एक्स्प्लोर

सन 2047 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 13 पटींनी वाढणार, 40 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत झेपावणार; मुकेश अंबानी यांचा विश्वास

Indian Economy: क्लीन एनर्जी, बायो एनर्जी आणि डिजिटलायझेशनच्या मदतीने भारतीय अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन डॉलर्सवर जाणार असा विश्वास रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई : सन 2047 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) ही सध्याच्या आकारापेक्षा 13 पटींनी वाढून 40 ट्रिलियन डॉलरवर पोहोचेल असा विश्वास रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांनी व्यक्त केला आहे. पंडित दिनदयाळ एनर्जी युनिव्हर्सिटीच्या 10 व्या दिक्षांत समारोहाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. क्लीन एनर्जी (clean energy revolution) आणि डिजिटलायझेशनच्या क्रांतीमुळे हे शक्य होईल असंही ते म्हणाले.

पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटीच्या (Pandit Deendayal Energy University) 10 व्या दीक्षांत समारंभात बोलताना रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी म्हणाले की, "भारतीय अर्थव्यवस्था सध्या 3 ट्रिलियन डॉलर्सची आहे. सन 2047 पर्यंत त्याचा आकारमान सध्यापेक्षा 13 पटींनी वाढेल आणि ती 40 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल आणि जगातील टॉप तीन अर्थव्यवस्थेमध्ये स्थान मिळवेल."

तीन क्रांती ठरणार गेम चेंजर 

मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, "आतापासून 2047 सालापर्यंतचा मधला काळ, म्हणजे अमृत काळ, ज्यावेळी भारत आपल्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असेल, त्यावेळी आर्थिक विकासाच्या मोठ्या आणि अगणित संधी प्राप्त होतील आणि भारतीय अर्थव्यवस्था आश्चर्यरित्या झेप घेईल. क्लीन एनर्जी रिव्होल्यूशन म्हणजे स्वच्छ ऊर्जा क्रांती, बायो एनर्जी रिव्होल्यूशन म्हणजे जैव-ऊर्जा क्रांती आणि डिजिटल रिव्होल्यूशन या तीन गेम चेंजिंग क्रांतींच्या माध्यमातून हे शक्य आहे. या तीन गोष्टींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल होईल."

स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि जैव-ऊर्जा क्रांतीमुळे शाश्वत ऊर्जा निर्मिती होईल, तर डिजिटल क्रांती आपल्याला ऊर्जा कार्यक्षमतेने वापरण्यास सक्षम करेल असं मुकेश अंबानी म्हणाले. तिन्ही क्रांती एकत्रितपणे भारत आणि जगाला हवामान संकटापासून वाचवण्यास मदत करतील असंही ते म्हणाले. 

रिलायन्स उद्योग समूहाने तेलापासून ते टेलिकॉमपर्यंत सर्वच क्षेत्रं व्यापली आहेत. जिओमुळे भारतीय दूरसंचार क्रांतीला मोठा हातभार लागल्याचं चित्र आहे. जिओच्या मोफत व्हॉईस कॉल आणि स्वस्त डेटा ऑफरमुळे देशातील मोठ्या लोकसंख्येला या डिजिटल क्रांतीचा घटक होता आलं. 

गौतम अदानींचा विश्वास 

भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीच्या नंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा क्रमांक लागतोय. गेल्याच आठवड्यात आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आशादायी वक्तव्य केलं होतं. भारतातील वाढत्या मागणीमुळे आणि सामाजिक आणि आर्थिक सुधारणांमुळे 2050 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही 30 ट्रिलियन डॉलर्सची होईल असं ते म्हणाले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget