एक्स्प्लोर

काश्मीरमध्ये बाहेरच्या मतदारांनाही मतदारयादीत मोकळीक, 25 लाख जादाचे मतदार काश्मीरची समीकरणं बदलून टाकणार? 

Jammu Kashmir Voting Issue : निवडणुका कधी होणार हे अद्याप निश्चित नाही. पण काश्मीरच्या मतदारयादीबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयानं आता नवा वाद सुरु झालाय. 

Jammu Kashmir Voting Issue : जम्मू काश्मीर हे देशातलं सर्वात संवेदनशील राज्य. कलम 370 रद्द झाल्यानंतर तिथे निवडणुका कधी होतायत याची प्रतीक्षा आहे. त्यात एका ताज्या निर्णयानं काश्मीरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आधी कलम 370 हटवलं, नंतर काश्मीरमध्ये मतदारसंघाची पुर्नरचना आणि आता काश्मीरच्या मतदारयादीत बाहेरच्या मतदारांना मोकळीक. 2019 मध्ये काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यात आलं. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून तिथं निवडणुकांची प्रतीक्षा आहे. या निवडणुका कधी होणार हे अद्याप निश्चित नाही..पण काश्मीरच्या मतदारयादीबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयानं आता नवा वाद सुरु झालाय. 

काश्मीरमध्ये मतदारयादीत नाव नोंदवायचं असेल तर आता डोमिसाईल सर्टिफिटेकची गरज असणार नाहीय. काश्मीरमध्ये सहज वास्तव्यास असणारे लोकही आता मतदार यादीत नावासाठी अर्ज करु शकतात. नोकरदार, विद्यार्थी, सुरक्षारक्षक जवान यांना याचा लाभ घेता येणार आहे. अशीच सुविधा इतर राज्यातही उपलब्ध आहेच, आता ती काश्मीरलाही लागू होणार आहे. 

कलम 370 रद्द झाल्यानं काश्मीरला साहजिकच कुठलाही विशेष दर्जा उरलेला नाहीय. त्याचमुळे आता या निर्णयाचा काश्मीरच्या राजकारणावर कसा परिणाम होतो हे पाहावं लागेल. 


काश्मीरमध्ये बाहेरच्या मतदारांचा कसा परिणाम 

काश्मीरमध्ये 18 वर्षावरील लोकांची संख्या जवळपास 98 लाख इतकी आहे. 
पण नोंदणीकृत मतदार आहेत अवघे 76 लाख 
त्यामुळे या एका निर्णयामुळे जवळपास 25 लाख मतदार वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय
काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये मतदारसंघाची पुर्नरचना केली गेलीय. 83 मतदारसंघ होते ते वाढून आता 90 झालेत.
हिंदूबहूल जम्मू, मुस्लीमबहुल श्रीनगर यामध्ये जागांचा समतोल साधण्याचा प्रयत्नही यात झाला. त्यात आता बाहेरचे मतदार वाढले तर साहजिकच काश्मीरच्या निवडणुकांमध्ये ते लक्षणीय ठरु शकतं. 

ज्या क्षणी हा निर्णय झाला, त्यानंतर काश्मीरमध्ये त्यावरुन एकच वादंग सुरु झालाय. 

कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक प्रलंबित आहे. ती कधी होते याकडेही सगळ्याचं ंलक्ष लागलेलं आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत मतदार यादी अंतिम करण्याची तारीख निश्चित करण्यात आलीय. त्यामुळे या वर्षाअखेरीस काश्मीरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे.

काश्मीरमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक झाली 2015 मध्ये. पीडीपीनं 28 तर भाजपनं हिंदूबहुल भागातल्या सर्व 25 जागा जिंकल्या होत्या. 2018 मध्ये ही युती तुटली. त्यानंतर तिथे राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. नंतर कलम 370 रद्द झालं. जम्मू केंद्रशासित प्रदेश बनलं. आधी मतदारसंघाची हवी तशी पुर्नरचना आणि आता मतदारयादीतली ही मोकळीक भाजपचं मिशन काश्मीरचं स्वप्न पूर्ण करते का पाहावं लागेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget