिक फाइटर जेट्सलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते.
S-400 एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते.
ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागचा अर्धा तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे मालाड सबवे पाण्याखाली गेला आहे.
मालाड सबवे खाली तीन ते साडेतीन फूट पाणी भरल्यामुळे मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मालाड सबवे बंद केल्यामुळे मालाड पूर्व आणि पश्चिम परिसरात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे...
भारताने उद्ध्वस्त केलेली पाकिस्तानची ह HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणा नेमकी काय?
HQ-9 ही चीनने (CPMIEC) विकसित केलेली सुरक्षा यंत्रणा आहे.
हवाई हल्ले रोखणे आणि प्रतिकार करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते.
एकाचवेळी 100 टार्गेट ट्रॅक करुन ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता या यंत्रणेची होती, हीच यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली
जमिनीवरुन हवेत मारा करणारी (Surface-to-Air Missile – SAM) क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे.
ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते.
2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केला होता.
राफेल, सुखोई आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसारख्या भारताच्या हवाई धोक्यांना रोखसाठी पाकिस्तानने चीनकडून यंत्रणा घेतली होती.
सर्वपक्षीय बैठकीनंतर किरण रिजिजू यांनी प्रतिक्रिया दिली, यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण देश आमच्यासोबत आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सर्व नेत्यांनी त्यांचे आणि पक्षाचे विचार मांडले. माझा असा विश्वास आहे की सर्व नेत्यांनी परिपक्वता दाखवली आहे. जेव्हा देश आव्हानात्मक परिस्थितीतून जात असतो, तेव्हा राजकारणाला स्थान नसते. आपल्या सैन्याने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण देश आमच्यासोबत आहे.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी घाट गावात गाव भोजनाच्या कार्यक्रमानंतर सुमारे ५० जणांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रात्री गावात नगर भोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पहाटेपासून अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी अशा तक्रारी जाणवू लागल्या. यानंतर ग्रामस्थांना घेऊन सरपंच यांनी त्वरित स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. अपघात विभागात उपचार सुरू आहेत.
सध्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर खबरदारी म्हणून भारत सरकारने उत्तर भारतातील 25 विमानतळावरची उड्डाणे हि 10 मे पर्यंत रद्द केली आहे.
त्यामुळे नागपूर सह विदर्भातील जवळपास तीन हजार प्रवाशांना यांचा फटका बसल्याचे ट्रॅव्हल्स एजेंट अससोशिएशन ऑफ इंडियाचे सचिव राजू अकोलकर यांनी सांगितले.
ज्या प्रवाशांची विमाने रद्द झाली त्यांना स्थानिक टॅक्शीची व्यवस्था करून देण्यात येत असून दिल्ली, जयपूर अहमदाबाद या विमानतळावरून त्या प्रवाशांना पर्यायी विमानाची व्यस्था करून दिली जात असल्याचे सांगितले.
यात पर्यटकांसोबत खाजगी व कॊटुंबिक कामानिमित्य गेलेल्या प्रवाशांची पण संख्या भरपूर असल्याचे राजू अकोलकर यांनी सांगितले.
महत्वाचं म्हणजे आमच्या त्रासापेक्षा देश हित महत्वाचे अशी भूमिका प्रवाशांनी घेतल्यामुळे ट्रॅव्हल कंपन्यांचे काम सोपे झाले आहे असल्याचे अकोलकर म्हणाले.
पहलगामच्या घटनेनंतर पर्यटनामध्ये कुठे कमी आली नाही. फक्त पर्यटकांनी काश्मीर ऐवजी पर्यायी स्थळ म्हणून हिमाचल, पुर्वोत्तरराज्य, यासोबत दक्षिणेतील उटी, कुडईकन्नल, कूर्ग व मुन्नार या थंड हवेच्या ठिकाणाला प्राधान्यात देत असल्याचे देखील दिसून येत असल्याचे ट्रॅव्हल एजेंट असोसिएशन ऑफ इंडिया ने सांगितले आहे.
दौंड तालुक्यातील दहिटणे गावातील बापूजी बुवा वस्तीवरील एका 11 महिन्याच्या मुलाला भल्या पहाटे उचलून नेत ठार केल्याची घटना मागील आठवडाभरापूर्वीच घडली होती. यानंतर याच परिसरात दिवसाढवळ्या मुक्तपणे संचार करणाऱ्या एक नवे दोन नव्हे तब्बल तीन बिबट्यांचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरा मध्ये काहीच झालाय. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल तीन बिबटे एका मागोमाग शेताच्या बांधावरून अगदी फिरताना दिसून येत आहेत.स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये या बिबट्यांचा मुक्त संचार कैद केलाय. यामुळे दहिटणे आणि मिरवडी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.सध्या या परिसरात वन विभागाने सात पिंजरे लावले आहेत, पण अजूनही एकाही बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं नाही.
सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री
अमित शाह
राजनाथ सिंह
एस जयशंकर
निर्मला सीतारामन
जे पी नड्डा
किरेन रिजिजू
तेलंगणामध्ये तेलंगणा पोलिसांचे ग्रे हाऊस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक... तेलंगाना पोलिसांचे 5 जवान शहीद 8 नक्षलवाद्यांना कंठ स्नान घालण्यात यश....
तेलंगणा मधील मुलुगु जिल्ह्यातील वाजेडू-पेरूरू जंगलात तेलंगणा पोलिसांच्या 5 जवानांचा मृत्यू झाला आहे..
माओवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत भूसुरुंगाचा स्फोट केला. त्यामध्ये हे 5जवान शहीद झाल्याची माहिती आहे..
नियमित कोम्बिंग करत असलेल्या पोलिसांना लक्ष्य करत माओवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला... त्यानंतर माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार ही केला प्रत्युत्तरात ग्रे हाऊंड्स च्या जवानांनीही नक्षलवाद्यांवर जोरदार गोळीबार केला त्यामध्ये 8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे...
या चकमकी मध्ये काही जवान जखमी झाले असून जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
तेलंगणा पोलिसांकडून अधिकृत माहितीची अजून प्रतीक्षा आहे...
रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांची तारांबळ आणि धावपळ उडाली. मागच्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टी भागात वातावरण ढगाळ आहे. शिवाय काही भागांमध्ये बुधवारी मध्यरात्री वादळ देखील झाले. अर्थात अचानक आलेल्या पावसामुळे शेतीची कामे विशेषता आंबा बागायतदारांच्या नियोजित कामांवर आता परिणाम जाणवणार आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये रिमझिमम हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील हजेरी लावत आहे. अर्थात पावसामुळे काही काळ वातावरण गारवा असला तरी त्यानंतर मात्र प्रचंड उकाडा जाणवत आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर भारताकडून देशभरातील 27 विमानतळं बंद करण्यात आली आहेत. यामध्ये श्रीनगर, जम्मू, चंडीगढ़, अमृतसर, लुधियाना, पटियाला, बठिंडा, हलवारा, पठानकोट, कुल्लू, शिमला, गग्गल, धर्मशाला, किशनगढ़ आणि जैसलमेर या विमानतळांचा समावेश आहे.
भारताकडून ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर. राफेल विमानांमधून स्काल्प मिसाईल्स डागण्यात आली. याशिवाय, इस्रायली बनावटीच्या ड्रोन्सचाही वापर करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये असलेल्या अणुबॉम्बविषयी बोलताना दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं तर पाकिस्तान अणुबॉम्ब टाकेल अशी पोकळ धमकी देत असतो. याच अनुषगांने या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला. यावर नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला टोला लगावत भाष्य केलं. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
ऑपरेशन सिंदूरनंतर पुण्यातून पाच शहरांसाठीची उड्डाणे तात्पुरती रद्द. एअर स्ट्राइक केल्यानंतर देशातील सीमेलगतची विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी तात्पुरती बंद. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अमृतसर, चंडीगड, किशनगड, राजकोट आणि जोधपूर या पाच शहरांसाठी काल पासून विमानसेवा रद्द करण्यात आली. या निर्णयाचा फटका पुण्यातून या शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना बसलाय. तिकिटाची पूर्ण रक्कम परत मिळण्याची किंवा पर्यायी उड्डाणाची सुविधा विमान कंपन्यांनी दिली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. १० मेपर्यंत प्रवासी पुण्यातील विमानसेवा वाहतुकीसाठी बंद राहणार
केंद्र सरकारने आज सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमित शाह आणि किरेन रिजीजू उपस्थित असतील. या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत हजेरी लावतील. अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल, शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे हे उपस्थित असतील.
भारत-पाकिस्तान सीमारेषेला लागून असलेली सियालकोट आणि छंब सेक्टरमधील अनेक गावे खाली करण्यास पाकिस्तानने सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सैन्य काल रात्रभर या भागात गावं खाली करत होते.
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची तंतरली! कराची, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी रात्रभर काळोखाच्या विळख्यात. वाचा सविस्तर बातमी
'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतात पुन्हा चमकलं सोनं; किमतींत मोठी वाढ, दर गेले थेट एक लाख पार. वाचा सविस्तर बातमी
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मान्य केलंय की, भारताचा हल्ला भयानक होता. भारताच्या 80 लढाऊ विमानांनी पाकिस्तानवर हल्ला केला, तसेच, आम्ही रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ, असंही पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले आहेत.
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि इराणध्ये उच्चस्तरीय बैठक होणार आहे. इराणेच परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास हे नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. भारत आणि इराण यांच्यात जॉईंट कमिशन मिटिंग होणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी पाकिस्तानी संसदेत भाषण केले. यावेळी त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 37 दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
पाकिस्तान विरोधात होणाऱ्या संभाव्य लढ्यात मलाही लढू द्या मी पुन्हा हवाई दल मध्ये रुजू होऊ इच्छितो अशी मागणी हवाई दलातील एका निवृत्त सार्जेंट ने हवाईदल प्रमुखांना केली आहे. संदेश सिंगलकर यांनी हवाई दरात 16 वर्ष त्यांची सेवा दिली आहे... ते हवाई दलाच्या मिसाईल तंत्रज्ञानावर काम करत होते आणि कारगिल युद्धातही सहभागी झाले होते.. 2004 मध्ये कौटुंबिक कारणांसाठी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर आता पुन्हा पाकिस्तान सोबत लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे
रात्री पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन. भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर. कुपवाडा , बारामुल्ला , उरी आणि अखनूर परिसरातील सीमेपलीकडून पाकिस्तानचा गोळीबार. बंदूक आणि आर्टिलरीचा वापर करून पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन
सरकारी सूचनेनुसार लावण्यात आलेल्या हवाई क्षेत्र निर्बंधांमुळे इंडिगोने 165 हून अधिक उड्डाणे रद्द
ही उड्डाणे अमृतसर, बिकानेर, चंदीगड, धर्मशाळा, ग्वाल्हेर, जम्मू, जोधपूर, किशनगढ, लेह, राजकोट आणि श्रीनगर येथील विमानतळांवरून होणारी होती
ही उड्डाणे 10 मे 2025 रोजी सकाळी 05.29 वाजेपर्यंत रद्द
ज्यांचे उड्डाणे प्रभावित झाली आहेत, त्या प्रवाशांना पुढील उपलब्ध उड्डाणावर पुनर्निर्धारित करण्याचा किंवा तिकीट रद्द करून पूर्ण परतावा घेण्याचा पर्याय उपलब्ध
लडाखमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी मोफत निवासाची सुविधा
लडाखमधील उड्डाणांमध्ये झालेल्या अडथळ्यांमुळे अडकलेल्या पर्यटकांना दिलासा देण्यासाठी, ऑल लडाख हॉटेल आणि गेस्ट हाऊस असोसिएशन (ALHGHA) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ALHGHA च्या अध्यक्ष रिग्झिन वांग्मो लाचिक यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ज्यांचं बाहेर जाण्याचं फ्लाइट रद्द झालं आहे, अशा पर्यटकांना त्यांनी राहात असलेल्या हॉटेल्समध्येच मोफत निवास सुविधा दिली जाणार आहे.
ही सुविधा ALHGHA च्या सर्व सदस्य हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसेसनी एकत्रितपणे अंमलात आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना शोधलं पाहिजे. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही. अमेरिकेनं त्यांच्यावरच्या हल्ल्याला युद्धानं उत्तर दिलं नाही. अतिरेकी ठार मारले. देशात युद्ध परिस्थिती आणायची आणि मॉक ड्रील करायचं, सायरन वाजवायचं वगैरे वगैरे. मुळात ही गोष्ट का घडली? हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करावा. पाकिस्तान काय आधीच बरबाद झालेला आहे, तुम्ही काय त्याला अजून बरबाद करणार? ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला ते अजून सापडले नाहीत, हजारो पर्यटक जात होते तिथं सुरक्षा का नव्हती? हे प्रश्न महत्वाचे. आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन करुन त्यांना हुडकून गरजेचं आहे. एअर स्ट्राइक करुन, लोकांना वेगळीकडं भरकटवून, युद्ध हा त्याचा पर्याय होऊ शकत नाही. सरकारच्या चुका तुम्ही दाखवल्याच पाहिजेत. हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान सौदीत होते, दौरा अर्धवट सोडून बिहारला गेले, प्रचाराला. ते करायची गरज नव्हती. केरळला जाऊन अदानींच्या पोर्टचं उद्घाटन केलं. मुंबईत फिल्म इंडस्ट्रीचा वेव्ज कार्यक्रम केला. इतकी गंभीर स्थिती आहे तर मग या गोष्टी टाळत्या आल्या नसत्या का? मॉक ड्रील, एअर स्ट्राइक हे काही उत्तर नाही. ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्यांना हुडकून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. मॉक ड्रील पेक्षा कोम्बिग ऑपरेशन करा. पोलिसांना सगळ्या गोष्टी माहितीयत. आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीत आणि युद्धाला सामोरं जातोय. नाक्यानाक्यावर ड्रग्ज मिळतायत. ते येतायत कुठून?का येतायत?लहान लहान पोरं ड्रग्ज घेतायत. शाळेतली पोरं ड्रग्ज घेतायत. ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही. तुम्ही नेमकी काय पावलं उचलतायत, इतके दिवस जे कार्यक्रम मोदींनी घेतले त्याची गरज नव्हती.
भारताच्या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाला, तर दहशतवादी भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला. ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा समावेश होता.
Indian Army PC on Operation Sindoor : भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. त्यामुळे आम्ही त्यावर हल्ला केला. परिणामी इतर कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही.
Operation Sindoor Live: 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान निष्पाप नागरिकांची काळजी घेण्यात आली' अशी माहिती भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे.
Army Operation In Pakistan After Pahalgam Attack LIVE: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे. हल्लेखोरांचीही ओळख पटली आहे. आमच्या गुप्तचर यंत्रणेने हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांबद्दल माहिती गोळा केली आहे. या हल्ल्याचा पाकिस्तानशी थेट संबंध आहे. किंबहुना पाकिस्तान हा दहशतवादाचा बालेकिल्ला असल्याची प्रतिक्रिया विक्रम मिसरी यांनी दिली आहे.
Operation Sindoor Live Updates: विक्रम मिस्री म्हणाले, हल्ल्याच्या पंधरा दिवसांनंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी उलट आरोप केले. भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात. म्हणून त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. मुख्य म्हणजे दहशतवाद्यांची ओळख पातळी असून त्याला कठोर शासन होईल, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे.
Operation Sindoor: भारतीय लष्करानं (Indian Army) पाकिस्तानातील (Pakistan) तब्बल 9 दहशतवादी तळांवर (Terrorist Base) हल्ला करुन, पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापतींना चोख प्रत्युत्तर तर दिलं, पण त्यासोबतच पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मृत्यूमुखी पडलेल्या 26 पर्यटकांनाही न्याय दिला आहे. अशातच भारताच्या एअर स्ट्राईकनंतरही (India Air Strike 9 Terror Bases In Pakistan) पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपल्या कुरापती करण्याचा प्रयत्न केलेला. पण, भारतीय सैन्यानं इथेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत माघारी धाडलंय.
Operation Sindoor : जम्मू पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून बदला घेतला. आज (बुधवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. ही कारवाई 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत करण्यात आली आणि विशेष म्हणजे भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी संयुक्तपणे यात भाग घेतला. 1971च्या युद्धानंतर भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. भारतीय हवाई दलाने आज (बुधवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
China on Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या परिस्थितीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे. सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोघांनाही आवाहन करतो. असेही चीन म्हणाला आहे.
China on Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या परिस्थितीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे. सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोघांनाही आवाहन करतो. असेही चीन म्हणाला आहे.
Operation Sindoor : ज्या क्षणांची प्रतीक्षा तमाम भारतीय करत होते अखेर तो क्षण आलाच. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय (India Army) सेनेनं बदला घेतला आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मिरमधील (Pakistan-Occupied Kashmir) अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय वायुदलानं (Indian Air Force) आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक (Air Strike) करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terrorist Attack) बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं. मात्र हे केवळ एका मोहिमेचे नाव नसून या नावामागे अनेक अर्थ दडल्याचे सांगितले जातंय. नाव देण्यामागे नेमकं कारण काय? हे आता आपण जाणून घेऊ.
Operation Sindoor: भारताने दहशतवादाविरुद्ध (India Air Strike On Pakistan) मोठी कारवाई केली आहे. आज (6 मे) मध्यरात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने पाकिस्तानवर थेट एअर स्ट्राइक केला. त्याला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नाव देण्यात आलं आहे. हे तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन होतं. पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते. 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. 9 च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत.
Sanjay Gaikwad : केवळ चार आतंकवादी मारून हे थांबवायचे अस न करता ही लढाई आता निर्णायक झाली पाहिजेत. गेल्या सत्तर वर्ष पासून जो त्रास झाला तो आंतकवाद्याची पीओके ताब्यात घेतला पाहिजेत. भारताने आता निर्णायक लडाई लढावी, असे घणाघाती वक्तव्य शिवसेनेचे बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोलताना केले आहे. विरोधकांना लाज शरम वाटायला पाहिजे की युद्ध करत असताना तयारीसाठी वेळ लागतो हे विरोधकांच्या बौध्दिक दिवाळखोरीचे लक्षण आहे, अशी घणाघाती टीका संजय गायकवाड यांनी विरोधकांवर केली आहे.
Operation Sindoor: भारतीय सैन्य दलानं पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मृत्यूमुखी पडलेल्या 26 जणांच्या मृ्त्यूचा बदला घेतला. भारतीय सेनेनं (Indian Army) पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मिरमधील (Pakistan-Occupied Kashmir) दहशतवाद्यांचे तब्बल नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त केले असून 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) फत्ते केलं आहे. भारतीय सेनेनं तब्बल नऊ दहशतवादी स्थळांवर लक्ष्य साधलं, यामध्ये जन्श-ए-मोहम्मदचं हेडक्वॉर्टसही (Jansh-e-Mohammadchan Headquarters) उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं आहे. पण, भारतीय सैन्याच्या टार्गेटवर पाकिस्तानचं बहावलपूरवरच (Bahawalpur) का आलं? (Why Indian Army Choose Bahawalpur?) जाणून घेऊयात सविस्तर...
सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Operation Sindoor Live Updates: पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terrorist Attack) भारताने दिलेला प्रतिसाद 'तात्पुरता आनंद' असल्याची प्रतिक्रिया लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे. त्यात ते पुढे म्हणाले की 'याचा बदला कायमस्वरूपाच्या दुःखाने घेतला जाईल.'ISPR च्या अधिकृत निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, 'पाकिस्तान स्वतःच्या वेळेनुसार आणि ठरवलेल्या ठिकाणी या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल' आणि भारताच्या हल्ल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, या हल्ल्याला 'अनुत्तरीत सोडले जाणार नाही'.'भारताने तीन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद... पाकिस्तानी हवाई दलाची सर्व विमाने हवाई हल्ले करत आहेत. सर्व हल्ले भारताने स्वतःच्या हवाई हद्दीतून केले आहेत,' असे आयएसपीआरच्या निवेदनात पुढे म्हटले आहे. 'पाकिस्तान स्वतःच्या निवडीच्या वेळी आणि ठिकाणी त्याचे उत्तर देईल. ते अनुत्तरीत राहणार नाही. भारताच्या तात्पुरत्या आनंदाची जागा सततच्या दुःखाने घेतली जाईल,' असे त्यात म्हटले आहे.
Pakistan ISPR on Operation Sindoor : अखेर भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचं अचूक लक्ष्य साधलं. दरम्यान, भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (Inter-Services Public Relations) च्या महासंचालकांनी प्रतिक्रिया देत हा हल्ला 'तात्पुरता आनंद' असल्याचे म्हटले आहे.
India Air Strikes On Pakistan LIVE: संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की आमची कारवाई केंद्रीत,स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्धवस्त करण्यात खूप संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय 25 आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईळ. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ, असंही संरक्षण मंत्रालयानं
Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर आणि पाकिस्तान भारतीय सेनेनं अखेर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलाने आज (बुधवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेसाठी ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय वायुदलाकडून जैश ए मोहम्मद, हिजबुल मुज्जाहिद्दीन, लश्कर ए तोयबाचे तळ उद्धवस्त, मध्यरात्री दीड वाजता कारवाई करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यामध्ये एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामधील 6 जण महाराष्ट्रातील होते, दरम्यान भारताने केलेल्या या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर हल्ल्यात पुण्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा
'ऑपरेशन सिंदूर'ची वैशिष्ट्ये
1. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला
2. भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकची कबुली
3. पाकव्याप्तच नव्हे पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त
4. दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध
5. ९ तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा
6. भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजासुद्धा नाही
7. आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारताचे हल्ले
Beed News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज एप्लीकेशनवर सरकारी पक्षाने म्हणणे मांडल्यानंतर युक्तिवाद होईल. तसेच विष्णू चाटेला बीड कारागृहात आणण्या संदर्भात केलेल्या अर्जावर देखील युक्तिवाद होईल.
तर देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मूळ फिर्यादी असलेल्या शिवराज देशमुख यांचे म्हणणे न्यायालयाने मागितले आहे. मागील वेळी शिवराज देशमुख यांना नोटीस मिळाली नव्हती. आता त्यांनाही नोटीस प्राप्त झाली असेल तर वकील त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. साधारण सकाळी 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल.
Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भरतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान हा हल्ला होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतर ही कुठलीही कठोर कारवाई होत नसल्याने भरतीयांमध्ये अस्वस्थता ही दिवसागणिक वाढत होती. तर दुसरीकडे सीमेवर तनाव देखील अधिक तीव्र होत होता. अशातच तमाम भारतीयांची मानत घर करून राहिलेली चीड आणि या भ्याड हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यदलानं घेतला आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर हल्ला केला आहे. बुधवारी(6 मे 2025) मध्यरात्रीच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करत ही एअर स्ट्राईक सक्सेसफूल केलंय. दरम्यान ही 9 ठिकाणं नेमकी कोणती हे जाणून घेऊया.
सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Operation Sindoor: भारतीय सेनेनं अखेर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (7 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं अचूक लक्ष्य साधलं. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
India Pakistan Tensions Operation Sindoor: अखेर तो क्षण आलाच, भारतीय (India Army) सेनेनं पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मिरमधील (Pakistan-Occupied Kashmir) अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय वायुदलानं (Indian Air Force) आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक (Air Strike) करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terrorist Attack) बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं.
Operation Sindoor नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलांकडून ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले आहेत. भारतीय सैन्य दलानं जस्टीस इज सर्वड असं ट्वीट केलं आहे. भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी भारतानं पाकिस्ताच्या पाच ठिकाणांवर हल्ले केले आहेत. भारताकडून करण्यात आलेल्या युद्धासारख्या कृतीचं जोरदार उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे. जोरदार उत्तर दिलं जाईल. संपूर्ण पाकिस्तानी देश सशस्त्र दलांसोबत उभा आहे. पाकिस्तान देशाचं मनोबल उच्च आणि भावना देखील जोरात आहेत. पाकिस्तानी राष्ट्र आणि पाकिस्तानी लष्कर चांगल्या प्रकारे जाणते की दुश्मनांचा सामना कशा प्रकारे करावा. दुश्मन त्यांच्या इराद्यामध्ये यशस्वी होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शहबाझ शरीफ यांनी दिली.
सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा
वॉशिंग्टन : भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच केलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारताच्या सैन्य दलांकडून पाकिस्तान आणि पाकव्यप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करण्यात आले आहेत. ही कारवाई मध्यरात्री दीडच्या सुमारास करण्यात आली. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथे स्ट्राइक करण्यात आले. भारतानं जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला आहे. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये भारताचे एअरस्ट्राईक इट इज शेम अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करावा, असा आग्रह त्यांनी केला आहे.
Operation Sindoor नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलानं जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर स्ट्राइक केला आहे. संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ऑपरेशन सिंदूर सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.
सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई विमानतळावरील विमानात बाॅम्बची धमकी
सहार एअरपोर्टवरील हाॅटलाईनवर धमकीचा फोन
फोनवर इंडिगो विमानात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन
हे विमान चंदीगढ ते मुंबई येणार होते
हे विमान रात्री उशिरा मुंबई विमानतळ येथे लॅड करण्यात आले
संशयास्पद काही आढळून आले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत
Army Operation In Pakistan After Pahalgam Attack LIVE: ऑपरेशन सिंदुर यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक, सोशल मीडियावर जय हिंद आणि भारत माता की जयचे नारे
Operation Sindoor Live Updates: भारतीय लष्कराची आज सकाळी दहा वाजता दिल्लीत पत्रकार परिषद, ऑपरेशन सिंदूर नेमकं काय होतं, भारतीय सैन्याने कोणती कारवाई केली याची माहिती देणार
India Strikes LIVE: भारतीय लष्कराकडून पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ कॅम्प उद्ध्वस्त, तीन मोठ्या दहशतवादी संघटनांसह पाकला घडवली अद्दल.
India Air Strikes 9 Pakistan Terror Bases: पाकिस्तानात भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद्यांची नऊ तळं उध्वस्त, बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईक.
Operation Sindoor Live Updates: अखेर भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचं अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
पार्श्वभूमी
Operation Sindoor LIVE Updates : भारतानं (India Pakistan Tensions) ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरु केल्यानंतर पाकिस्ताननं (Pakistan) भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याच प्रयत्न केला होता. भारतानं तो प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आज रात्री पाकिस्ताननं जम्मू काश्मीर, पंजाब (Punjab), राजस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो भारतानं नाकाम केला आहे. भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं (S-400 Air Defense System) पाकिस्तानचं ड्रोन (Pakistan Drone), मिसाईल आणि लढाऊ विमानं (Fighter Jets) पाडली आहेत. भारतानं इस्लामाबाद (Islamabad), कराची, लाहोरमध्ये (Lahore) प्रतिहल्ले केले आहेत.
पाकिस्तानने राजस्थानवर केलेल्या ड्रोन हल्ला उधळला असून राजस्थानच्या गंगा नगरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानकडून केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळल्याची माहिती मिळत आहे.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भल्या सकाळी जम्मूकडे रवाना झालेत. रात्री पाकिस्तानकडून झालेल्या अयशस्वी ड्रोन हल्ल्याचा आढावा घेण्यासाठी जात असल्याचं ट्विट अब्दुल्लांनी केलं. जम्मू आणि इतर भागात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
भारताच्या तिन्ही दलांकडून पाकिस्तानची कोंडी, एलओसीवर भारतीय लष्कराचा गोळीबार, पाकिस्तांनी शहरांवर एअर स्ट्राईक तर कराची बंदरात आयएनएस विक्रांतकडूनही धमाका करण्यात आला आहे.