एक्स्प्लोर

Sudhakarrao Naik : महाराष्ट्राचा पाणीदार नेता सुधाकरराव नाईक, त्यांना जलनायक का म्हटले जाते?

Sudhakarrao Naik : महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती करून राज्यात भरीव काम केले.

Sudhakarrao Naik : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांची 21 ऑगस्ट रोजी जयंती. सुधाकरराव नाईक यांना जलनायक म्हणून ओळखले जाते. कारण जलसंधारणाचे खरे कार्य सुधाकरराव नाईक यांनी केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती करून राज्यात भरीव काम केले. त्यामुळेच  महाराष्ट्र सरकारने 10 मे हा त्यांचा स्मृतिदिन 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केला आहे. 

महाराष्ट्रात विविध योजना आहेत. परंतु जलसंवर्धन करण्यासाठी कोणत्याही योजनेतून पुरेसा निधी नसल्यामुळे जलसंधारणाची कामे होत नाहीत. अशाने जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. हीच परिस्थिती राहीली तर येत्या पाच ते दहा वर्षात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल याचा अंदाज बांधून सुधाकरराव नाईक यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केली. अनेक योजनांवरील निधी जलसंधारणाकडे वळता केला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जलसंवर्धनाची यशस्वी कामे त्यांच्या काळात झाली.  

 स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केल्यानंतर जलसंधारणाला राज्यात मोठी चालना दिली. राज्य जलसंधारण सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रात झंझावती दौरे करून भूजलपातळी वाढविण्यासाठी कार्यक्रम आखले. 

'जलसंधारणाचे कार्य झाले नाही तर भविष्यात महाराष्ट्राचे वाळवंट होईल', असा इशाराच सुधाकरराव नाईक यांनी दिला होता. जलचळवळ जनचळवळ करण्यासाठी त्यांनी शेवटच्या काळात देखील क्षणाचीही उसंत घेतली नाही. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 'जलक्रांतीचे जनक' या नात्याने त्यांचा स्मृतिदिन 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.  

केवळ उठसूट फक्त धरणं न बांधता पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात असे आदेश सुधाकरराव नाईक यांनी त्यावेळी दिले. जलसंधारणाची छोटी आणि महत्वाची कामं केली तर शेतकरी निराधार होणार नाही आणि जास्त जमिन सिंचनाखाली येऊ शकते आणि शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न कायमचे मिटतील या दृष्टीने त्यांनी ही तरतूद केली होती. सुधाकरराव यांच्या धाडसी निर्णयामुळेच त्यांना पाणीदार नेता म्हणून देखील ओळखले जात असे.  

यवतमाळमधील पुसदम येथील गहुली गावी सुधाकरराव नाईक यांचा जन्म झाला. वडील लोकनेते बाबासाहेब नाईक हे अत्यंत कडक शिस्तीचे आणि स्वभावाचे होते तर काका वसंतराव नाईक हे मायाळू स्वभावाचे होते. अशा जेष्ठांच्या तालमीत सुधाकरराव नाईक यांनी राजकारणाचे धडे गिरवले होते. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget