एक्स्प्लोर

NCRB Data: एकाच वर्षात 1.6 लाख भारतीयांचा रस्ते अपघातात मृत्यू; दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे प्रमाण वाढले

NCRB Data : वर्ष 2021 मध्ये रस्ते अपघातात एक लाख 60 हजारांहून अधिक भारतीयांना प्राण गमवावे लागले. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

NCRB Data :  एका बाजूला सरकारकडून रस्ते सुरक्षा, प्रवाशांच्या सुरक्षितेवर भर दिला जात असताना दुसरीकडे रस्ते अपघातात प्राण (Road Accident Death) गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. वर्ष 2021 मध्ये रस्ते अपघातात  एक लाख 60 हजार भारतीयांना प्राणास मुकावे लागले असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही एका वर्षातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असल्याचे NCRB ने म्हटले आहे. 

नॅशनल क्राईम रेकोर्ड ब्युरोने (NCRB) वर्ष 2021 ची आकडेवारी जाहीर केली आहे. दर दिवशी सरासरी 426 अथवा प्रत्येक तासाला 18 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. वर्ष 2020 मध्ये एक लाख 56 हजार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृतांच्या संख्येत दुचाकीस्वार, पादचाऱ्यांची संख्येत वाढ होत असल्याने NCRB ने चिंता व्यक्त केली आहे. सरासरी 100 मृतांमध्ये 44 दुचाकीस्वारांचा समावेश आहे. एकूण 69,240 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असल्याचे NCRB ने म्हटले आहे. वर्ष 2019 शी तुलना करता ही संख्या 18 टक्क्यांनी अधिक आहे. 

मृतांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक

देशात सर्वाधिक दुचाकीस्वारांचे मृत्यू तामिळनाडू राज्यात नोंदवण्यात आले आहेत. दुचाकीस्वारांच्या मृतांच्या संख्येत तामिळनाडूमधील प्रमाण 12 टक्के इतके आहे. मागील चार वर्षाच्या आकडेवारीशी तुलना करता रस्ते अपघातातील एकूण मृतांमधील दुचाकीस्वारांचे प्रमाण वाढत आहे. वर्ष 2018 मध्ये हे प्रमाण 35.7 टक्के होते. तर, वर्ष 2021 मध्ये हे प्रमाण 44.5 टक्के इतके झाले आहे. दुचाकीस्वारांची संख्या मात्र, जवळपास स्थिर असल्याचे NCRB ने म्हटले आहे. 

दुचाकीला देशात मोठी पसंती

देशातील अनेक ग्रामीण-शहरी भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे मजबूत जाळे नाही. त्याच्या परिणामी दळणवळणासाठी ग्रामीण-शहरी भागात दुचाकीला प्राधान्य दिले जाते. हेल्मेटचा वापर वगळता दुचाकीस्वारांच्या सुरक्षितेसाठी इतर उपाययोजना नाहीत. 

पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले 

वर्ष 2021 मध्ये 18,900 पादचाऱ्यांना रस्ते अपघातात प्राण गमवावा लागले.  कोरोना महासाथीचे आधीचे वर्ष 2019 शी तुलना करता यामध्ये तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रस्ते अपघातातील एकूण मृतांमध्ये वर्ष 2018 मध्ये पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण 6.9 टक्के होते. मागील वर्षी हेच प्रमाण 12.2 टक्के इतके झाले. वर्ष 2021 मध्ये सर्वाधिक पादचाऱ्यांचा मृत्यू बिहारमध्ये नोंदवण्यात आला होता. देशातील एकूण आकडेवारीत बिहारमधील एकूण प्रमाण 15 टक्के इतके राहिले आहे. 

महामार्ग, द्रुतगती महामार्ग, उन्नत महामार्ग बांधण्यावर सरकारचा भर दिसत आहे. या महामार्गांचा वापर चारचाकी आणि अवजड वाहनांकडून केला जातो. मात्र, दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली नसल्याचे जाणकार सांगतात. पादचाऱ्यांच्या सुरक्षितेबाबत फारशा उपाययोजना नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 

NCRB च्या आकडेवारीनुसार वर्ष 2021 मध्ये 4.22 लाख वाहन अपघातांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी एक लाख 74 लाखजणांना प्राण गमवावे लागले. रस्ते अपघातात रेल्वे क्रॉसिंगवरील आणि रेल्वेशी संबंधित अपघातांची नोंद केली जाते. मागील वर्षी 18,238 जणांना रेल्वे क्रॉसिंग आणि रेल्वेशी संबंधित अपघातात प्राण गमवावे लागले होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Delimitation Bill : सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget