एक्स्प्लोर

Manipur Violence: मणिपूर हिंसाचार: दोन महिलांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक, आतापर्यंत पाच अटकेत

Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन महिलांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे.

Manipur Violence News:  मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारपर्यंत (21 जुलै) 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. 19 जुलै रोजी समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये दोन महिलांची एका समुदायाकडून विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर महिलांवर सामूहिक अत्याचार झाल्याचाही आरोप होता. 

मणिपूर पोलिसांनी ट्विट करून सांगितले की, व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 5 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी आणि दुःख व्यक्त केले आहे. 

4 आरोपींना 11 दिवसांची पोलीस कोठडी

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका आरोपीबाबत पोलिसांनी सांगितले की, तो बी. फाइनोम गावात घडलेल्या घटनेत जमावाचा एक भाग होता आणि एका पीडित महिलेला खेचताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांनी या आरोपीला थौबल जिल्ह्यातून अटक केली असून हुइरेम हेरादास सिंग असे त्याचे नाव आहे.

दोन्ही पीडित महिला महिला कुकू समुदायाच्या आहेत. मैतई समुदायाच्या जवळपास 800 जणांच्या जमावानं या कुटुंबावर हल्लाबोल केला. त्यात या महिलेचा 19 वर्षांचा भाऊ आणि वडिलांची हत्या केली. त्यानंतर या दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढली. त्यातल्या 21 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचाही आरोप आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरच्या या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले.

मणिपूरमधील ही घटना आहे 4 मे रोजीची आहे. पण हा व्हिडीओ 19 जुलैपासून व्हायरल झाला. 21 जूनला गावच्या सरपंचानं याबाबत एफआयआर दाखल केली. पण त्यालाही एक महिने उलटूनही कुठे वाच्यता झाली नव्हती. आरोपींवर कारवाई होत नव्हती. अखेर या व्हिडीओनंतर संतप्त प्रतिक्रिया देशभरातून यायला लागल्या. त्यानंतर मणिपूर सरकारला जाग आली.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. आसाममधील विरोधी पक्षाने या घटनेसाठी आणि राज्यात सुरू असलेल्या अशांततेसाठी मणिपूर सरकारला जबाबदार धरले आहे. आसाम जातीय परिषदेचे (AJP) अध्यक्ष लुरिनज्योती गोगोई म्हणाले, "राज्यात संपूर्ण अराजकता आहे आणि तत्काळ हस्तक्षेप आवश्यक आहे. गुप्तचर यंत्रणेतील अपयश, अधिकाऱ्यांची मिलीभगत, राज्य आणि केंद्र सरकारची निष्क्रियता केवळ मणिपूरच्या लोकांसाठीच नाही तर देशातील सर्व नागरिकांसाठी वेदनादायक आहे, असेही त्यांनी म्हटले. 

आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती करतो की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर सरकारला शांतता आणि सामान्य स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी त्वरित कारवाई करण्यासाठी योग्य निर्देश जारी करावे असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Embed widget