एक्स्प्लोर

भारतरत्न नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'असा' सन्मान... नव्या संसदेचं उद्धाटन आणि सावरकरांच्या जन्मदिनाचा संबंध, योगायोग की मोदी सरकारची रणनीती?

New Parliament Building: नव्या संसदेच्या इमारतीच्या उद्धाटनाचा मुहूर्त आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिन एकाच दिवशी आहे. 

मुंबई: तब्बल 1200 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीच्या (New Parliament Building) उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या नव्या संसदेचं उद्धाटन होणार आहे. नव्या भारताची ताकद दर्शवणाऱ्या नव्या संसदेच्या इमारतीचे उद्धाटन 28 मे याच दिवशी करण्यामागचं कारण मात्र स्पष्ट करण्यात आलं नाही. पण याच दिवशी भाजपसाठी स्मरणीय असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Vinayak Damodar Savarkar Birth Anniversary) जन्मदिन साजरा केला जातो. त्यामुळे सावरकरांच्या जन्मदिनादिवशीच नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात येत आहे. हा निव्वळ योगायोग आहे की मोदी सरकारची काही रणनीती आहे यावर आता चर्चा सुरू झाली आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकमधील भगूर या गावी झाला. सुरुवातीला 'मित्रमेळा' आणि नंतर 'अभिनव भारत' या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा सुरू केला. नंतरच्या काळात परदेशात जाऊन ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी स्वातंत्र्यलढा सुरू ठेवला. तुरुंगातून सुटका झाल्यांनंतर त्यांनी सामाजिक कामांवर भर दिला. पण महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये नथूराम गोडसेसोबत त्यांचं नाव आलं. 

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीच्या पत्रांवरुन आरोपांची राळ उठवली. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि भाजप नेहमी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भाजपला सावरकरांचा एवढा आदर आहे तर त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा असं आव्हान काँग्रेसमधील काही नेत्यांकडून सातत्याने दिलं जातं. 

काँग्रेसकडून सावरकरांवर होणाऱ्या सातत्याने टीकेवर आता मोदी सरकारने हा मास्टरस्ट्रोक दिल्याची चर्चा आहे. भारतरत्न (Bharatratna) नव्हे तर त्याहून मोठा सन्मान स्वातंत्र्यवीर सावरकरांचा करण्यात येणार असून त्यामुळेच नव्या संसदेच्या उद्धाटनाचा मुहूर्त हा 28 मे रोजी ठेवला असल्याची चर्चा आहे. 

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्धाटन हे 28 मे रोजी ठेवणं आणि सावरकरांची जयंती त्याच दिवशी असणं हा काही निव्वळ योगायोग नक्कीच नाही. त्यामागे मोदी सरकारची मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे. त्यातून काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या टीकेला सरकारच्या कृतीतून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न असेल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतंही काम असंच करत नाहीत, त्यामागे काहीतरी मोठं कारण नक्कीच असतं. ब्रिटिशकालीन वास्तू असलेली जुनी संसद आता नव्या ठिकाणी स्थलांतरीत होणार असून त्यासाठी तब्बल 1200 कोटी रुपयांचा सेंट्रल व्हिस्टा हा प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यातील नव्या संसदेची इमारत हे मोदी सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे याच्या बांधणीवर सुरुवातीपासूनच त्यांचं बारीक लक्ष होतं. 

संसदेची ही नवी इमारत चार मजली असून त्याला सहा प्रवेशद्वार आहेत. त्यामध्ये लोकसभेचे एक हजार तर राज्यसभेचे 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे. नव्या संसदेमध्ये प्रत्येक खासदाराच्या समोर एक छोटेखानी टेबल असून त्यावर सर्व आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा आहेत. 

काही दिवसांपूर्वीच स्वत: पंतप्रधानांनी या कामाचा आढावा घेतला होता. त्याचवेळी नव्या संसदेचा पहिला लूक समोर आला होता. त्यानंतर आता त्याच्या उद्धाटनाची तारीश समोर आली आहे. 

ही बातमी वाचा :

 

एबीपी माझामध्ये असोसिएट प्रोड्युसर म्हणून गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जे विष पेरलं जात आहे ते ओळखा; मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, तत्त्व, विचारांसाठी माझी मरण्याची तयारी; बाळासाहेब थोरांताचा किर्तनकाराच्या 'नथुराम' स्टाईल धमकीवर एल्गार
जे विष पेरलं जात आहे ते ओळखा; मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, तत्त्व, विचारांसाठी माझी मरण्याची तयारी; बाळासाहेब थोरांताचा किर्तनकाराच्या 'नथुराम' स्टाईल धमकीवर एल्गार
Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठली; राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून विसर्ग, जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद अन् पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु?
कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठली; राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून विसर्ग, जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद अन् पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु?
शेलारजी फार डिंग्या मारू नका, बेस्ट निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केलं, तेव्हा गपगार गोधडीत पडा; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
शेलारजी फार डिंग्या मारू नका, बेस्ट निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केलं, तेव्हा गपगार गोधडीत पडा; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
Bhiwandi Crime News: भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाची हत्या, खासदार सुरेश म्हात्रेंचा सीडीआर तपासण्याची मागणी, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाची हत्या, खासदार सुरेश म्हात्रेंचा सीडीआर तपासण्याची मागणी, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जे विष पेरलं जात आहे ते ओळखा; मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, तत्त्व, विचारांसाठी माझी मरण्याची तयारी; बाळासाहेब थोरांताचा किर्तनकाराच्या 'नथुराम' स्टाईल धमकीवर एल्गार
जे विष पेरलं जात आहे ते ओळखा; मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, तत्त्व, विचारांसाठी माझी मरण्याची तयारी; बाळासाहेब थोरांताचा किर्तनकाराच्या 'नथुराम' स्टाईल धमकीवर एल्गार
Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठली; राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून विसर्ग, जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद अन् पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु?
कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठली; राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून विसर्ग, जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद अन् पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु?
शेलारजी फार डिंग्या मारू नका, बेस्ट निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केलं, तेव्हा गपगार गोधडीत पडा; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
शेलारजी फार डिंग्या मारू नका, बेस्ट निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केलं, तेव्हा गपगार गोधडीत पडा; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
Bhiwandi Crime News: भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाची हत्या, खासदार सुरेश म्हात्रेंचा सीडीआर तपासण्याची मागणी, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाची हत्या, खासदार सुरेश म्हात्रेंचा सीडीआर तपासण्याची मागणी, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
गर्लफ्रेंडचा माजी सरपंचावर लग्नासाठी दबाव, सात तुकडे करून तीन विहिरीत फेकले, उर्वरित सात किमी लांब नदीत फेकले
गर्लफ्रेंडचा माजी सरपंचावर लग्नासाठी दबाव, सात तुकडे करून तीन विहिरीत फेकले, उर्वरित सात किमी लांब नदीत फेकले
Jalgaon Family died due to Shock: शेताच्या कुंपणातील करंट लागून पाच जणांचं कुटुंब मृत्यूमुखी पडलं, दोन वर्षांची दुर्गा वाचली, मृतदेहांच्या बाजूला बसून रडत राहिली
जळगावात कुंपणाचा करंट लागून पाच जणांचं कुटुंब मृत्यूमुखी पडलं, दोन वर्षांची दुर्गा वाचली, मृतदेहांच्या बाजूला बसून रडत राहिली
Raj Thackeray on Kabutar Khana: घरात उंदीर झाले तर आपण गणपतीचं वाहन म्हणून ठेवतो का, मग जैनांना कबुतरांचं.... राज ठाकरेंचं कबुतरखान्यावर सडेतोड भाष्य
घरात उंदीर झाले तर आपण गणपतीचं वाहन म्हणून ठेवतो का, मग जैनांना कबुतरांचं.... राज ठाकरेंचं कबुतरखान्यावर सडेतोड भाष्य
Maharashtra Heavy Rain: उजनी धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग; चंद्रभागा नदीनेही इशारा पातळी ओलांडली, मांजरा धरणही 98% भरलं, शेकडोंचे स्थलांतर
उजनी धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग; चंद्रभागा नदीनेही इशारा पातळी ओलांडली, मांजरा धरणही 98% भरलं, शेकडोंचे स्थलांतर
Embed widget