Iran : या युद्धात इराण हरणार नाही, आपण त्यांची साथ द्यायला हवी होती; गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले?
India Iran Relations : भारत आणि इराण यांच्यातील संबंध जुने असून त्यांना आपण साथ द्यायला हवी होती असं मत रॉचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी व्यक्त केलं.

Israel Iran Conflict : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होताना दिसतोय. अशा परिस्थितीत भारताच्या गुप्तचर यंत्रणा रॉचे (Research and Analysis Wing RAW) माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत (Amarjit Singh Dulat) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ANIने दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या परिस्थितीत इराण या संघर्षात वरचढ ठरू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
Middle East Conflict : इराणच्या बाजूने परिस्थिती
अमरजीत सिंह दुलत म्हणाले की, भारताचे इराणसोबत जुने आणि मजबूत संबंध आहेत. आम्ही नेहमीच इराणसोबत उभे राहिलो आहोत. सध्याच्या घडामोडींचा विचार करता इराण या संघर्षात जिंकू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, सुरू असलेला संघर्ष चिंताजनक असून तो दुर्दैवी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
View this post on Instagram
India Iran Relations : भारत-इराण संबंधांची पार्श्वभूमी
भारत आणि इराण यांच्यातील संबंध स्वातंत्र्यानंतर सातत्याने दृढ होत गेले. 1950 ते 1970 या काळात इराणचा कल अमेरिकेकडे असतानाही भारताशी संबंध कायम राहिले. 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या परराष्ट्र धोरणात बदल झाला. तरीही भारताने संतुलित भूमिका घेत इराण आणि पाश्चिमात्य देशांशी संबंध टिकवले. ऊर्जा क्षेत्रात इराण हा भारतासाठी महत्त्वाचा तेल पुरवठादार राहिला आहे.
Chabahar Port : भारतासाठी धोरणात्मक महत्त्व
चाबहार बंदर हे भारत-इराण संबंधांमधील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. भारत या बंदराच्या विकासात सक्रिय राहिला आहे. या बंदरामुळे पाकिस्तानला बायपास करत भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियात थेट प्रवेश मिळतो.
INSTC Corridor : व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग
International North South Transport Corridor (INSTC) हा भारत, इराण आणि रशिया यांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. व्यापार आणि लॉजिस्टिक्स सुलभ करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त आहे. तसेच युरोप-आशिया कनेक्टिव्हिटी मजबूत करणारा हा मार्ग आहे.
Energy Impact : भारतासमोरील ऊर्जा आव्हान
पश्चिम आशियामधील वाढत्या संघर्षामुळे तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भारतासारख्या आयातदार देशांवर होऊ शकतो.
ही बातमी वाचा:






















