एक्स्प्लोर

देशातील टोलनाके वर्षभरात हटवणार, टोलसाठी GPS Tracker लावणार;  नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा

टोल वसूलीसाठी (toll naka) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रत्येक गाडीमध्ये GPS Tracker लावण्यात येणार आहे. त्यामुळे जेवढा प्रवास केला जाईल तेवढाच टोल आता आकारण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. 

नवी दिल्ली : येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद केले जातील, आता प्रत्येक गाडीमध्ये जीपीएस व्यवस्था बसवण्यात येणार असून त्या आधारे टोलची वसूली करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासामध्ये खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. 

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "या आधीच्या सरकारांनी अनेक ठिकाणी, अनेक शहरांत अन्यायी पद्धतीने टोलनाके बसवले. त्या आधारे टोल चोरी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. त्यामुळे येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद करण्यात येतील. आता टोल वसूलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रत्येक गाडीमध्ये GPS Tracker लावण्यात येणार आहे. त्यामुळे जेवढा प्रवास केला जाईल तेवढाच टोल आता आकारण्यात येणार आहे."

या आधी डिसेंबरमध्ये या योजनेची माहिती देताना गडकरी म्हणाले होते की, "येत्या दोन वर्षांत भारत टोल व अडथळ्यांपासून मुक्त होणार आहे. सरकार यासाठी जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) प्रणाली आणणार आहे. येत्या दोन वर्षांत वाहनांचा टोल तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातूनच वजा केला जाणार आहे. टोलसाठी जीपीएस प्रणालीचे काम चालू आहे, ज्यामध्ये प्रवास केलेल्या अंतरावरुन टोल आपोआपच बँक खात्यातून वजा करण्यात येईल."

रशियन सरकारच्या मदतीने आम्ही लवकरच जीपीएस (GPS) सिस्टमचे काम पूर्ण करू असे सांगताना गडकरी म्हणाले होते की, "ही योजना अंमलात आणल्यानंतर दोन वर्षांत भारत पूर्णपणे टोलमुक्त होईल. यावेळी देशातील सर्व व्यावसायिक वाहने ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज आहेत. त्याचबरोबर सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम तंत्रज्ञान बसविण्यासाठी सरकार वेगाने काम करेल. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने वाहनांचा मुक्त संचाराकरीता टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य केला आहे. फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर इंधन बचत होत असून प्रदुषणही कमी झाले आहे."

गडकरींच्या या घोषणेमुळे आता टोल नाक्यावर टोल भरण्यासाठीच्या भल्यामोठ्या रांगेपासून प्रवाशांची सूटका होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळही वाचणार आहे. 

संबंधित बातम्या : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 February 2025Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानीSpecial Report | Uddhav Thackeray | ठाकरेंकडून शिंदेंना शिंगावर, फडणवीसांना डोक्यावर?Zero Hour | Swarget Bus Depo News | 'शिवशाही'त बलात्कार एसटीचं 'वस्रहरण',झीरो अवर शोमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
Embed widget