एक्स्प्लोर
कर्नाटकात महाराष्ट्राच्या मंत्र्यांना प्रवेशबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा फतवा

बेळगाव : 'जय महाराष्ट्र' म्हटल्यास पद रद्द करण्याचा अजब फतवा कर्नाटक सरकारचे मंत्री रोशन बेग यांनी काढला. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकच्या हद्दीत प्रवेशबंदीचा फतवा बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. बेळगावात उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत हे देखील सहभागी होणार आहेत. मात्र बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी दीपक सावंत आणि रावते या दोघांनाही बंदी घालण्यात आली आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या कारणामुळे बेळगावचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी प्रवेशबंदीचा फतवा काढला आहे. 24 ते 27 मे या काळात ही प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूरचा कार्यक्रम आटोपून मंत्री बेळगावला जाणार आहेत. मात्र त्यापूर्वीच सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाकर रावते आणि दीपक सावंत बेळगावात प्रवेश करणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काय आहे प्रकरण? कर्नाटकात बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी सुरु आहे. लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र बोलल्यास किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सोमवारी दिला होता. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या रोशन बेग यांनी ही माहिती पत्रकारांना दिली होती. आगामी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद रद्द करणार, असा नवीन कायदा कर्नाटक सरकार अंमलात आणणार आहे. बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेणार असल्याचंही रोशन बेग यांनी स्पष्ट केलं होतं. एकीकडे अल्पसंख्यांक घटनात्मक अधिकार देण्यास टाळाटाळ सुरु असताना, एकीकरण समितीच्या लोकप्रतिनिधींची अशीही गळचेपी होणार आहे. त्यामुळे आता मराठी प्रेम तसंच महाराष्ट्र प्रेम दाखवणं लोकप्रतिनिधींच्या अंगलट येणार आहे. शिवसेना-मनसेचं चोख उत्तर कर्नाटकच्या नगर विकासमंत्री रोशन बेग यांना शिवसेनेनं चोख प्रत्युत्तर दिलं. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात येणाऱ्या कर्नाटक राज्याच्या बसगाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून त्या बस कर्नाटकात परत पाठवल्या आहेत. जय महाराष्ट्रचे स्टिकर कर्नाटक परिवहनच्या बसवर लावल्यानं पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. संबंधित बातम्या :
अरेरावीची भाषा खपवून घेणार नाही, चंद्रकांत पाटलांचा रोशन बेगना सज्जड दम
शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टिकर्स
‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद रद्द, बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















