एक्स्प्लोर

NCRB Data: एकाच वर्षात 1.6 लाख भारतीयांचा रस्ते अपघातात मृत्यू; दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे प्रमाण वाढले

NCRB Data : वर्ष 2021 मध्ये रस्ते अपघातात एक लाख 60 हजारांहून अधिक भारतीयांना प्राण गमवावे लागले. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

NCRB Data :  एका बाजूला सरकारकडून रस्ते सुरक्षा, प्रवाशांच्या सुरक्षितेवर भर दिला जात असताना दुसरीकडे रस्ते अपघातात प्राण (Road Accident Death) गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. वर्ष 2021 मध्ये रस्ते अपघातात  एक लाख 60 हजार भारतीयांना प्राणास मुकावे लागले असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही एका वर्षातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असल्याचे NCRB ने म्हटले आहे. 

नॅशनल क्राईम रेकोर्ड ब्युरोने (NCRB) वर्ष 2021 ची आकडेवारी जाहीर केली आहे. दर दिवशी सरासरी 426 अथवा प्रत्येक तासाला 18 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. वर्ष 2020 मध्ये एक लाख 56 हजार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृतांच्या संख्येत दुचाकीस्वार, पादचाऱ्यांची संख्येत वाढ होत असल्याने NCRB ने चिंता व्यक्त केली आहे. सरासरी 100 मृतांमध्ये 44 दुचाकीस्वारांचा समावेश आहे. एकूण 69,240 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असल्याचे NCRB ने म्हटले आहे. वर्ष 2019 शी तुलना करता ही संख्या 18 टक्क्यांनी अधिक आहे. 

मृतांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक

देशात सर्वाधिक दुचाकीस्वारांचे मृत्यू तामिळनाडू राज्यात नोंदवण्यात आले आहेत. दुचाकीस्वारांच्या मृतांच्या संख्येत तामिळनाडूमधील प्रमाण 12 टक्के इतके आहे. मागील चार वर्षाच्या आकडेवारीशी तुलना करता रस्ते अपघातातील एकूण मृतांमधील दुचाकीस्वारांचे प्रमाण वाढत आहे. वर्ष 2018 मध्ये हे प्रमाण 35.7 टक्के होते. तर, वर्ष 2021 मध्ये हे प्रमाण 44.5 टक्के इतके झाले आहे. दुचाकीस्वारांची संख्या मात्र, जवळपास स्थिर असल्याचे NCRB ने म्हटले आहे. 

दुचाकीला देशात मोठी पसंती

देशातील अनेक ग्रामीण-शहरी भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे मजबूत जाळे नाही. त्याच्या परिणामी दळणवळणासाठी ग्रामीण-शहरी भागात दुचाकीला प्राधान्य दिले जाते. हेल्मेटचा वापर वगळता दुचाकीस्वारांच्या सुरक्षितेसाठी इतर उपाययोजना नाहीत. 

पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले 

वर्ष 2021 मध्ये 18,900 पादचाऱ्यांना रस्ते अपघातात प्राण गमवावा लागले.  कोरोना महासाथीचे आधीचे वर्ष 2019 शी तुलना करता यामध्ये तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रस्ते अपघातातील एकूण मृतांमध्ये वर्ष 2018 मध्ये पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण 6.9 टक्के होते. मागील वर्षी हेच प्रमाण 12.2 टक्के इतके झाले. वर्ष 2021 मध्ये सर्वाधिक पादचाऱ्यांचा मृत्यू बिहारमध्ये नोंदवण्यात आला होता. देशातील एकूण आकडेवारीत बिहारमधील एकूण प्रमाण 15 टक्के इतके राहिले आहे. 

महामार्ग, द्रुतगती महामार्ग, उन्नत महामार्ग बांधण्यावर सरकारचा भर दिसत आहे. या महामार्गांचा वापर चारचाकी आणि अवजड वाहनांकडून केला जातो. मात्र, दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली नसल्याचे जाणकार सांगतात. पादचाऱ्यांच्या सुरक्षितेबाबत फारशा उपाययोजना नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 

NCRB च्या आकडेवारीनुसार वर्ष 2021 मध्ये 4.22 लाख वाहन अपघातांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी एक लाख 74 लाखजणांना प्राण गमवावे लागले. रस्ते अपघातात रेल्वे क्रॉसिंगवरील आणि रेल्वेशी संबंधित अपघातांची नोंद केली जाते. मागील वर्षी 18,238 जणांना रेल्वे क्रॉसिंग आणि रेल्वेशी संबंधित अपघातात प्राण गमवावे लागले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget