दिलासादायक! घरगुती ग्राहक हेच सर्वोच्च प्राधान्य, दोन मोठ्या जहाजातून भारतात 92000 टन LPG दाखल होणार
एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच भारतात 92000 टन एलपीजी दाखल होणार आहे.

LPG Gas News : मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने एलपीजी पुरवठ्याबाबत सतर्कता बाळगली आहे. देशातील गॅसची उपलब्धता आणि मागणीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाचे अधिकारी तेल आणि गॅस कंपन्यांसोबत दररोज बैठका घेत आहेत. ज्या ग्राहकांकडे पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) चा पर्याय उपलब्ध आहे, त्यांना एलपीजीवरून पीएनजीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असेही सरकारने सूचित केले आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच भारतात 92000 टन एलपीजी दाखल होणार आहे.
पश्चिम किनारपट्टीवर दोन मोठी एलपीजी जहाजे दाखल होणार
नौवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दोन मोठी एलपीजी जहाजे दाखल होतील. ही जहाजे अंदाजे 92000 टन एलपीजी घेऊन येत आहेत, ज्यामुळे पुरवठ्यावरील ताण काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, इराणकडून कोणत्याही नवीन एलपीजी मालाच्या आगमनाबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
घरगुती ग्राहकांना प्राधान्य
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, घरगुती एलपीजी ग्राहक हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अलीकडेच सुमारे 58 लाख गॅस सिलेंडरची नोंदणी झाली असून, ती पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या घरगुती गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. ज्या ग्राहकांकडे पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) चा पर्याय आहे, त्यांना एलपीजीवरून पीएनजीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असेही सरकारने सूचित केले आहे. अंदाजे 60 लाख ग्राहक या बदलासाठी पात्र असल्याचा अंदाज आहे. अशा सर्व ग्राहकांना नोंदणीकृत टपालाद्वारे आवाहन पाठवले जाईल.
आयातीवरील अवलंबित्व एक आव्हान
भारताचा एलपीजी पुरवठा मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे, तर पीएनजीच्या बाबतीत परिस्थिती अधिक चांगली आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत पुरवठा कायम ठेवणे हे सरकारसाठी एक आव्हान आहे. सरकारचे म्हणणे आहे की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. येत्या काही दिवसांत, जागतिक परिस्थितीनुसार पुढील धोरण ठरवले जाईल.
इराण-इस्त्रायल युद्धामुळे कतारमधील LNG प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. ज्यामुळे भारतात गॅस टंचाईची भीती निर्माण झाली आहे. कतारकडून होणारा 40 टक्के पुरवठा प्रभावित झाल्याने भारतातील एलपीजी (LPG) आणि खत निर्मिती उद्योगांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. इंधनाचे भाव वाढले असून युरियाची टंचाईही उद्भवू शकते.
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..






















