एक्स्प्लोर

Lok Sabha Election Survey: भाजपला हरवू शकते का विरोधकांची 'इंडिया' आघाडी? पाहा सर्वेक्षणातील धक्कादायक आकडेवारी

Opposition Alliance Vs Modi Govt: लोकसभा निवडणुकीच्या सुमारे 10 महिने आधी झालेल्या एका निवडणूक सर्वेक्षणात जनतेने विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीबद्दल धक्कादायक मतं नोंदवली आहेत.

INDIA Vs NDA: देशात 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. राजकीय पक्षांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यादरम्यान एका सर्वेक्षणात राजकारणाबाबत देशातील लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

इंडिया टुडे-सी व्होटरच्या 'मूड ऑफ द नेशन'च्या सर्वेक्षणात विचारण्यात आलं की, लोकसभा निवडणूक झाली तर विरोधकांची 'इंडिया' आघाडी मोदींचा, म्हणजेच भाजपचा पराभव करू शकेल का? केंद्रातील भाजपच्या सत्तेला पराभूत करण्याच्या उद्देशाने देशभरातील 26 पक्ष एकत्र येऊन 'इंडिया' आघाडी तयार झाली आहे, त्यामुळे सर्वेक्षणातील आकडेवारी देखील धक्कादायक आहे. या सर्वेक्षणात जनतेनं नक्की काय म्हटलं आहे ते जाणून घेऊया...

विरोधकांची 'इंडिया' आघाडी भाजपला पराभूत करू शकते का?

होय - 33 टक्के
नाही - 54 टक्के

इंडिया टुडे-सी व्होटरच्या सर्वेक्षणातील डेटा दर्शवतो की, 54 टक्के जनतेचा असा विश्वास आहे की आज लोकसभा निवडणूक झाल्यास विरोधी आघाडी 'इंडिया' भाजपला पराभूत करू शकत नाही. त्याच वेळी, केवळ 33 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, विरोधक भाजपला पराभूत करू शकतात.

कोणाला किती मतं मिळतील?

सर्वेक्षणाच्या निकालांमध्ये मतांची टक्केवारी आणि जागांचे आकडेही नमूद करण्यात आले आहेत, ज्यामध्ये NDA आणि विरोधी पक्षांची आघाडी 'INDIA' यांच्यात अत्यंत जिकिरीची लढत पाहायला मिळत आहे. आज निवडणूक झाली तर कोणाला किती मतं मिळणार? या प्रश्नाला उत्तर म्हणून NDA ला 43 टक्के मतं मिळू शकतात आणि 'INDIA' ला 41 टक्के मतं मिळू शकतात, असं आकडेवारी सांगते. 16 टक्के मतं इतर पक्षांच्या वाट्याला गेल्याचं दिसून आलं आहे.

कोणाला किती जागा मिळतील?

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार? या प्रश्नावरील उत्तरात सर्वेक्षण आकडेवारी दर्शवते की, NDA ला जास्तीत जास्त 306 जागा मिळू शकतात, 'INDIA'ला 193 जागा आणि इतर पक्षांना 44 जागा मिळू शकतात.

जनतेचा कल जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे-सी व्होटरचं हे सर्वेक्षण 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 543 लोकसभा मतदारसंघातील 25 हजार 951 लोकांची मतं या सर्वेक्षणातून जाणून घेण्यात आली आहेत.

हेही वाचा:

Times Now ETG Survey: आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 'ही' 6 राज्य NDA चं टेन्शन वाढवणार? सर्वेक्षणाचा निष्कर्ष धक्कादायक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Embed widget