एक्स्प्लोर

Odisha Tragedy : ओडिशा दुर्घटनेनंतर हजारो प्रवाशांकडून रेल्वे तिकीटे रद्द, काँग्रेसचा दावा; IRCTC ने सांगितले सत्य

 काँग्रेसने दावा केला होता की, ओडिशात झालेल्या  रेल्वे अपघातानंतर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भीतीमुळे अनेक प्रवासी रेल्वे तिकिटे रद्द करत आहेत. यासंदर्भात IRCTC खरी परिस्थिती सांगितली आहे. 

Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर (Balasor) येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. हा अपघात घडवून आणला आहे असेही म्हणले जात आहे. तसेच या दुर्घटनेला जातीय रंग देण्याचा ही प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर अनेक लोक विविध दावे करत आहेत. अशातच काँग्रेसने ट्वीट (Tweet) केले, ज्यात त्यांनी दावा केला आहे की, रेल्वे अपघातानंतर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भीतीमुळे अनेक प्रवासी आपले रेल्वे तिकिटे रद्द करत आहेत. यावर IRCTC ने उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा दावा चुकीचा असल्याचं आयआरसीटीसीने म्हटलं आहे.

IRCTC ने काय सांगितले? (What IRCTC Said)

IRCTC ने सांगितले आहे की, काँग्रेसने केलेला दावा हा चुकीचा आहे. याउलट प्रवासी तिकीट रद्द करत नाहीत तर 1 जून रोजी तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या 7.7 लाख होती जी 3 जून रोजी 7.5 लाख इतकी झाली आहे.

काँग्रेसने काय दावा केला होता?

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सोमवारी संध्याकाळी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते भक्त चरण दास म्हणाले होते की, "असा रेल्वे अपघात यापूर्वी कधीही झाला नव्हता. शेकडो लोकांना जीव गमवावा लागला तर हजारांहून अधिक लोक जखमी झाले. ही अतिशय दु:खद घटना आहे. अपघातानंतर भीतीमुळे हजारो लोकांनी तिकीटे रद्द केली आहेत. ट्रेनमधून प्रवास करणं त्यांना सुरक्षित वाटत नाही." यावर IRCTC ने वरील उत्तर दिले.

काँग्रेसने आता मोदी सरकारला घेरले आहे.

काँग्रेसने (Congress) या घटनेवरुन मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, सुमारे 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि आजही या मृत्यूंना कोण जबाबदार आहे याचे उत्तर नाही? या देशातील सामान्य माणूस रेल्वेने प्रवास करतो. उद्या तुम्ही, तुमचे कुटुंब आणि देशातील जनता ट्रेनमध्ये प्रवास कराल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही हा प्रवास तुमच्या जबाबदारीवर करत आहात, यात सरकारची कोणतीही जबाबदारी नाही. ते पुढे म्हणाले, रेल्वेमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारन राजीनामा द्यावा, लक्ष वळवण्यासाठी नवनवीन थेअरी तयार केल्या जात आहेत. या सरकारमध्ये जबाबदारीचा 'ज' ही नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

Indian Railways : भारतीय रेल्वेने 2017-2022 दरम्यान सुरक्षेवर एक लाख कोटी खर्च केले, कागदपत्रांमधून माहिती समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Banerjee Attack: अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, 'गरज पडल्यास आम्ही...'
अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, 'गरज पडल्यास आम्ही...'
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Pune Crime News : पुणे गुवाहाटी विमानाच्या बाथरूममध्ये सापडली चिठ्ठी अन्...; विमान तातडीने निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तपासलं, प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे गुवाहाटी विमानाच्या बाथरूममध्ये सापडली चिठ्ठी अन्...; विमान तातडीने निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तपासलं, प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Embed widget