एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आत्महत्या करणारे संत बाबा राम सिंह होते तरी कोण?

सध्या सुरु असणारी शेतकरी आंदोलनं आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांमुळं ते बरेच निराश होते. बाबा राम सिंह यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहिल्याचं म्हटलं जात आहे.

नवी दिल्ली : देशभरात शेतकरी आंदोलनं अधिक गंभीर वळण घेत असून यादरम्यानच एका घटनेनं पुन्हा एकदा या आंदोलनानं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिंघु बॉर्डर इथं सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी संत बाबा राम सिंह (sant baba ram singh) यांनी शेतकऱ्यांच्याच समर्थनार्थ स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

संत बाबा राम सिंह होते तरी कोण?

संत बाबा राम सिंह यांना ‘सिंगडा वाले बाबा’ या नावानंही ओळखलं जात होतं. त्यांचा डेरा, म्हणजेच संस्थान हे करनाल जिल्ह्यातील निसंगपाशी असणाऱ्या सिंगडा या गावी आहे. संत बाबा राम सिंह ‘सिंगडा वाले’ म्हणूनच त्यांची ओळख होती. जगभरात ते प्रवचनासाठी जात असत. नानकसर संप्रदायाशी ते संलग्न होते.

सध्या सुरु असणारी शेतकरी आंदोलनं आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांमुळं ते बरेच निराश होते. बाबा राम सिंह यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहिल्याचं म्हटलं जात आहे.

सुसाईड नोटमध्ये त्यांनी नेमकं काय लिहिलं?

"स्वत:च्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना पाहून मला दु:ख होते. सरकार या शेतकऱ्य़ांना न्याय देत नाही, जे एक प्रकारे पाप आहे आणि अन्याय करणारा पापी आहे. अन्य़ाय सहन करणंही पाप आहे. कोणी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तर कोणी अन्यायाविरोधात काहीतरी केलं आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी आपले पुरस्कार परत करुन त्यांना पाठींबा दिला... सरकारी अन्यायामध्येच सेवादार आत्मदाह करतात, हा देखील अत्याचाराविरुद्ध उठवलेला आवाज आहे. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह.”

या घटनेबाबत पोलीस म्हणतात...

सोनिपत पोलिसांकडून संत बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येनंतर अधिकृत माहिती देण्यात आली. ज्यामध्ये त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताला दुजोरा देत बाबा राम सिंह यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी करनाल येथील कल्पना चावला रुग्णालात नेण्याचं सांगण्यात आलं. सदर प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

राहुल यांनी व्य़क्त केलं दु:ख

संत बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केलं. मोदी सरकारनं क्रूरतेची मर्यादा ओलांडली आहे, या शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली असं म्हणत गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आतापर्य़ंत अनेक शेतकऱ्यांचा या संघर्षात बळी गेला आहे, तेव्हा तातडीनं हा कृषीविरोधी कायदा मागे घ्या आणि हट्ट सोडा असं राहुल गांधी मोदी सरकारला उद्देशून म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget